शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी ११ हजार कोटींच्या नव्या योजनेची घोषणा करण्याच्या तयारीत, बैठक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 12:25 IST

खाद्य तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट आणि सीसीईएची एक महत्वपूर्ण बैठक होत आहे.

खाद्य तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट आणि सीसीईएची एक महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत पाम ऑईल मिशनला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यावर एकूण ११ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येत दरवर्षी २.५ कोटींची भर पडते. त्यानुसार खाद्य तेलाच्या विक्रीतही दरवर्षाला ३ ते ३.५ टक्के टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या भारत सरकार ६० ते ७० हजार कोटी खर्च करून १.५ कोटी टन खाद्यतेल आयात करत आहे. देशातील लोकसंख्येचा विचार करता दरवर्षी देशात २.५ कोटी टन खाद्य तेलाची गरज भासते. 

भारतात खाद्य तेलामध्ये सोया आणि पाम तेलाची सर्वाधिक विक्री होते. पाम तेलाची एकूण आयात ४० टक्के इतकी आहे. तर एकूण गरजेपैकी ३३ टक्के सोयाबिन तेल आपण आयात करतो. सोयाबीन तेल भारत अर्जेंटिना आणि ब्राझीलहून आयात करतो. पामतेलाच्या उत्पादनात इंडोनेशिया जगात दुसऱ्या पहिल्या क्रमांकावर आहे. तर मलेशियाचा दुसरा क्रमांक लागतो. आफ्रिकेतील काही देशांमध्येही पाम तेलाचं उत्पादन केलं जातं. खाद्यतेलातील भारताच्या आयाती पैकी दोन तृतियांश हिस्सा तर केवळ पाम तेलाचा आहे. भारत दरवर्षी जवळपास ९० लाख टन पाम तेल आयात कतं. भारतात इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन्ही देशांमधून तेल आयात केलं जातं. 

मोदी सरकार नेमकं काय करणार?राष्ट्रीय खाद्यतेल मिशन अंतर्गत मोदी सरकार पाम तेलाचं उत्पादन वाढविण्यावर जोर देणार आहे. भारतात तेलबियांचं संवर्धन खूप कमी प्रमाणात होतं. त्यात वाढ करण्याचा सरकारचा इरादा आहे. तेलबियांचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून सरकार पुढाकार घेणार आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट होईल यादृष्टीनं प्रयत्न केले जाणार आहेत. याआधी भारतानं डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत. 

आगामी काळात खाद्यतेलाची आयात करावी लागणार नाही यासाठी दिर्घकालीन योजना तयार करण्याच्या सूचना कृषि मंत्रालयाला देण्यात आल्या होत्या. याच हेतूनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नूकतच पाम तेल उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील असं म्हटलं होतं. चांगल्या गुणवत्तेच्या तेलबिया, शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्र सहाय्य दिलं जाईल असंही मोदी म्हणाले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प