शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Budget 2022: शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय? जाणून घ्या १० महत्त्वाच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:58 IST

Budget for Agriculture Sector: शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा देण्यासाठी पीपीपी मॉडेलमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सरकारने या बजेटमध्ये कृषी क्षेत्राशी निगडीत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी तांदूळ आणि गहू खरेदी वाढवण्याचा निर्णयाचा घेतला आहे. कृषी सेक्टरमध्ये ड्रोनचा वापर करण्यावर भर देणार असल्याची घोषणाही केली. बुंदेलखंडच्या केन-बतवा-नदी परियोजनेसाठी ४४ हजार ६०५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

कृषी क्षेत्रासाठी १० महत्त्वाच्या घोषणा

रबी २०२१-२२ मध्ये १६३ लाख शेतकऱ्यांकडून १२०८ मेट्रीक टन गहू आणि तांदूळ खरेदी करण्याची योजना

MSP किंमतीची भरपाई केली जाणार. रासायनिक खतांवरील निर्भरता कमी केली जाणार आहे. त्याचसोबत कृषी क्षेत्रात शेतीसाठी ड्रोनचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.

राज्यातील महाविद्यालयांमध्ये कृषी अभ्यासक्रमात बदल केले जाणार आहे. त्यामुळे आधुनिक आणि झीरो बजेट शेतीबद्दल नवीन शोध केले जातील.

२०२१-२२ मध्ये १ हजार एमएलटी तांदूळ खरेदी केली जाईल. ज्यात १ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल.

केन-बतवा परियोजनेसाठी ४४ हजार ६०५ कोटींची तरतूद केली गेली. त्यामुळे ९ लाख हेक्टर अधिक जमिनीला  सिंचनाचं पाणी उपलब्ध होईल.

राज्य सरकारे आणि एमएसएमईंना सोबत घेऊन नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक पॅकेज सादर केले जाईल.

तेल-बियांच्या आयातीवरील निर्भरता कमी करण्यासाठी पावले उचलली जातील. यासोबतच तेल-बियांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी सर्वसमावेशक योजना राबविण्यात येणार आहे.

गंगा कॉरिडॉरच्या आसपासच्या भागात नैसर्गिक शेतीला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा देण्यासाठी पीपीपी मॉडेलमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

नैसर्गिक शून्य बजेट आणि सेंद्रिय शेती, आधुनिक शेती, मूल्यवर्धन आणि व्यवस्थापन यावर भर दिला जाईल.

अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. शेतकऱ्यांकडून विक्रमी खरेदी केली जाईल. शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्याचे काम केले जाईल.२०२२-२३ मध्ये ६० किमी लांबीचे रोपवे तयार केले जातील. भारतातील गरिबी हटवण्यासाठी प्रयत्न केले जातील. सरकारने एमएसपीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात २.३७ कोटी रुपये पाठवले आहेत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. शासनाकडून रासायनिक व कीटकनाशक मुक्त शेतीचा प्रसार करण्यावर भर दिला जाईल.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022