शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Budget 2023: देशात न घाबरता निर्णय घेणारे सरकार, अधिवेशनात राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 07:03 IST

Budget 2023: ‘भारतात प्रबळ इच्छाशक्ती असलेले सरकार आहे. हे सरकार न घाबरता काम करत आहे. विकास आणि समृद्ध वारसा जपत या सरकारने कोणताही भेदभाव न करता अनेक मोठे निर्णय घेतले आहेत,’

नवी दिल्ली : ‘भारतात प्रबळ इच्छाशक्ती असलेले सरकार आहे. हे सरकार न घाबरता काम करत आहे. विकास आणि समृद्ध वारसा जपत या सरकारने कोणताही भेदभाव न करता अनेक मोठे निर्णय घेतले आहेत,’ असे सांगत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला आगामी २५ वर्षांत स्वावलंबी बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात त्यांनी सुमार ६४ मिनिटे संबोधन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राइक, दहशतवादावरील कठोरता, कलम ३७० आणि तिहेरी तलाकविषयी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला. 

मुर्मू म्हणाल्या, आपल्याला एक आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे, जिथे गरिबी नाही आणि मध्यमवर्ग समृद्ध आहे. मुर्मू यांनी ११ कोटी छोट्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी २.२५ लाख कोटी रुपयांच्या सन्मान निधीचाही उल्लेख करून गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू ठेवण्याबाबत सूतोवाच केले.

अभिभाषणातील मुद्दे- जगातील दहाव्या अर्थव्यवस्थेपासून आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. - कोरोना काळात भारताने २ वर्षांत २२० कोटींहून अधिक लसीचे डोस दिले.- नियंत्रण रेषेपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत प्रत्येक गैरप्रकाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले.-आयुष्यमान भारत आणि जनऔषधी प्रकल्पामुळे गरिबांना एक लाख कोटी रुपयांची मदत झाली.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूBudgetअर्थसंकल्प 2023