शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

बुलेट ट्रेनचे भाडे २५0 ते ३,000 रुपये; ३२० किमी प्रति तास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:57 IST

मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अंतरानुसार, किमान २५० रुपये ते कमाल ३,००० रुपये एवढे भाडे द्यावे लागणार आहे. या बुलेट ट्रेनची गती ३२० किमी प्रति तास असणार आहे.

नवी दिल्ली : मुंबई ते अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अंतरानुसार, किमान २५० रुपये ते कमाल ३,००० रुपये एवढे भाडे द्यावे लागणार आहे. या बुलेट ट्रेनची गती ३२० किमी प्रति तास असणार आहे. ही ट्रेन २०२२ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. संभाव्य भाडेदराचा अंदाज नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी दिला.अचल खरे यांनी सांगितले की, मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे भाडे ३००० रुपये असेल. बिझनेस क्लाससाठी या ट्रेनमध्ये भाडे दर ३,००० रुपयांपेक्षा अधिक असू शकते. बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाणे भाडे २५० रुपये असेल. या दोन स्टेशनांदरम्यान टॅक्सीचे भाडे ६५० रुपये असून, त्यासाठी वेळ अडीच तास एवढा लागतो. हाय स्पीड ट्रेनने १५ मिनिटांत हे अंतर पार करता येईल.त्यांनी सांगितले की, एसी प्रथम श्रेणीचे भाडे दीडपट अधिक असेल. एका ट्रेनमध्ये १० डबे असतील. यातील एक बिझनेस क्लासचा असेल. या योजनेनुसार, डिसेंबरमध्ये कामाला सुरुवात होईल. कारण तोपर्यंत भूसंपादन होण्याची शक्यता आहे. मंत्रालयाला या योजनेसाठी १,४१५ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यासाठी १० हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महाराष्ट्र सरकारने भूसंपादनासाठी अधिसूचना काढली आहे. बाजारभावापेक्षा या जमिनींना २५ टक्के जादा दर दिला जाईल.४,००० जणांना मिळेल थेट रोजगारअधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकल्पांतर्गत ३ ते ४ हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे, तर ३० ते ४० हजार कामगारांच्या हाताला काम मिळणार आहे. या योजनेत जपानची अधिक भागीदारी असल्याचे वृत्त फेटाळून लावताना अधिकाºयांनी सांगितले की, त्यांची भागीदारी फक्त १८.६ टक्के आहे. भारतीय कंत्राटदार ४६० किमीचे काम करणार आहेत. जपान समुद्राखालील २१ किमीचे काम करणार आहे.अपघातांचा नीचांकरेल्वेसाठी २०१७-१८ हे वर्ष मागील ५७ वर्षांतील सर्वाधिक सुरक्षित वर्ष ठरले आहे. गेल्या वर्षभरात ७३ रेल्वे अपघात झाले. हा अपघातांचा गेल्या ५७ वर्षांतील नीचांक ठरला आहे.त्या आधीच्या वर्षी १०४ रेल्वे अपघात झाले होेते. २०१७-१८ मध्ये रेल्वेने ४,४०५ किमीच्या रेल्वे मार्गांचे नूतनीकरण केले. हा उच्चांक ठरला आहे. सर्व रेल्वेगाड्यांनी मिळून २०१७-१८ मध्ये १,१७०.७ दशलक्ष ट्रेन कि.मी. प्रवास केला आहे.रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वाधिक लांब प्रवास आहे. एवढा विक्रमी प्रवास करूनही अपघातांत घसरण झाली आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन