शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

विमानातील उपद्रवी प्रवाशांना बसणार लगाम; भारताने जारी केले नो-फ्लाय लिस्टचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 18:40 IST

विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्रालयाने पहिली नो-फ्लाय लिस्ट जारी केली आहे. शुक्रवारी केंद्रीय उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी ही लिस्ट जारी केली. विमानात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई व्यतिरिक्त विशेष कारवाई केली जाणार आहे. नो-फ्लाय लिस्टची तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्रालयाने पहिली नो-फ्लाय लिस्ट जारी केली विमानात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई व्यतिरिक्त विशेष कारवाई केली जाणार आहे.नो-फ्लाय लिस्टची तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये विमान प्रवासात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशावर दोन वर्षांची बंदी घातली जाऊ शकते

नवी दिल्ली, दि. 8 - विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्रालयाने पहिल्या नो-फ्लाय लिस्टचे नियम जारी केले आहेत. शुक्रवारी केंद्रीय उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी या नियमांची घोषणा केली आहे. विमानात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई व्यतिरिक्त विशेष कारवाई केली जाणार आहे. नो-फ्लाय लिस्टच्या नियमांची तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये विमान प्रवासात गैरव्यवहार करणाऱ्या प्रवाशावर बंदी घातली जाऊ शकते. विमानतळावर एखाद्या प्रवाशानं जिवे मारण्याच्या धमकीसह हंगामा केल्यास त्याच्या विमान प्रवासावर दोन वर्षांपर्यंत प्रतिबंध घालण्यात येणार आहे.  प्रवाशांचे सुरक्षाकडे मजबूत करण्यासाठी आम्ही नो-फ्लाय लिस्टचे नियम जाहीर केल्याची माहिती केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली आहे. नो-फ्लाय लिस्टच्या नियमांची तीन विभागांत वर्गवारी करण्यात आली आहे. पहिल्या भागात अपशब्द वापरणा-यांसह विमानात हंगामा करणा-यांना टाकण्यात आलं आहे. अशा प्रवाशांवर तीन महिन्यांपर्यंत बॅन लावलं जाऊ शकतं. तर दुस-या भागात शारीरिकरीत्या दुष्कर्म करणा-या प्रवाशांना टाकण्यात आलं आहे. अशा प्रवाशांच्या हवाई प्रवासावर सहा महिन्यांपर्यंत प्रतिबंध घातला जाऊ शकतो. तर तिस-या भागात धमकी देणारे, गोंधळ घालणा-या प्रवाशांना टाकण्यात आलं आहे. त्यांच्यावर जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ विमान प्रवासावर बंदी घातली जाऊ शकते. 

तर गेल्या काही दिवसांपूर्वी विमानाने देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर आता प्रवाशाकडे सरकारी ओळखपत्र असणं गरजेचं करण्यात आलं आहे. देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पासपोर्ट किंवा पॅन कार्ड क्रमांक यापैकी एका ओळखपत्राचा क्रमांक देणं बंधनकारक असणार आहे. 8 सप्टेंबर रोजी केंद्र सरकार यासंदर्भातील नियम जाहीर करणार आहे. यामध्ये मतदान ओळखपत्राचा क्रमांकही चालू शकतो, पण त्याबाबतचा निर्णय अजून घेण्यात आलेला नाही.भारतात सुरक्षेच्या दृष्टीने ‘नो फ्लाय लिस्ट’ तयार करण्यात आली असून, हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर अनेक देशांमध्ये अशा प्रकारचा नियम करण्यात आला आहे. या नवीन नियमामुळे एका व्यक्तीच्या तिकिटावर दुसरा व्यक्ती प्रवास करण्याच्या घटना रोखल्या जाऊ शकतील, असं केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले आहेत.  नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम मंगोलिया येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘ग्लोबल रेग्युलेटर्स’च्या बैठकीला उपस्थित होती. त्याठिकाणी हा निर्णय घेण्यात आल्याचंही जयंत सिन्हा म्हणाले आहेत.'नो फ्लाय'च्या नियमांबाबत आमच्याकडे काही सूचना आल्या होत्या. त्याबाबत योग्य तो विचार करुन देशांतर्गत प्रवासाबाबतचे नवीन नियम तयार करण्यात आले आहे, अशी माहिती जयंत सिन्हा यांनी दिली आहे. याशिवाय देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकिट काढताना आधार कार्ड क्रमांक देणाऱ्या प्रवाशांना लवकर डिजिटल बोर्डिंग पास देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे नागरिकांना देशांतर्गत विमान प्रवासाचे तिकीट काढताना यापुढे सरकारी ओळखपत्र स्वतःकडे ठेवणं बंधनकारक असणार आहे.