शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
6
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
7
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
8
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
9
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
10
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
11
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
12
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
13
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
14
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
15
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
16
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
17
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
18
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
19
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
20
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?

पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन संपवलं; ७०० शेतकरी ताब्यात, बुलडोझरने तंबू केले उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 09:46 IST

पंजाबमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन पंजाब सरकारने थांबवलं.

Punjab Farmer Protest: शंभू-खनौरी सीमेवर वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेल्या आंदोलनावर पंजाब सरकार अचानक कठोर कारवाई केली आहे. पंजाब पोलिसांनी बुधवारी शंभू आणि खनौरी सीमेवरुन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना हटवलं. त्यानंतर बुलडोझरच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे तंबू उद्ध्वस्त केले. केंद्र सरकार, पंजाब सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चंदीगडमध्ये झालेल्या चर्चेची सातवी फेरीही फोल ठरल्यानंतर लगेचच ही कारवाई झाली. पंजाब सरकारने शेतकरी संघटनेचे प्रमुख शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल, सर्वन सिंग पंढेर, अभिमन्यू कोहर, काका सिंग कोटाडा आणि इतरांना ताब्यात घेतले.

शेतकरी नेते आणि केंद्रीय शिष्टमंडळ यांच्यातील चर्चेचा सातवा टप्पा कोणताही तोडगा न निघताच बुधवारी संपला. यासंदर्भात पुढील बैठक ४ मे रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यावेळी केली. मात्र त्यानंतर पंजाब सरकारने शेतकरी आंदोलनावर मोठी कारवाई केली. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने कारवाई केली. अचानक शेतकरी नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांना त्यांच्या ठिकाणापासून पळवून लावण्यात आले. १३ महिन्यांपासून बंद असलेली हरियाणा-पंजाबची शंभू सीमा उघडण्याचे काम सुरू झाले. आंदोलक शेतकऱ्यांना तिथून हटवण्यात आलं आहे.

बुधवारी सकाळी ११.५० वाजता या बैठकीसाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे सेक्टर-२६ येथील महात्मा गांधी सार्वजनिक प्रशासन संस्थेत पोहोचले होते. पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा आणि कृषिमंत्री गुरमीत सिंग खुदियान हे देखील बैठकीला उपस्थित होते. ही बैठक चार तास चालली. मात्र चर्चेच्या शेवटी तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांना हुसकावून लावण्यासाठी सुमारे ३००० पोलिसांचे पथक खनौरी बॉर्डर पॉईंटवर पोहोचले होते. यावेळी पोलिसांनी खनौरी सीमेवर सुमारे ५०० ते ७०० शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.

१३ फेब्रुवारी २०२४ पासून हे आंदोलन सुरू होते. मात्र बुधवारी भगवंत मान सरकार वर्षभरानंतर अॅक्शन मोडमध्ये आले आणि शेतकऱ्यांचे तंबू बुलडोझरने उद्ध्वस्त केले. दोन सीमांवर कारवाई झाली आणि त्यासाठी एक नव्हे तर अनेक बुलडोझर शेतात घुसले आणि एकामागून एक शेतकऱ्यांचे तात्पुरते तंबू जमीनदोस्त केले. ही बुलडोझर कारवाई अनेक तास सुरू होती. अचानक झालेल्या या कारवाईने शेतकऱ्यांनाही धक्का बसला. कोणताही इशारा किंवा सूचना न देता पंजाब सरकारने अचानक शेतकऱ्यांना हुसकावून लावायला सुरुवात केली.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या इतर प्रमुख मागण्यांमध्ये एमएसपीची कायदेशीर हमी, कर्जमाफी, शेतकरी आणि कामगारांना पेन्शन, वीजदरवाढीचा निषेध, शेतकऱ्यांवरील पोलिस खटले मागे घेणे, २०२१ च्या लखीमपूर खेरी हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय, भूसंपादन कायदा २०१३ पुनर्स्थापित करणे आणि २०२०-२०२० मध्ये मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई या मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :PunjabपंजाबFarmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संप