शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

वीजतारेच्या संपर्कात आल्यानं बसला आग, 10 प्रवाशांचा मृत्यू, 22 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 09:23 IST

वीजतारेच्या संपर्कात आल्यानं बसला आग लागल्याची भीषण घटना रविवारी ओडिशातल्या गंजाम जिल्ह्यातील गोलंतारा भागात घडली आहे.

भुवनेश्वरः वीजतारेच्या संपर्कात आल्यानं बसला आग लागल्याची भीषण घटना रविवारी ओडिशातल्या गंजाम जिल्ह्यातील गोलंतारा भागात घडली आहे. या दुर्दैवी घटनेत 10 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 22 प्रवासी जखमी आहेत. पाच जणांचा मृत्यू हा घटनास्थळीच झाला, तर पाच जणांचा एमकेसीजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती गंजामचे जिल्हाधिकारी विजय अमृत कुलांगे आणि ब्रह्मपूर पोलीस अधीक्षक पिनाक मिश्रा यांनी दिली आहे. एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू रुग्णालयात नेत असतानाच झाला. तसेच जखमींपैकी पाच जणांची परिस्थिती नाजूक आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, ती बस जंगलपाडूहून चिकरादाला जात असताना ही घटना मनदाराजपूरमध्ये घडली आहे. या बसमध्ये 40 प्रवासी होते. बसमधील लोक जवळच असलेल्या गावात साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात होते. त्याचदरम्यान 11 किलोवॉटच्या क्षमतेची वीजेची तार बसच्या संपर्कात आल्यानं बसला आग लागली. अग्निशामक दलाचे अधिकारी सुकांत सेठी यांनी आग विझवण्यात आल्याची माहिती दिली आहे. दुर्घटनेनंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला असून, बसमधील लोकांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बसच्या टपावर सामान होतं, बसचालकानं रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकी वाहनाला रस्ता देण्याच्या प्रयत्नात असतानाच वीजतारेच्या संपर्कात आली. सीएमनं व्यक्त केलं दुःख; भरपाईची घोषणाओडिशातल्या नवीन पटनायक सरकारनं या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना दोन दोन लाखांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तसेच अपघातातील जखमींवर विनाशुल्क उपचार करण्याचीही घोषणा केली आहे.