शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जादू दाखवतो म्हणत तरुणाला संध्याकाळी जमिनीत गाडलं; सकाळी पुन्हा खड्डा खणला तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 18:41 IST

१२ तास तरुण खड्ड्यात जिवंत राहील असा दावा करण्यात आला होता; सकाळी पुन्हा खड्डा खणण्यात आला, तेव्हा सगळ्यांना धक्का बसला

पाटणा: बिहारची शेखपुरामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. जादूचा प्रयोग एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. शेखोपूरसरायमधील वीरपूर गावात हा प्रकार घडला. जादूच्या प्रयोगादरम्यान मृत्यूमुखी पडलेला तरुण याच गावचा आहे. त्याचं नाव धीरज रविदास होतं. तो १८ वर्षांचा होता. रविदासला जमिनीत गाडून १२ तासांनी त्याला जिवंत बाहेर काढण्याचा दावा जादूगारानं केला होता. १२ तासांनी पुन्हा खड्डा खणण्यात आला, त्यावेळी रविदासचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रविदासच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

जादूचे प्रयोग करूनच धीरज रविदासचं घर चालतं. रविदास स्वत: जादू दाखवायचा. शुक्रवारी रात्री तो मधेपूर गावात आपल्या सहकाऱ्यांसह जादूचे खेळ दाखवत होता. त्यात त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांचादेखील समावेश होता. रविदासला जमिनीखाली गाडून १२ तासांनंतर त्याला जिवंत बाहेर काढण्यात येईल असा दावा करण्यात आला. शुक्रवारी संध्याकाळी रविदासला खड्डा खणून गाडण्याल आलं. शनिवारी सकाळी त्याला बाहेर काढण्यासाठी पुन्हा खड्डा खणण्यात आला. मात्र रविदासचा मृत्यू झाला होता.दोन लहानग्यांची गळे कापून निर्घृण हत्या; शेतात मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ

धीरज रविदासच्या मृत्यूची माहिती मिळताच वीरपूर गावावरून त्याचे नातेवाईक मधेपूरला पोहोचले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बरबीघा पोलीस ठाण्याचे प्रभारी पथकासह दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच रविदासच्या वडिलांनी आणि सरपंचांनी विरोध केला. त्यामुळे पोलिसांना मृतदेहाशिवाय तिथून निघावं लागलं. या प्रकरणात मृताच्या नातेवाईकांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.