शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आता नोकरीसाठी केवळ एकच परीक्षा; कोट्यवधी तरुणांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 16:21 IST

आज झालेल्या कॅबिनेट बैठकीतील निर्णयांची मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली.

नवी दिल्ली – देशातील तरुणांसाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्र सरकारने राष्ट्रीय भरती एजन्सी (NRA)ला मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यामुळे यापूर्वी तरुणांना नोकरीसाठी बऱ्याच परीक्षा घ्याव्या लागतात आता केवळ एकच परीक्षा द्यावी लागणार आहे.

देशात 20 भरती एजन्सी आहेत, म्हणून प्रत्येक एजन्सीच्या परीक्षा देण्यासाठी विविध विविध ठिकाणी जावे लागते. आता राष्ट्रीय भरती एजन्सी (नॅशनल रिक्रूटमेंट एजेन्सी) सामान्य पात्रता परीक्षा घेईल. याचा फायदा कोट्यवधी तरुणांना होणार आहे. ही मागणी अनेक वर्षांपासून तरुणांकडून येत होती, पण केंद्राने निर्णय घेतला नव्हता.

आता राष्ट्रीय भरती एजन्सी तयार झाल्याने विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होतील, त्यांचे पैसेही वाचतील आणि मानसिक आरोग्यही ठीक राहील. आता परीक्षा देण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही. केवळ एकच परीक्षा दिल्यानंतर तरुणांना आणखी पुढे जाण्याची संधी मिळेल असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.

ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी घोषणा

पारंपारिक प्रथेनुसार यंदा एक कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मोबदल्याच्या किंमतीत वाढ केली आहे. २८५ रुपये प्रति क्विंटल दर निश्चित आहे. हा दर १० टक्के वसुलीच्या आधारे निश्चित केला गेला आहे, परंतु जर १% रिकव्हरी वाढली अर्थात ११% रिकव्हरी झाली तर प्रति क्विंटलला 28.50 रुपये अधिक मिळतील. त्याचबरोबर ९.५% किंवा त्याहून कमी रिकव्हरी झाल्यानंतरही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण देताना २७०.७५रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. तसेच सरकार इथेनॉल देखील खरेदी करते. गेल्या वर्षी सरकारने १९० कोटी लीटर इथेनॉल खरेदी केले होते असं प्रकाश जावडेकर म्हणाले.

तीन विमानतळ खासगी कंपन्यांच्या ताब्यात

खासगी विमानतळ देशातील पीपीपी मोडवर आणण्यात आली आहेत. सध्या सहा विमानतळांचे ऑपरेशन, व्यवस्थापन व विकासाचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लिलावाच्या माध्यमातून निविदा मागविण्यात आल्या. जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळ सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. याद्वारे सरकारला त्वरित १,०७० कोटी रुपये मिळतील. भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) या पैशांचा वापर छोट्या शहरांमध्ये विमानतळ विकसित करण्यासाठी करेल. याचा आणखी एक फायदा म्हणजे हवाई प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळतील. खासगी कंपन्यांची ही विमानतळ ५० वर्षाच्या भाडेतत्त्वावर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ५० वर्षांनंतर ही विमानतळ एएआयकडे परत येतील असंही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारPrakash Javadekarप्रकाश जावडेकर