शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
3
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
4
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
5
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
6
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
7
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
8
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
9
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
10
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
11
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
12
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
13
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
14
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
15
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
20
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनचे भाडे २५0 ते ३,000 रुपये; ३२० किमी प्रति तास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:57 IST

मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अंतरानुसार, किमान २५० रुपये ते कमाल ३,००० रुपये एवढे भाडे द्यावे लागणार आहे. या बुलेट ट्रेनची गती ३२० किमी प्रति तास असणार आहे.

नवी दिल्ली : मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अंतरानुसार, किमान २५० रुपये ते कमाल ३,००० रुपये एवढे भाडे द्यावे लागणार आहे. या बुलेट ट्रेनची गती ३२० किमी प्रति तास असणार आहे. ही ट्रेन २०२२ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. संभाव्य भाडेदराचा अंदाज नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी दिला.अचल खरे यांनी सांगितले की, मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे भाडे ३००० रुपये असेल. बिझनेस क्लाससाठी या ट्रेनमध्ये भाडे दर ३,००० रुपयांपेक्षा अधिक असू शकते. बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाणे भाडे २५० रुपये असेल. या दोन स्टेशनांदरम्यान टॅक्सीचे भाडे ६५० रुपये असून, त्यासाठी वेळ अडीच तास एवढा लागतो. हाय स्पीड ट्रेनने १५ मिनिटांत हे अंतर पार करता येईल.त्यांनी सांगितले की, एसी प्रथम श्रेणीचे भाडे दीडपट अधिक असेल. एका ट्रेनमध्ये १० डबे असतील. यातील एक बिझनेस क्लासचा असेल. या योजनेनुसार, डिसेंबरमध्ये कामाला सुरुवात होईल. कारण तोपर्यंत भूसंपादन होण्याची शक्यता आहे. मंत्रालयाला या योजनेसाठी १,४१५ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यासाठी १० हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महाराष्ट्र सरकारने भूसंपादनासाठी अधिसूचना काढली आहे. बाजारभावापेक्षा या जमिनींना २५ टक्के जादा दर दिला जाईल.४,००० जणांना मिळेल थेट रोजगारअधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकल्पांतर्गत ३ ते ४ हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे, तर ३० ते ४० हजार कामगारांच्या हाताला काम मिळणार आहे. या योजनेत जपानची अधिक भागीदारी असल्याचे वृत्त फेटाळून लावताना अधिकाºयांनी सांगितले की, त्यांची भागीदारी फक्त १८.६ टक्के आहे. भारतीय कंत्राटदार ४६० किमीचे काम करणार आहेत. जपान समुद्राखालील २१ किमीचे काम करणार आहे.अपघातांचा नीचांकरेल्वेसाठी २०१७-१८ हे वर्ष मागील ५७ वर्षांतील सर्वाधिक सुरक्षित वर्ष ठरले आहे. गेल्या वर्षभरात ७३ रेल्वे अपघात झाले. हा अपघातांचा गेल्या ५७ वर्षांतील नीचांक ठरला आहे.त्या आधीच्या वर्षी १०४ रेल्वे अपघात झाले होेते. २०१७-१८ मध्ये रेल्वेने ४,४०५ किमीच्या रेल्वे मार्गांचे नूतनीकरण केले. हा उच्चांक ठरला आहे. सर्व रेल्वेगाड्यांनी मिळून २०१७-१८ मध्ये १,१७०.७ दशलक्ष ट्रेन कि.मी. प्रवास केला आहे.रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वाधिक लांब प्रवास आहे. एवढा विक्रमी प्रवास करूनही अपघातांत घसरण झाली आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन