शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी सीएए- पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 05:35 IST

भारताने दिलेले जुने वचन पूर्ण केले आहे; विरोधकांकडून व्होट बँकेचे राजकारण

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करणारे विरोधक हे व्होट बँकेवर कब्जा करण्याच्या स्पर्धेत सहभागी असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. एनसीसी कॅडेटस्ना संबोधित करताना मोदी म्हणाले की, काही राजकीय पक्ष व्होट बँकेवर कब्जा करण्याच्या स्पर्धेत आहेत. हे लोक अखेर कुणाच्या हितासाठी काम करीत आहेत.ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी आमच्या सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणला आहे, तर काही राजकीय पक्ष व्होट बँकेसाठी त्याचा विरोध करीत आहेत. ज्यांनी शत्रू संपत्ती कायद्याचा विरोध केला होता ते लोक सीएएलाही विरोध करीत आहेत.सीएएला विरोध करणाऱ्या पक्षांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, काही राजकीय पक्ष व्होट बँकेचे राजकारण करत आहेत. पाकिस्तानात हिंदूंवर होणारे अत्याचार त्यांना दिसत नाहीत. पाकिस्तानमध्ये सैन्याच्या जाहिरातीत स्वच्छतेसाठीच्या पदासाठी म्हटले होते की, या जागा केवळ बिगर मुस्लिमांसाठी आहेत. याचा अर्थ त्या दलितांसाठी होत्या.ही तर गांधीजींची इच्छामोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर भारताने पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानच्या हिंदू, शीख आणि अन्य अल्पसंख्याकांना शब्द दिला होता की, आवश्यकता वाटल्यास ते पुन्हा भारतात येऊ शकतात.हीच इच्छा गांधीजींची होती. हीच भावना १९५० मध्ये नेहरू-लियाकत करारातही होती. आमचा शेजारी देश आमच्याशी तीन- तीन युद्ध हरला आहे. त्यांना धूळ चारण्यासाठी आमच्या सैन्याला आठ-दहा दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत नाही.नागरिकत्व : धर्माचा पुरावा आवश्यकसुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात ठिकठिकाणी आंदोलने सुरू असतानाच, केंद्र सरकारने या कायद्याच्या आधारे पाकिस्तान, बांग्लादेश व अफगाणिस्तानमधील बिगरमुस्लिमांना कशा प्रकारे नागरिकत्व द्यायचे, याची नियमावली तयार करण्यास सुरुवात केली आहे.या देशांतून जे हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन धार्मिक छळामुळे ३१ डिसेंबर २0१४ पूर्वी भारतात आलेले असतील, त्यांना भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी आपल्या धर्माचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही. तशी तरतूद सीएएच्या नियमावलीत करण्यात आली आहे. आसाममध्ये भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी तीन महिन्यांना अवधी मिळणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक