शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

हलक्या दर्जाच्या चिनी मालानं तयार होतंय भारतीय लष्कराचं बुलेटप्रूफ जॅकेट, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 21:47 IST

नियंत्रण रेषेवर शत्रूंना तोंड देणारे आणि देशांतर्गत दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या जवानांची बुलेटप्रूफ जॅकेट निकृष्ट दर्जाची असल्याचं आता समोर आलं आहे.

नवी दिल्ली- नियंत्रण रेषेवर शत्रूंना तोंड देणारे आणि देशांतर्गत दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या जवानांची बुलेटप्रूफ जॅकेट निकृष्ट दर्जाची असल्याचं धक्कादायक वास्तव आता समोर आलं आहे. चीनकडून आयात केलेल्या निकृष्ट दर्जाच्या मालानं ही बुलेटप्रूफ जॅकेट तयार करण्यात येत आहेत. निधड्या छातीनं दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या जवानांच्या छातीवर घालण्यात आलेल्या जॅकेटचा दर्जा निकृष्ट असल्यानं अनेक स्तरांतून याच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. पण सरकारच्या मते या जॅकेटच्या दर्जाविषयी शंका उपस्थित करण्यासारखं काहीही नाही.नीती आयोगाचे सदस्य आणि माजी डीआरडीओ प्रमुख व्ही. के. सारस्वत यांनी रविवारी सांगितलं की, भारतीय कंपन्या या जॅकेटमध्ये चिनी मालाचा वापर जॅकेटची किंमत आवाक्यात राहावी यासाठी करत आहेत. सारस्वत यांनी भारतीय लष्कराला पुरवण्यात येणाऱ्या जॅकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या हलक्या दर्जाच्या मालासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, चिनी मालानं बनवण्यात आलेली ही जॅकेट्स सुरक्षेच्या मापदंडात न बसल्यास प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण ती सुरक्षेच्या मापदंडात बसत आहेत. तसेच या जॅकेटसंदर्भात चिंता करण्यासारखी कोणतीही बाब अद्याप समोर आलेली नाही, याचा उल्लेखही सारस्वत यांनी केला आहे.नीती आयोगानं हलक्या वजनाची सुरक्षा कवच (बुलेटप्रूफ जॅकेट) भारतातच बनवण्यासाठी एक रोडमॅप बनवण्यास सांगितला आहे. भारतीय मानक ब्युरो(बीआयएस)नं भारतीय लष्कराच्या वापरात असलेल्या सुरक्षा कवचांची गुणवत्ता तपासली आहे.  तत्पूर्वी भारतीय कंपन्या बुलेटप्रूफ जॅकेटसाठी कच्चा माल अमेरिका किंवा युरोपिय देशांतून खरेदी करत होत्या. परंतु या देशांतून येणाऱ्या कच्च्या मालाच्या तुलनेत चीनकडून येणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती कमी आहेत. त्यामुळे बऱ्याच कंपन्या या चीनकडून कच्चा माल खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. सुरक्षा जवानांना हवीत 3 लाखांहून अधिकची जॅकेट्सभारतीय जवानांना 3 लाखांहून अधिक हलक्या वजनाच्या जॅकेटची गरज आहे. या आकड्यानुसारच भारतीय कंपन्यांनी या जॅकेटसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची ऑर्डर दिली आहे. सध्या भारतीय जवान वापरत असलेले जॅकेट हे वजनानं जड आहे. त्यामुळे बऱ्याच काळापासून हलक्या जॅकेटची मागणी होत आहे. कानपूरची एमकेयू आणि टाटा अडवान्स मटेरियल्ससह जास्त करून भारतीय कंपन्या विविध देशातील सैन्याला बुलेटप्रूफ जॅकेट बनवून देतात.