शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी ११ हजार कोटींच्या नव्या योजनेची घोषणा करण्याच्या तयारीत, बैठक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 12:25 IST

खाद्य तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट आणि सीसीईएची एक महत्वपूर्ण बैठक होत आहे.

खाद्य तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट आणि सीसीईएची एक महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत पाम ऑईल मिशनला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यावर एकूण ११ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येत दरवर्षी २.५ कोटींची भर पडते. त्यानुसार खाद्य तेलाच्या विक्रीतही दरवर्षाला ३ ते ३.५ टक्के टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या भारत सरकार ६० ते ७० हजार कोटी खर्च करून १.५ कोटी टन खाद्यतेल आयात करत आहे. देशातील लोकसंख्येचा विचार करता दरवर्षी देशात २.५ कोटी टन खाद्य तेलाची गरज भासते. 

भारतात खाद्य तेलामध्ये सोया आणि पाम तेलाची सर्वाधिक विक्री होते. पाम तेलाची एकूण आयात ४० टक्के इतकी आहे. तर एकूण गरजेपैकी ३३ टक्के सोयाबिन तेल आपण आयात करतो. सोयाबीन तेल भारत अर्जेंटिना आणि ब्राझीलहून आयात करतो. पामतेलाच्या उत्पादनात इंडोनेशिया जगात दुसऱ्या पहिल्या क्रमांकावर आहे. तर मलेशियाचा दुसरा क्रमांक लागतो. आफ्रिकेतील काही देशांमध्येही पाम तेलाचं उत्पादन केलं जातं. खाद्यतेलातील भारताच्या आयाती पैकी दोन तृतियांश हिस्सा तर केवळ पाम तेलाचा आहे. भारत दरवर्षी जवळपास ९० लाख टन पाम तेल आयात कतं. भारतात इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन्ही देशांमधून तेल आयात केलं जातं. 

मोदी सरकार नेमकं काय करणार?राष्ट्रीय खाद्यतेल मिशन अंतर्गत मोदी सरकार पाम तेलाचं उत्पादन वाढविण्यावर जोर देणार आहे. भारतात तेलबियांचं संवर्धन खूप कमी प्रमाणात होतं. त्यात वाढ करण्याचा सरकारचा इरादा आहे. तेलबियांचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून सरकार पुढाकार घेणार आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट होईल यादृष्टीनं प्रयत्न केले जाणार आहेत. याआधी भारतानं डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत. 

आगामी काळात खाद्यतेलाची आयात करावी लागणार नाही यासाठी दिर्घकालीन योजना तयार करण्याच्या सूचना कृषि मंत्रालयाला देण्यात आल्या होत्या. याच हेतूनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नूकतच पाम तेल उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील असं म्हटलं होतं. चांगल्या गुणवत्तेच्या तेलबिया, शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्र सहाय्य दिलं जाईल असंही मोदी म्हणाले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प