शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2022: शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय? जाणून घ्या १० महत्त्वाच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:58 IST

Budget for Agriculture Sector: शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा देण्यासाठी पीपीपी मॉडेलमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सरकारने या बजेटमध्ये कृषी क्षेत्राशी निगडीत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी तांदूळ आणि गहू खरेदी वाढवण्याचा निर्णयाचा घेतला आहे. कृषी सेक्टरमध्ये ड्रोनचा वापर करण्यावर भर देणार असल्याची घोषणाही केली. बुंदेलखंडच्या केन-बतवा-नदी परियोजनेसाठी ४४ हजार ६०५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

कृषी क्षेत्रासाठी १० महत्त्वाच्या घोषणा

रबी २०२१-२२ मध्ये १६३ लाख शेतकऱ्यांकडून १२०८ मेट्रीक टन गहू आणि तांदूळ खरेदी करण्याची योजना

MSP किंमतीची भरपाई केली जाणार. रासायनिक खतांवरील निर्भरता कमी केली जाणार आहे. त्याचसोबत कृषी क्षेत्रात शेतीसाठी ड्रोनचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.

राज्यातील महाविद्यालयांमध्ये कृषी अभ्यासक्रमात बदल केले जाणार आहे. त्यामुळे आधुनिक आणि झीरो बजेट शेतीबद्दल नवीन शोध केले जातील.

२०२१-२२ मध्ये १ हजार एमएलटी तांदूळ खरेदी केली जाईल. ज्यात १ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल.

केन-बतवा परियोजनेसाठी ४४ हजार ६०५ कोटींची तरतूद केली गेली. त्यामुळे ९ लाख हेक्टर अधिक जमिनीला  सिंचनाचं पाणी उपलब्ध होईल.

राज्य सरकारे आणि एमएसएमईंना सोबत घेऊन नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक पॅकेज सादर केले जाईल.

तेल-बियांच्या आयातीवरील निर्भरता कमी करण्यासाठी पावले उचलली जातील. यासोबतच तेल-बियांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी सर्वसमावेशक योजना राबविण्यात येणार आहे.

गंगा कॉरिडॉरच्या आसपासच्या भागात नैसर्गिक शेतीला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा देण्यासाठी पीपीपी मॉडेलमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

नैसर्गिक शून्य बजेट आणि सेंद्रिय शेती, आधुनिक शेती, मूल्यवर्धन आणि व्यवस्थापन यावर भर दिला जाईल.

अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. शेतकऱ्यांकडून विक्रमी खरेदी केली जाईल. शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्याचे काम केले जाईल.२०२२-२३ मध्ये ६० किमी लांबीचे रोपवे तयार केले जातील. भारतातील गरिबी हटवण्यासाठी प्रयत्न केले जातील. सरकारने एमएसपीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात २.३७ कोटी रुपये पाठवले आहेत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. शासनाकडून रासायनिक व कीटकनाशक मुक्त शेतीचा प्रसार करण्यावर भर दिला जाईल.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022