शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

आणखी तुरुंग बांधणे, यात कसला विकास? राष्ट्रपतींचं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 08:32 IST

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी न्यायवृंदांसमोरच नोंदवले मत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात आणखी तुरुंग बांधण्याची चर्चा सध्या सुरू आहे. हा कसला विकास आहे? खरे तर तुरुंगव्यवस्थाच संपुष्टात आली पाहिजे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी म्हटले आहे. मी या मुद्द्यावर फार बोलणार नाही. मात्र या विषयावर मी जी मते व्यक्त केली नाहीत, त्या गोष्टीवरही सर्वांनी विचार करावा, असेही त्यांनी सांगितले. 

संविधान दिनानिमित्त शनिवारी दिल्लीमध्ये आयोजिलेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आपल्या भाषणामुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, केंद्रीय विधिमंत्री किरण रिजीजू यांच्यासहित सर्व उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या भाषणानंतर लोकांनी उभे राहून राष्ट्रपतींना अभिवादन केले. मुर्मु यांनी सांगितले की, एखाद्याला थप्पड मारल्याच्या गुन्ह्याप्रकरणी देखील काही लोक वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडल्याची उदाहरणे आहेत. अशापैकी बहुतांश कैद्यांना राज्यघटनेची प्रस्तावना, मूलभूत अधिकार याची माहिती तसेच जाणीवही नसते. त्यांच्या सुटकेसाठी न्यायालयात दाद मागण्याचा कुटुंबीय विचार करत नाहीत; खटल्याचा खर्च भागविण्यासाठी या कुटुंबीयांना घरातील भांडीकुडी विकावी लागतात. 

‘गुरू, डॉक्टर, वकील हे देवासमान’राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी सांगितले की, दुसऱ्यांचे आयुष्य संपविणारे काही लोक बाहेर मोकाट फिरत असतात; मात्र सामान्य माणूस किरकोळ गुन्ह्यासाठी वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडतो. मी एका छोट्या खेड्यातून आले आहे. तिथे आम्ही गुरू, डॉक्टर, वकील या तिघांना देव मानतो. गुरू ज्ञान देऊन, डॉक्टर जीवनदान देऊन, वकील न्याय मिळवून देण्याचे काम करून एक प्रकारे ईश्वरी कार्यच करत असतात. आमदार, राज्यपाल असताना समाजहिताच्या दृष्टीने मी काही विचार केला होता. पण ते प्रत्यक्षात येऊ न शकल्याची खंत वाटते असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी सांगितले की, भारतीय राज्यघटनेचे विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्याययंत्रणा हे तीन महत्त्वाचे स्तंभ आहेत.

ते तीन शब्द म्हणजे प्रतिज्ञाच  संविधानाच्या प्रस्तावनेतील  ‘वुई द पीपल’ हे सुरुवातीचे तीन शब्द हे केवळ शब्द नसून एक आवाहन, प्रतिज्ञा आणि विश्वास आहेत. यंदाचा संविधान दिवस विशेष महत्त्वाचा आहे. कारण यंदा स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आज जग भारताकडे खूप आशेने पाहत आहे. आपला देश आज विविधतेवर गर्व करीत सर्व सामर्थ्यानिशी मार्गक्रमण करीत आहे. यामागे सर्वांत मोठी शक्ती संविधानाची आहे.     - नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

न्यायव्यवस्थेने लोकांपर्यंत पोहोचावे लोक आपल्यापर्यंत येतील याची वाट न पाहता, न्यायव्यवस्थेने लोकांपर्यंत पोहोचायला हवे. देशातील प्रत्येकाचे हात कायद्यापर्यंत पोहोचतील, याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी भारतीय न्यायव्यवस्था अनेक सुधारणा घडवून आणण्यासाठी पुढाकारही घेत आहे.    - डी. वाय. चंद्रचूड, सरन्यायाधीश 

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूjailतुरुंग