शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आता नोकरीसाठी केवळ एकच परीक्षा; कोट्यवधी तरुणांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 16:21 IST

आज झालेल्या कॅबिनेट बैठकीतील निर्णयांची मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली.

नवी दिल्ली – देशातील तरुणांसाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकारने राष्ट्रीय भरती एजन्सी (NRA)ला मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यामुळे यापूर्वी तरुणांना नोकरीसाठी बऱ्याच परीक्षा घ्याव्या लागतात आता केवळ एकच परीक्षा द्यावी लागणार आहे.

देशात 20 भरती एजन्सी आहेत, म्हणून प्रत्येक एजन्सीच्या परीक्षा देण्यासाठी विविध विविध ठिकाणी जावे लागते. आता राष्ट्रीय भरती एजन्सी (नॅशनल रिक्रूटमेंट एजेन्सी) सामान्य पात्रता परीक्षा घेईल. याचा फायदा कोट्यवधी तरुणांना होणार आहे. ही मागणी अनेक वर्षांपासून तरुणांकडून येत होती, पण केंद्राने निर्णय घेतला नव्हता.

आता राष्ट्रीय भरती एजन्सी तयार झाल्याने विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होतील, त्यांचे पैसेही वाचतील आणि मानसिक आरोग्यही ठीक राहील. आता परीक्षा देण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही. केवळ एकच परीक्षा दिल्यानंतर तरुणांना आणखी पुढे जाण्याची संधी मिळेल असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.

ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी घोषणा

पारंपारिक प्रथेनुसार यंदा एक कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मोबदल्याच्या किंमतीत वाढ केली आहे. २८५ रुपये प्रति क्विंटल दर निश्चित आहे. हा दर १० टक्के वसुलीच्या आधारे निश्चित केला गेला आहे, परंतु जर १% रिकव्हरी वाढली अर्थात ११% रिकव्हरी झाली तर प्रति क्विंटलला 28.50 रुपये अधिक मिळतील. त्याचबरोबर ९.५% किंवा त्याहून कमी रिकव्हरी झाल्यानंतरही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण देताना २७०.७५रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. तसेच सरकार इथेनॉल देखील खरेदी करते. गेल्या वर्षी सरकारने १९० कोटी लीटर इथेनॉल खरेदी केले होते असं प्रकाश जावडेकर म्हणाले.

तीन विमानतळ खासगी कंपन्यांच्या ताब्यात

खासगी विमानतळ देशातील पीपीपी मोडवर आणण्यात आली आहेत. सध्या सहा विमानतळांचे ऑपरेशन, व्यवस्थापन व विकासाचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लिलावाच्या माध्यमातून निविदा मागविण्यात आल्या. जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळ सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. याद्वारे सरकारला त्वरित १,०७० कोटी रुपये मिळतील. भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) या पैशांचा वापर छोट्या शहरांमध्ये विमानतळ विकसित करण्यासाठी करेल. याचा आणखी एक फायदा म्हणजे हवाई प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळतील. खासगी कंपन्यांची ही विमानतळ ५० वर्षाच्या भाडेतत्त्वावर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ५० वर्षांनंतर ही विमानतळ एएआयकडे परत येतील असंही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारPrakash Javadekarप्रकाश जावडेकर