शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

१२ वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या मुलावर केले अंत्यविधी; आता एका पत्रामुळं आला ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 08:08 IST

१२ वर्षापूर्वी छवी घरातून बाहेर पडला होता त्यावेळी त्याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती असं गावातील लोकांनी सांगितले.

बक्सर – बिहारच्या बक्सर येथे एका कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही. जेव्हा अचानक त्यांना कळालं की, १२ वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाला मृत समजून अंत्यसंस्कार केले होते. तो जिवंत आहे आणि पाकिस्तानच्या एका जेलमध्ये बंद आहे. मुलाच्या जिवंत असल्याची माहिती कळताच आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबू शकले नाहीत. जवळपास १२ वर्षापूर्वी मुफ्फसिल परिसरातील खिलाफतपूर येथे राहणारा छवी घरातून बेपत्ता झाला होता. त्यावेळी त्याचे वय १८ वर्ष होते. नातेवाईकांना त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु हाती काहीच लागलं नाही.

या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, विशेष शाखेकडून आलेल्या पत्रातून हा प्रकार उघड झाला. छवी नावाचा व्यक्ती जो खिलाफतपूरमध्ये राहत होता. आम्ही पूर्ण तपास करुन रिपोर्ट पाठवणार आहोत. परंतु पत्रात हा मुलगा यावेळी कुठे आहे त्याचा उल्लेख नाही. तर नातेवाईक सांगतात की, छवी पाकिस्तानात असल्याचं पोलीस म्हणाले. पोलीस ठाण्याकडून छवीची ओळख पटवण्यासाठी एक पत्र आणि फोटो आला होता.

१२ वर्षापूर्वी घरातून झाला होता बेपत्ता

छवीच्या वडिलांचे निधन झाले आहे तर आई माहेरी राहत असते. मोठा भाऊ आणि त्याची बायको यांना पोलिसांनी सांगितले की, छवी जिवंत असण्याची शक्यता आहे आणि तो पाकिस्तानच्या जेलमध्यं कैद आहे. हे ऐकून गावात बातमी पसरली आणि सगळीकडे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. १२ वर्षापूर्वी छवी घरातून बाहेर पडला होता त्यावेळी त्याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती असं गावातील लोकांनी सांगितले.

कुटुंबामध्ये आनंद

छवीने इतक्या वर्षांनी पाकिस्तानी प्रशासनाला त्याचं, आई वडिलांचे, गावाचे नाव सांगितले. पण छवी पाकिस्तानात नेमका कसा पोहचला? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. घरातील मुलगा बेपत्ता झाला. तो सापडत नाही. म्हणून कुटुंबाने त्याला मृत समजून अंत्यविधी उरकले होते. परंतु आता तो जिवंत आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्याला पाकिस्तानातून भारतात आणावं अशी आशा कुटुंबाला आहे.

टॅग्स :Biharबिहार