शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

सत्तेवर आल्यापासूनची मोदी सरकारची सर्वात खराब कामगिरी; ७२ टक्के जनता म्हणतेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 12:22 IST

नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून प्रथमच तीन चतुर्थांश लोकांनी व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील महागाई अनियंत्रित झाल्याचं मत तीन चतुर्थांश लोकांनी व्यक्त केलं आहे. आयएएनएस-सी व्होटरनं अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर एक सर्व्हे केला होता. मोदी पंतप्रधान झाल्यापासून महागाईत नियंत्रणाबाहेर गेल्याचं ७२.१ टक्के लोकांना वाटतं. २०१५ मध्ये हेच प्रमाण १७.१ टक्के होतं. मोदींच्या कार्यकाळात वस्तू आणि सेवांच्या किमती कमी झाल्याचं मत केवळ १०.८ टक्के व्यक्त केलं होतं. तर १२.८ टक्के लोकांनी काहीच बदललं नसल्याचं म्हटलं आहे. २०१४ नंतर पहिल्यांदाच आर्थिक आघाडीवर सरकारची कामगिरी इतकी खराब झाली आहे.देशात पहिल्यांदाच स्थापन होऊ शकते 'बॅड बँक'; अर्थमंत्री महत्त्वाची घोषणा करणार?पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या कार्यकाळात देशाची आर्थिक आघाडीवरील कामगिरी अपेक्षेपेक्षा खराब झाल्याचं मत ४६.४ टक्के लोकांनी व्यक्त केलं. सरकारची कामगिरी अपेक्षापेक्षा चांगली असल्याचं केवळ ३१.७ टक्के जणांना वाटतं. गेल्या १० वर्षांतील ही सर्वात वाईट कामगिरी आहे. महागाई वाढल्याचा अतिशय जास्त परिणाम झाल्याचं मत ३८.२ टक्के लोकांनी व्यक्त केलं. तर ३४.३ टक्के जणांना थोडा परिणाम झाल्याचं वाटतं.बजेटच्या दिवसाची सुरुवात गोड; सेन्सेक्स ४४३ अंकांनी वधारलागेल्या वर्षभरात जीवनमानाचा दर्जा खालावला असल्याचं जवळपास निम्म्या लोकांनी सांगितलं. गेल्या एका वर्षांच्या कालावधीत सामान्य माणसाच्या जीवनमानाचा दर्जा घसरला असल्याचं ४८.४ टक्के लोकांना वाटतं. तर सर्व्हेत सहभागी झालेल्या २८.८ टक्के जणांना जीवनमानाचा दर्जा सुधारल्याचं वाटतं. तर जीवनमानाच्या दर्जात कोणताही बदल न झाल्याचं मत २१.३ टक्के लोकांनी व्यक्त केलं.सर्व्हेत सहभागी झालेल्या लोकांनी येणाऱ्या दिवसांबद्दल आशावाद व्यक्त केला. येत्या वर्षभरात जीवनामानाचा दर्जा सुधारेल, असं ३७.४ टक्के लोकांना वाटतं. पण २५.८ टक्के लोकांना जीवनमानाचा दर्जा आणखी खालावेल असं वाटतं. तर २१.७ टक्के लोकांना जीवनमानाचा दर्जा तसाच राहील असं वाटतं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInflationमहागाई