शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन संपवलं; ७०० शेतकरी ताब्यात, बुलडोझरने तंबू केले उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 09:46 IST

पंजाबमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन पंजाब सरकारने थांबवलं.

Punjab Farmer Protest: शंभू-खनौरी सीमेवर वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेल्या आंदोलनावर पंजाब सरकार अचानक कठोर कारवाई केली आहे. पंजाब पोलिसांनी बुधवारी शंभू आणि खनौरी सीमेवरुन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना हटवलं. त्यानंतर बुलडोझरच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे तंबू उद्ध्वस्त केले. केंद्र सरकार, पंजाब सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चंदीगडमध्ये झालेल्या चर्चेची सातवी फेरीही फोल ठरल्यानंतर लगेचच ही कारवाई झाली. पंजाब सरकारने शेतकरी संघटनेचे प्रमुख शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल, सर्वन सिंग पंढेर, अभिमन्यू कोहर, काका सिंग कोटाडा आणि इतरांना ताब्यात घेतले.

शेतकरी नेते आणि केंद्रीय शिष्टमंडळ यांच्यातील चर्चेचा सातवा टप्पा कोणताही तोडगा न निघताच बुधवारी संपला. यासंदर्भात पुढील बैठक ४ मे रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यावेळी केली. मात्र त्यानंतर पंजाब सरकारने शेतकरी आंदोलनावर मोठी कारवाई केली. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने कारवाई केली. अचानक शेतकरी नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांना त्यांच्या ठिकाणापासून पळवून लावण्यात आले. १३ महिन्यांपासून बंद असलेली हरियाणा-पंजाबची शंभू सीमा उघडण्याचे काम सुरू झाले. आंदोलक शेतकऱ्यांना तिथून हटवण्यात आलं आहे.

बुधवारी सकाळी ११.५० वाजता या बैठकीसाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे सेक्टर-२६ येथील महात्मा गांधी सार्वजनिक प्रशासन संस्थेत पोहोचले होते. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा आणि कृषिमंत्री गुरमीत सिंग खुदियान हे देखील बैठकीला उपस्थित होते. ही बैठक चार तास चालली. मात्र चर्चेच्या शेवटी तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांना हुसकावून लावण्यासाठी सुमारे ३००० पोलिसांचे पथक खनौरी बॉर्डर पॉईंटवर पोहोचले होते. यावेळी पोलिसांनी खनौरी सीमेवर सुमारे ५०० ते ७०० शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.

१३ फेब्रुवारी २०२४ पासून हे आंदोलन सुरू होते. मात्र बुधवारी भगवंत मान सरकार वर्षभरानंतर अॅक्शन मोडमध्ये आले आणि शेतकऱ्यांचे तंबू बुलडोझरने उद्ध्वस्त केले. दोन सीमांवर कारवाई झाली आणि त्यासाठी एक नव्हे तर अनेक बुलडोझर शेतात घुसले आणि एकामागून एक शेतकऱ्यांचे तात्पुरते तंबू जमीनदोस्त केले. ही बुलडोझर कारवाई अनेक तास सुरू होती. अचानक झालेल्या या कारवाईने शेतकऱ्यांनाही धक्का बसला. कोणताही इशारा किंवा सूचना न देता पंजाब सरकारने अचानक शेतकऱ्यांना हुसकावून लावायला सुरुवात केली.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या इतर प्रमुख मागण्यांमध्ये एमएसपीची कायदेशीर हमी, कर्जमाफी, शेतकरी आणि कामगारांना पेन्शन, वीजदरवाढीचा निषेध, शेतकऱ्यांवरील पोलिस खटले मागे घेणे, २०२१ च्या लखीमपूर खेरी हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय, भूसंपादन कायदा २०१३ पुनर्स्थापित करणे आणि २०२०-२०२० मध्ये मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई या मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :PunjabपंजाबFarmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संप