शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

दोन महिन्यांपेक्षा जास्त आगाऊ भाडे घेता येणार नाही; नव्या घरभाडे कायद्यात घरमालक-भाडेकरू जपले हित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 06:43 IST

घरभाड्यावरून होणारे वाद मिटवण्यासाठी न्यायालय किंवा लवाद स्थापन करण्याचा प्रस्ताव

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी मंजूर केलेल्या आदर्श घरभाडे कायद्यात (मॉडेल टेनन्सी ॲक्ट) घरमालक आणि भाडेकरू यांचे हित जपण्यात आले आहे. घरभाड्यावरून होणारे वाद मिटवण्यासाठी न्यायालय किंवा लवाद स्थापन करण्याचा त्यात प्रस्ताव आहे.नव्या कायद्यानुसार भाडेकरूकडून घरमालकाला दोन महिन्यांपेक्षा जास्त भाडे आगावू (ॲडव्हान्स) घेता येणार नाही. भाडे थकले असल्यास किंवा घर भाडेकरू सोडत नाही त्या परिस्थितीत दोनपट ते चारपट भाडे मालक वसूल करू शकतो. भाडेतत्वावरील व्यवहारांना वेग येईल, असे सरकारला वाटते. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तीत मंजूर केलेला हा आदर्श घरभाडे कायदा सगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवला जाईल. राज्ये त्यांच्या सोयीनुसार या कायद्यात बदल करतील. २०१९ मध्ये सरकारने पहिल्यांद या अधिनियमाचा मसुदा जारी केला होता.रेंटल हौसिंग मार्केटला येणार वेगया कायद्यामुळे घरांची माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल. पूर्ण देशात रेंटल हौसिंग मार्केटला वेग देण्याचा उद्देश हा कायदा करण्यात मागे आहे. भाडेपट्टीच्या अटी घरमालकाने पूर्ण केल्यास त्याला जास्त अधिकार या कायद्याने दिले आहेत. घर भाडेकरूने सोडले नाही तर मालक त्याच्याकडून सुरुवातील दोन महिने आणि नंतर चारपट भाडे वसूल करू शकेल. घर भाड्याने देण्याच्या व्यवहारात खासगी क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढेल, यामुळे घरटंचाई कमी होईल. या व्यवहारात संघटित क्षेत्रही भाग घेऊ शकेल. जागेला भाडेतत्वावर देण्याचा अधिकार देणारा हा नवा कायदा आहे. दुरुस्तीच्या कामासाठी २४ तास आधी सांगावे लागेलघरमालक आणि भाडेकरू यांच्यात किती ॲडव्हान्स घ्यायचा व द्यायचा यावर वाद होतो. ताज्या कायद्यानुसार राहत्या घरासाठी दोन तर गैरनिवासी वास्तूसाठी सहा महिन्यांपर्यंत ॲडव्हान्स ठरवण्यात आला आहे. मुंबई, बंगळुरूत दरमहाचे भाडे सहा पट तर दिल्लीत ते दोन ते तीन पट असेल.घरमालक पाणी व वीज पुरवठ्यात कपात करू शकणार नाही. घरात काही दुरुस्तीचे काम करायचे असेल तर त्यासाठी भाडेकरूला २४ तास आधी सांगावे लागेल.