शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वीजतारेच्या संपर्कात आल्यानं बसला आग, 10 प्रवाशांचा मृत्यू, 22 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 09:23 IST

वीजतारेच्या संपर्कात आल्यानं बसला आग लागल्याची भीषण घटना रविवारी ओडिशातल्या गंजाम जिल्ह्यातील गोलंतारा भागात घडली आहे.

भुवनेश्वरः वीजतारेच्या संपर्कात आल्यानं बसला आग लागल्याची भीषण घटना रविवारी ओडिशातल्या गंजाम जिल्ह्यातील गोलंतारा भागात घडली आहे. या दुर्दैवी घटनेत 10 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 22 प्रवासी जखमी आहेत. पाच जणांचा मृत्यू हा घटनास्थळीच झाला, तर पाच जणांचा एमकेसीजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती गंजामचे जिल्हाधिकारी विजय अमृत कुलांगे आणि ब्रह्मपूर पोलीस अधीक्षक पिनाक मिश्रा यांनी दिली आहे. एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू रुग्णालयात नेत असतानाच झाला. तसेच जखमींपैकी पाच जणांची परिस्थिती नाजूक आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, ती बस जंगलपाडूहून चिकरादाला जात असताना ही घटना मनदाराजपूरमध्ये घडली आहे. या बसमध्ये 40 प्रवासी होते. बसमधील लोक जवळच असलेल्या गावात साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात होते. त्याचदरम्यान 11 किलोवॉटच्या क्षमतेची वीजेची तार बसच्या संपर्कात आल्यानं बसला आग लागली. अग्निशामक दलाचे अधिकारी सुकांत सेठी यांनी आग विझवण्यात आल्याची माहिती दिली आहे. दुर्घटनेनंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला असून, बसमधील लोकांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बसच्या टपावर सामान होतं, बसचालकानं रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकी वाहनाला रस्ता देण्याच्या प्रयत्नात असतानाच वीजतारेच्या संपर्कात आली. सीएमनं व्यक्त केलं दुःख; भरपाईची घोषणाओडिशातल्या नवीन पटनायक सरकारनं या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना दोन दोन लाखांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तसेच अपघातातील जखमींवर विनाशुल्क उपचार करण्याचीही घोषणा केली आहे.