शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

CAA मुळे नागरिकत्व कायद्यातील 'ती' तरतूद बदललेली नाही; राष्ट्रपतींचा महत्त्वपूर्ण खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 13:04 IST

CAA मुळे नारगिकत्वाबाबतची तरतूद बदण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे (CAA) सध्या देशातील वातावरण तापले आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याची तरतूद या कायद्यात आहे. मात्र CAA मुळे नारगिकत्वाबाबतची तरतूद बदण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यात आली असली तरी या कायद्यातील मूळ तरतुदी बदललेल्या नाहीत, असे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले आहे. आपल्या अभिभाषणामध्ये राष्ट्रपती म्हणाले की, भारताप्रति आस्था आणि श्रद्धा असणारे आणि भारतीय नागरिकत्व घेण्यासाठी इच्छुक असलेल्या जगातील सर्व पंथाच्या व्यक्तींसाठी भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी यापूर्वी जी प्रक्रिया अस्तित्वात होती, ती आजही कायम आहे,'' 

 संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना संबोधित केले. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणामध्ये सरकारने गेल्या सात महिन्यांत घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा उल्लेख केला. तसेच सध्या वादाचे केंद्र बनलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचाही राष्ट्रपतींनी उल्लेख केला. हा कायदा करून सरकारने महात्मा गांधींच्या इच्छेची पूर्तता केली, असे राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपतींच्या या विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

Budget 2020: विचारधारांवरून भांडणाऱ्या नेत्यांना अन् समर्थकांना राष्ट्रपतींनी शिकवली 'देशभक्ती'

अभिभाषणादरम्यान राष्ट्रपतींच्या 'त्या' विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट 

CAA, NRC विरोधात विरोधी पक्षांचे संसदेच्या आवारात आंदोलन

पाकिस्तानातून येणाऱ्या मुस्लिमांनाही देणार भारताचं नागरिकत्व - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आपल्या अभिभाषणामध्ये राष्ट्रपती म्हणाले की, ''भारताने नेहमीच सर्वधर्म समभावाचा पुरस्कार केला आहे. फाळणीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत जे नागरिक पाकिस्तानमध्ये राहू शकत नाहीत. ते भारतात येऊ शकतात, असे राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांनी सांगितले होते. अशा नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची संधी उपलब्झ करून देणे हे भारताचे कर्तव्य आहे. बापूजींच्या विचारांना पाठिंबा देताना अनेक राजकीय पक्षांनी हा विचार पुढे नेला याचा मला आनंद आहे. तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा करून त्यांच्या इच्छेचा मान राखला याचे मला समाधान आहे. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकIndiaभारतbudget 2020बजेट