शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बस दरीत काेसळली, सात जवानांचा मृत्यू, काश्मीरमधील घटना, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेतून परतत हाेते जवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 07:27 IST

बसमधील सर्व जवान गेल्या दीड ते दाेन महिन्यांपासून अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात हाेते. यात्रेचा सुरुवातीचा बिंदू चंदनवाडी येथून पहलगाम येथे सर्व जवान परतत हाेते. फ्रीस्लानजवळ घाटातून जाताना चलकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

- सुरेश डुग्गर

श्रीनगर : अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेतून परतणाऱ्या जवानांवर काळाने घाला घातला. काश्मीरच्या पहलगाम जिल्ह्यात इंडाे तिबेट सीमा पाेलीस दलाच्या जवानांना नेणारी बस खाेल दरीत काेसळली. त्यात ७ जवानांचा मृत्यू झाला. तर ३२ जवान जखमी झाले आहेत. या बसमध्ये जम्मू आणि काश्मीर पाेलीस दलाचेही २ जवानांचा समावेश आहे. 

बसमधील सर्व जवान गेल्या दीड ते दाेन महिन्यांपासून अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात हाेते. यात्रेचा सुरुवातीचा बिंदू चंदनवाडी येथून पहलगाम येथे सर्व जवान परतत हाेते. फ्रीस्लानजवळ घाटातून जाताना चलकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस सुमारे १०० फूट खाेल दरीत नदीपात्रात काेसळली. एवढ्या उंचीवरून काेसळल्यामुळे बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघातात दाेन जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जवानांची प्राणज्याेत उपचारादरम्यान मालवली. 

राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आदी मान्यवरांनी शाेक संवेदना व्यक्त केल्या.

जवानाने सांगितला घटनाक्रमअपघातातून बचावलेल्या काही जवानांनी घटनेबाबत माहिती दिली. अनंतनाग येथे उपचारासाठी दाखल झालेले हेड काॅन्स्टेबर खेरनार बापू यांनी सांगितले, की मी ४० सहकाऱ्यांसह पाेशपथरी कॅम्प येथून निघालाे हाेताे. फ्रिसलानाजवळ एका वळणावर चालक अचानक ओरडला की ब्रेक लागत नाही, ब्रेक फेल झाला आहे. त्यानंतर काही क्षणात बस दरीत काेसळली. घटनेनंतर काही स्थानिक धावत आले. त्यांनी मदत केली, असे ते म्हणाले. खेरनार यांच्या पायाला जखमी झाली आहे.

मे महिन्यातही झाला असाच अपघात२७ मे राेजी लडाखजवळ असाच अपघात घडला हाेता. श्याेक नदीत जवानांची बस काेसळल्यामुळे ७ जवानांचा मृत्यू झाला हाेता. सर्व जवान तुरतूक येथे तैनातीसाठी जात हाेते.

८ जण गंभीर८ जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर श्रीनगर येथे उपचार करण्यात येत आहेत. इतर जखमींवर अनंतनाग येथे उपचार सुरू आहेत. इतरांची प्रकृती स्थिर आहे.     - एस. एल. थाओसेन,     आयटीबीटी महासंचालक  

मृतांची नावे- दुला सिंह (पंजाब)- अभिराज (बिहार)- अमित के (उत्तर प्रदेश)- डी. राज शेखर (आंध्र प्रदेश)- सुभाष बैरवाल (राजस्थान)- दिनेश बाेहरा (उत्तराखंड)- संदीप कुमार (जम्मू)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAccidentअपघात