शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

विमानातील उपद्रवी प्रवाशांना बसणार लगाम; भारताने जारी केले नो-फ्लाय लिस्टचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 18:40 IST

विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्रालयाने पहिली नो-फ्लाय लिस्ट जारी केली आहे. शुक्रवारी केंद्रीय उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी ही लिस्ट जारी केली. विमानात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई व्यतिरिक्त विशेष कारवाई केली जाणार आहे. नो-फ्लाय लिस्टची तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्रालयाने पहिली नो-फ्लाय लिस्ट जारी केली विमानात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई व्यतिरिक्त विशेष कारवाई केली जाणार आहे.नो-फ्लाय लिस्टची तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये विमान प्रवासात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशावर दोन वर्षांची बंदी घातली जाऊ शकते

नवी दिल्ली, दि. 8 - विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्रालयाने पहिल्या नो-फ्लाय लिस्टचे नियम जारी केले आहेत. शुक्रवारी केंद्रीय उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी या नियमांची घोषणा केली आहे. विमानात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई व्यतिरिक्त विशेष कारवाई केली जाणार आहे. नो-फ्लाय लिस्टच्या नियमांची तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये विमान प्रवासात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशावर बंदी घातली जाऊ शकते. विमानतळावर एखाद्या प्रवाशानं जिवे मारण्याच्या धमकीसह हंगामा केल्यास त्याच्या विमान प्रवासावर दोन वर्षांपर्यंत प्रतिबंध घालण्यात येणार आहे.  प्रवाशांचे सुरक्षाकडे मजबूत करण्यासाठी आम्ही नो-फ्लाय लिस्टचे नियम जाहीर केल्याची माहिती केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली आहे. नो-फ्लाय लिस्टच्या नियमांची तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे. पहिल्या भागात अपशब्द वापरणा-यांसह विमानात हंगामा करणा-यांना टाकण्यात आलं आहे. अशा प्रवाशांवर तीन महिन्यांपर्यंत बॅन लावलं जाऊ शकतं. तर दुस-या भागात शारीरिकरीत्या दुष्कर्म करणा-या प्रवाशांना टाकण्यात आलं आहे. अशा प्रवाशांच्या हवाई प्रवासावर सहा महिन्यांपर्यंत प्रतिबंध घातला जाऊ शकतो. तर तिस-या भागात धमकी देणारे, गोंधळ घालणा-या प्रवाशांना टाकण्यात आलं आहे. त्यांच्यावर जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ विमान प्रवासावर बंदी घातली जाऊ शकते. 

तर गेल्या काही दिवसांपूर्वी विमानाने देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर आता प्रवाशाकडे सरकारी ओळखपत्र असणं गरजेचं करण्यात आलं आहे. देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पासपोर्ट किंवा पॅन कार्ड क्रमांक यापैकी एका ओळखपत्राचा क्रमांक देणं बंधनकारक असणार आहे. 8 सप्टेंबर रोजी केंद्र सरकार यासंदर्भातील नियम जाहीर करणार आहे. यामध्ये मतदान ओळखपत्राचा क्रमांकही चालू शकतो, पण त्याबाबतचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही.भारतात सुरक्षेच्या दृष्टीने ‘नो फ्लाय लिस्ट’ तयार करण्यात आली असून, हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर अनेक देशांमध्ये अशा प्रकारचा नियम करण्यात आला आहे. या नवीन नियमामुळे एका व्यक्तीच्या तिकिटावर दुसरा व्यक्ती प्रवास करण्याच्या घटना रोखल्या जाऊ शकतील, असं केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले आहेत.  नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम मंगोलिया येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्लोबल रेग्युलेटर्स’च्या बैठकीला उपस्थित होती. त्याठिकाणी हा निर्णय घेण्यात आल्याचंही जयंत सिन्हा म्हणाले आहेत.'नो फ्लाय'च्या नियमांबाबत आमच्याकडे काही सूचना आल्या होत्या. त्याबाबत योग्य तो विचार करुन देशांतर्गत प्रवासाबाबतचे नवीन नियम तयार करण्यात आले आहे, अशी माहिती जयंत सिन्हा यांनी दिली आहे. याशिवाय देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकिट काढताना आधार कार्ड क्रमांक देणाऱ्या प्रवाशांना लवकर डिजिटल बोर्डिंग पास देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे नागरिकांना देशांतर्गत विमान प्रवासाचे तिकीट काढताना यापुढे सरकारी ओळखपत्र स्वतःकडे ठेवणं बंधनकारक असणार आहे.