शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी सीएए- पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 05:35 IST

भारताने दिलेले जुने वचन पूर्ण केले आहे; विरोधकांकडून व्होट बँकेचे राजकारण

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करणारे विरोधक हे व्होट बँकेवर कब्जा करण्याच्या स्पर्धेत सहभागी असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. एनसीसी कॅडेटस्ना संबोधित करताना मोदी म्हणाले की, काही राजकीय पक्ष व्होट बँकेवर कब्जा करण्याच्या स्पर्धेत आहेत. हे लोक अखेर कुणाच्या हितासाठी काम करीत आहेत.ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी आमच्या सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणला आहे, तर काही राजकीय पक्ष व्होट बँकेसाठी त्याचा विरोध करीत आहेत. ज्यांनी शत्रू संपत्ती कायद्याचा विरोध केला होता ते लोक सीएएलाही विरोध करीत आहेत.सीएएला विरोध करणाऱ्या पक्षांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, काही राजकीय पक्ष व्होट बँकेचे राजकारण करत आहेत. पाकिस्तानात हिंदूंवर होणारे अत्याचार त्यांना दिसत नाहीत. पाकिस्तानमध्ये सैन्याच्या जाहिरातीत स्वच्छतेसाठीच्या पदासाठी म्हटले होते की, या जागा केवळ बिगर मुस्लिमांसाठी आहेत. याचा अर्थ त्या दलितांसाठी होत्या.ही तर गांधीजींची इच्छामोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर भारताने पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानच्या हिंदू, शीख आणि अन्य अल्पसंख्याकांना शब्द दिला होता की, आवश्यकता वाटल्यास ते पुन्हा भारतात येऊ शकतात.हीच इच्छा गांधीजींची होती. हीच भावना १९५० मध्ये नेहरू-लियाकत करारातही होती. आमचा शेजारी देश आमच्याशी तीन- तीन युद्ध हरला आहे. त्यांना धूळ चारण्यासाठी आमच्या सैन्याला आठ-दहा दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत नाही.नागरिकत्व : धर्माचा पुरावा आवश्यकसुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात ठिकठिकाणी आंदोलने सुरू असतानाच, केंद्र सरकारने या कायद्याच्या आधारे पाकिस्तान, बांग्लादेश व अफगाणिस्तानमधील बिगरमुस्लिमांना कशा प्रकारे नागरिकत्व द्यायचे, याची नियमावली तयार करण्यास सुरुवात केली आहे.या देशांतून जे हिंदू, शीख, बौद्ध, पारशी, ख्रिश्चन धार्मिक छळामुळे ३१ डिसेंबर २0१४ पूर्वी भारतात आलेले असतील, त्यांना भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी आपल्या धर्माचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही. तशी तरतूद सीएएच्या नियमावलीत करण्यात आली आहे. आसाममध्ये भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी तीन महिन्यांना अवधी मिळणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक