शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विमानातील उपद्रवी प्रवाशांना बसणार लगाम; भारताने जारी केले नो-फ्लाय लिस्टचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 18:40 IST

विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्रालयाने पहिली नो-फ्लाय लिस्ट जारी केली आहे. शुक्रवारी केंद्रीय उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी ही लिस्ट जारी केली. विमानात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई व्यतिरिक्त विशेष कारवाई केली जाणार आहे. नो-फ्लाय लिस्टची तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्रालयाने पहिली नो-फ्लाय लिस्ट जारी केली विमानात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई व्यतिरिक्त विशेष कारवाई केली जाणार आहे.नो-फ्लाय लिस्टची तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये विमान प्रवासात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशावर दोन वर्षांची बंदी घातली जाऊ शकते

नवी दिल्ली, दि. 8 - विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्रालयाने पहिल्या नो-फ्लाय लिस्टचे नियम जारी केले आहेत. शुक्रवारी केंद्रीय उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी या नियमांची घोषणा केली आहे. विमानात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई व्यतिरिक्त विशेष कारवाई केली जाणार आहे. नो-फ्लाय लिस्टच्या नियमांची तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये विमान प्रवासात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशावर बंदी घातली जाऊ शकते. विमानतळावर एखाद्या प्रवाशानं जिवे मारण्याच्या धमकीसह हंगामा केल्यास त्याच्या विमान प्रवासावर दोन वर्षांपर्यंत प्रतिबंध घालण्यात येणार आहे.  प्रवाशांचे सुरक्षाकडे मजबूत करण्यासाठी आम्ही नो-फ्लाय लिस्टचे नियम जाहीर केल्याची माहिती केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली आहे. नो-फ्लाय लिस्टच्या नियमांची तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे. पहिल्या भागात अपशब्द वापरणा-यांसह विमानात हंगामा करणा-यांना टाकण्यात आलं आहे. अशा प्रवाशांवर तीन महिन्यांपर्यंत बॅन लावलं जाऊ शकतं. तर दुस-या भागात शारीरिकरीत्या दुष्कर्म करणा-या प्रवाशांना टाकण्यात आलं आहे. अशा प्रवाशांच्या हवाई प्रवासावर सहा महिन्यांपर्यंत प्रतिबंध घातला जाऊ शकतो. तर तिस-या भागात धमकी देणारे, गोंधळ घालणा-या प्रवाशांना टाकण्यात आलं आहे. त्यांच्यावर जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ विमान प्रवासावर बंदी घातली जाऊ शकते. 

तर गेल्या काही दिवसांपूर्वी विमानाने देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर आता प्रवाशाकडे सरकारी ओळखपत्र असणं गरजेचं करण्यात आलं आहे. देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पासपोर्ट किंवा पॅन कार्ड क्रमांक यापैकी एका ओळखपत्राचा क्रमांक देणं बंधनकारक असणार आहे. 8 सप्टेंबर रोजी केंद्र सरकार यासंदर्भातील नियम जाहीर करणार आहे. यामध्ये मतदान ओळखपत्राचा क्रमांकही चालू शकतो, पण त्याबाबतचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही.भारतात सुरक्षेच्या दृष्टीने ‘नो फ्लाय लिस्ट’ तयार करण्यात आली असून, हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर अनेक देशांमध्ये अशा प्रकारचा नियम करण्यात आला आहे. या नवीन नियमामुळे एका व्यक्तीच्या तिकिटावर दुसरा व्यक्ती प्रवास करण्याच्या घटना रोखल्या जाऊ शकतील, असं केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले आहेत.  नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम मंगोलिया येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्लोबल रेग्युलेटर्स’च्या बैठकीला उपस्थित होती. त्याठिकाणी हा निर्णय घेण्यात आल्याचंही जयंत सिन्हा म्हणाले आहेत.'नो फ्लाय'च्या नियमांबाबत आमच्याकडे काही सूचना आल्या होत्या. त्याबाबत योग्य तो विचार करुन देशांतर्गत प्रवासाबाबतचे नवीन नियम तयार करण्यात आले आहे, अशी माहिती जयंत सिन्हा यांनी दिली आहे. याशिवाय देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकिट काढताना आधार कार्ड क्रमांक देणाऱ्या प्रवाशांना लवकर डिजिटल बोर्डिंग पास देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे नागरिकांना देशांतर्गत विमान प्रवासाचे तिकीट काढताना यापुढे सरकारी ओळखपत्र स्वतःकडे ठेवणं बंधनकारक असणार आहे.