शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दोन महिन्यांपेक्षा जास्त आगाऊ भाडे घेता येणार नाही; नव्या घरभाडे कायद्यात घरमालक-भाडेकरू जपले हित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 06:43 IST

घरभाड्यावरून होणारे वाद मिटवण्यासाठी न्यायालय किंवा लवाद स्थापन करण्याचा प्रस्ताव

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी मंजूर केलेल्या आदर्श घरभाडे कायद्यात (मॉडेल टेनन्सी ॲक्ट) घरमालक आणि भाडेकरू यांचे हित जपण्यात आले आहे. घरभाड्यावरून होणारे वाद मिटवण्यासाठी न्यायालय किंवा लवाद स्थापन करण्याचा त्यात प्रस्ताव आहे.नव्या कायद्यानुसार भाडेकरूकडून घरमालकाला दोन महिन्यांपेक्षा जास्त भाडे आगावू (ॲडव्हान्स) घेता येणार नाही. भाडे थकले असल्यास किंवा घर भाडेकरू सोडत नाही त्या परिस्थितीत दोनपट ते चारपट भाडे मालक वसूल करू शकतो. भाडेतत्वावरील व्यवहारांना वेग येईल, असे सरकारला वाटते. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तीत मंजूर केलेला हा आदर्श घरभाडे कायदा सगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवला जाईल. राज्ये त्यांच्या सोयीनुसार या कायद्यात बदल करतील. २०१९ मध्ये सरकारने पहिल्यांद या अधिनियमाचा मसुदा जारी केला होता.रेंटल हौसिंग मार्केटला येणार वेगया कायद्यामुळे घरांची माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल. पूर्ण देशात रेंटल हौसिंग मार्केटला वेग देण्याचा उद्देश हा कायदा करण्यात मागे आहे. भाडेपट्टीच्या अटी घरमालकाने पूर्ण केल्यास त्याला जास्त अधिकार या कायद्याने दिले आहेत. घर भाडेकरूने सोडले नाही तर मालक त्याच्याकडून सुरुवातील दोन महिने आणि नंतर चारपट भाडे वसूल करू शकेल. घर भाड्याने देण्याच्या व्यवहारात खासगी क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढेल, यामुळे घरटंचाई कमी होईल. या व्यवहारात संघटित क्षेत्रही भाग घेऊ शकेल. जागेला भाडेतत्वावर देण्याचा अधिकार देणारा हा नवा कायदा आहे. दुरुस्तीच्या कामासाठी २४ तास आधी सांगावे लागेलघरमालक आणि भाडेकरू यांच्यात किती ॲडव्हान्स घ्यायचा व द्यायचा यावर वाद होतो. ताज्या कायद्यानुसार राहत्या घरासाठी दोन तर गैरनिवासी वास्तूसाठी सहा महिन्यांपर्यंत ॲडव्हान्स ठरवण्यात आला आहे. मुंबई, बंगळुरूत दरमहाचे भाडे सहा पट तर दिल्लीत ते दोन ते तीन पट असेल.घरमालक पाणी व वीज पुरवठ्यात कपात करू शकणार नाही. घरात काही दुरुस्तीचे काम करायचे असेल तर त्यासाठी भाडेकरूला २४ तास आधी सांगावे लागेल.