शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दिल्ली हिंसाचार : सैन्याला बोलवून प्रभावित भागात संचारबंदी लागू करण्याची केजरीवालांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 15:41 IST

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले की, मी आश्वासन देतो, कायद्याच पालन करणाऱ्या कोणत्याही नागरिकाचे नुकसान होणार नाही. पूरेशी यंत्रणा तैनात आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील हिंसाचार चांगलाच भडकला असून केंद्र सरकार यावर गांभीर्याने लक्ष ठेवून आहे. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारावर आपले मत मांडले आहे. दिल्लीतील प्रभावित भागात सैन्याला पाचारण करून संचारबंदी लागू करावी, अशी मागणी केजरीवाल यांनी ट्विट करून केली आहे.

केजरीवाल म्हणाले की, मी रात्रभर अनेक लोकांशी संपर्क साधला. दिल्लीतील स्थिती चिंताजनक आहे. प्रयत्न करूनही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. अशा स्थितीत सैन्याला पाचारण करायला हवं आणि प्रभावित भागात संचारबंदी लागू करावी. त्यासाठी आपण गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे केजरीवाल यांनी नमूद केले.

दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले की, मी आश्वासन देतो, कायद्याच पालन करणाऱ्या कोणत्याही नागरिकाचे नुकसान होणार नाही. पूरेशी यंत्रणा तैनात आहे. त्यामुळे कोणीही घाबरण्याचे कारण नाही, असंही डोवाल यांनी म्हटले आहे. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील हिंसेवर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी डोवाल यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.