शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

बुलेट ट्रेनच्या रोज होणार ७० फेऱ्या, दर २0 मिनिटांनी एक ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 6:20 AM

सरासरी प्रवासीक्षमता एक हजार धरल्यास जाणारे ३५ हजार व येणारे ३५ हजार प्रवासी मिळणे आवश्यक आहे

नवी दिल्ली : बुलेट ट्रेनचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. त्यानंतर मुंबई ते अहमदाबादचा प्रवास दोन तासांत पूर्ण होईल. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसी) रेल्वेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.बुलेट ट्रेन स्टेशन जुन्या आणि नव्या साबरमती स्टेशनच्या मध्ये होणार आहे. साबरमतीहून बुलेट ट्रेन निघून अहमदाबादेतीलकालूपूरला येईल. मुंबई (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) ते साबरमती हे अंतर फास्ट ट्रेन २.०७ तासांत पूर्ण करेल. सर्व १२ स्टेशनवर थांबणारी रेल्वे हे अंतर २.५८ तासांत पूर्ण करेल.अधिका-यांनी सांगितले की, सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ५ ते ९ या काळात दर तासाला तीन रेल्वे धावतील. म्हणजेच दर २० मिनिटाला एक रेल्वे धावणार आहे. उर्वरित वेळेत एका तासात दोन रेल्वे धावणार आहेत. बुलेट ट्रेनमध्ये सुरुवातीला प्रवाशांची क्षमता प्रति ट्रेन ७५० एवढी असेल. ही क्षमता वाढवून नंतर ती १२५० प्रवासी करण्यात येईल. यासाठी ३५ बुलेट ट्रेन विकत घेतल्या जाणार आहेत.बुलेट ट्रेनचा अधिकाधिक स्पीड ३५० किमी प्रतितास व सरासरी स्पीड ३२० किमी प्रतितास असेल. अहमदाबाद ते मुंबई रेल्वे प्रवासाला ७ तास लागतात. विमानाने एक तास लागतो. या दोन्ही शहरांतून रोज २० रेल्वे धावतात व १० विमानेही निघतात. आता बुलेट ट्रेनही १५ आॅगस्ट २०२२ पासून धावू लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.रोज एवढे प्रवासी मिळतील?मुंबई व अहमदाबाद येथून रोज ३५ बुलेट ट्रेन निघतील. त्यांची सरासरी प्रवासीक्षमता एक हजार धरल्यास जाणारे ३५ हजार व येणारे ३५ हजार प्रवासी मिळणे आवश्यक आहे. इतके प्रवासी रोज बुलेट ट्रेनने प्रवास करतील का, त्यांना तिचे भाडे परवडेल का, हा प्रश्नच आहे