शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तके जाळणे, चित्रपट बंद पाडणे अमान्य! - शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 17:09 IST

काँग्रेसला केंद्रात सत्तेवर परतण्याची संधी मिळाल्यास या देशात कोणतेही पुस्तक निषेध म्हणून जाळले जाणार नाही आणि कोणताही चित्रपट बंद पाडू दिला जाणार नाही, अशी स्पष्ट हमी कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी येथे दिली.

- अपर्णा वेलणकर

जयपूर : सत्ताधारी पक्षाला गैरसोयीचा वाटणारा प्रत्येक विचार सरसकट ‘देशद्रोह’ ठरवण्याचा उन्मत्तपणा कॉंग्रेसला अमान्य आहे. हिंसेला उघड उत्तेजन आणि देशाच्या सार्वभौमत्वाला हानी पोचेल असे वक्तव्य हे अपवाद वगळता मतस्वातर्याचा, मुक्त अभिव्यक्तीचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. काँग्रेसला केंद्रात सत्तेवर परतण्याची संधी मिळाल्यास या देशात कोणतेही पुस्तक निषेध म्हणून जाळले जाणार नाही आणि कोणताही चित्रपट बंद पाडू दिला जाणार नाही, अशी स्पष्ट हमी कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांनी येथे दिली.जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत थरूर बोलत होते.

कॉंग्रेसच्या जाहीरनामा समितीचा सदस्य म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधी पक्षाची भूमिका ठरवण्याची जबाबदारी आपण स्वीकारली असून त्यासाठी देशभरातल्या लेखक-कलावंतांच्या भेटीगाठी सुरू असल्याची माहितीही थरूर यांनी दिली. ज्या कलाकृतीवर बंदी घालण्याची मागणी होते, त्या मागणीतले तथ्य सिद्ध करण्याची जबाबदारी बंदीच्या पुरस्कर्त्यांवर असली पाहिजे, त्या ऐवजी त्या कलाकृतीच्या निर्मात्यावरच दबाब आणला जातो, ही मुस्कटदाबी भारतात चालू देता कामा नये. याची जबाबदारी केंद्राबरोबरच राज्य सरकारे आणि अर्थातच न्यायालयांनीही संवेदनशीलतेने निभावली पाहिजे, असेही थरूर म्हणाले.

करदात्यांचा पैसा मनमानीपणे उधळून स्वत:ची प्रसिद्धी विकत घेण्याचे नरेंद्र मोदी सरकारचे ‘कौशल्य’ जनतेला उमगत नाही, अशा भ्रमात भाजपाने न राहिलेले बरे, असा टोला लगावून थरूर म्हणाले, प्रियांका गांधी यांच्या राजकारण-प्रवेशावर विचार आणि वक्तव्ये करण्यात भाजपाने एवढा वेळ गमावण्याचे कारण नाही. त्यांनी आपल्या पक्षाचे बघावे, आम्ही आमचे पाहून घेऊ!’ 

प्रियांका, राहुल...आणि स्पर्धाभारताच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात बदलांनी वेग घेतला असून पक्षकार्याची जबाबदारी स्वीकारून राजकारणात सक्रीय झालेल्या प्रियांका गांधी हे त्या बदलाचे समर्थ प्रतिक असल्याचे शशी थरूर म्हणाले.भविष्यात प्रियांका गांधींचे काम उत्तर प्रदेशपुरते मर्यादित राहाणार नाही हे उघड असले तरी येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशसारख्या संवेदनशील राज्यावर त्या अधिक लक्ष केंद्रीत करतील. सामान्य लोकांशी असलेला ‘कनेक्ट’, तरुण मतदारांमधली लोकप्रियता, स्थानिक भाषेच्या लहेजावरले प्रभुत्व आणिअर्थातच व्यक्तिगत करिश्मा ही प्रियांका गांधींची बलस्थाने त्यांच्या उज्ज्वल राजकीय भविष्याची खात्री देतात, असे थरूर म्हणाले.प्रियांकांचे औपचारिक आगमन म्हणजे राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाच्या वाटेतला अडथळा नाही का, या प्रश्नावर थरूर म्हणाले, कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष एकच आहेत. त्यांना कसली स्पर्धा? 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूर