शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

इमारत कोसळली, तीस तास कुटुंब अडकले; तीन टोमॅटो खाऊन जीवंत राहिले; पीडितांनी आपबीती सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:35 IST

Burari Building Collapsed : दोन दिवसापूर्वी दिल्लीतील मुरारी येथे एक इमारत पडून मोठी दुर्घटना घडली. या इमारती खाली एक कुटुंब अडकले होते.

Burari Building Collapsed ( Marathi News ) : दोन दिवसापूर्वी दिल्लीतील मुरारी येथे एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली होती. या इमारतीचा पडलेला ढिगारा काढण्याचे काम सुरू होते, आज या ढिगाऱ्याखाली एक कुटुंब अडकल्याचे दिसले. या सर्वांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. दैव बलवत्तर! म्हणून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, या कुटुंबातील सर्वच सदस्यांची तब्येत चांगली आहे. फक्त जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Varanasi Boat Accident: मोठी घटना! वाराणसीमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, शोधमोहिम सुरू

दिल्लीतील बुरारी येथे या आठवड्याच्या सुरुवातीला कोसळलेल्या पाच मजली इमारतीच्या ढिगाऱ्यातून पोलिसांनी चार जणांच्या कुटुंबाला जिवंत बाहेर काढले. राजेश (३०), त्याची पत्नी गंगोत्री (२६) आणि त्यांची मुले प्रिन्स (६) आणि हृतिक (३) अशी या पुरूषांची ओळख पटली आहे. याबाबत कुटुंब प्रमुखांनी आपबीती सांगितली. कुटुंबप्रमुखांनी सांगितले की, ते किमान ३० तास ढिगाऱ्यात अडकले होते आणि फक्त ३ टोमॅटो खाल्ल्याने ते वाचले. त्यांना बाहेर काढण्यात आले तेव्हा संपूर्ण कुटुंब बेशुद्ध होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टोमॅटो सापडले तेच खाऊन दिवस काढला 

२९ जानेवारी रोजी रात्री उशिरा केलेल्या बचाव कार्यात संपूर्ण कुटुंबाला इमारतीच्या ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने घरात राहिलेले ३ टोमॅटो खाऊन त्यांची भूक भागवली, असंही कुटुंबीय म्हणाले.

त्यांच्या कुटुंबीयांची एएनआयने मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेची आपबीती सांगितली. राजेश म्हणाले की, सायंकाळी ६.३० च्या सुमारास ते त्यांच्या कुटुंबासाठी जेवण बनवण्यासाठी जात असताना इमारत कोसळली. त्यांनी ढिगारा काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण यात अयशस्वी झालो. घरात उरलेले फक्त ३ टोमॅटो खाऊन आमचे संपूर्ण कुटुंब ३० तासांहून अधिक काळ जीवंत राहिले.

त्यांनी लगेच हार मानली होती आणि आता जे काय होईल ते देवच करेल, असं त्यांनी सांगितले. राजेश यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले तेव्हा ते सर्व बेशुद्ध होते. ते कधी आणि कसे रुग्णालयात पोहोचले हे आम्हालाही माहित नाही.

ढिगाऱ्याखालून १६ जणांना बाहेर काढले

इमारतीच्या छताचा स्लॅब कोसळल्याने कुटुंब ढिगाऱ्यात अडकले होते. पण हा स्लॅब एलपीजी सिलेंडरवर पडला, त्यामुळे राजेश आणि त्याचे कुटुंब ढिगाऱ्याखाली दबण्यापासून वाचले. इमारत कोसळल्यापासून १६ जणांना वाचवण्यात आले आहे. या घटनेत २ अल्पवयीन मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :delhiदिल्लीAccidentअपघात