शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Budget 2022: शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय? जाणून घ्या १० महत्त्वाच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:58 IST

Budget for Agriculture Sector: शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा देण्यासाठी पीपीपी मॉडेलमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सरकारने या बजेटमध्ये कृषी क्षेत्राशी निगडीत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी तांदूळ आणि गहू खरेदी वाढवण्याचा निर्णयाचा घेतला आहे. कृषी सेक्टरमध्ये ड्रोनचा वापर करण्यावर भर देणार असल्याची घोषणाही केली. बुंदेलखंडच्या केन-बतवा-नदी परियोजनेसाठी ४४ हजार ६०५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

कृषी क्षेत्रासाठी १० महत्त्वाच्या घोषणा

रबी २०२१-२२ मध्ये १६३ लाख शेतकऱ्यांकडून १२०८ मेट्रीक टन गहू आणि तांदूळ खरेदी करण्याची योजना

MSP किंमतीची भरपाई केली जाणार. रासायनिक खतांवरील निर्भरता कमी केली जाणार आहे. त्याचसोबत कृषी क्षेत्रात शेतीसाठी ड्रोनचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.

राज्यातील महाविद्यालयांमध्ये कृषी अभ्यासक्रमात बदल केले जाणार आहे. त्यामुळे आधुनिक आणि झीरो बजेट शेतीबद्दल नवीन शोध केले जातील.

२०२१-२२ मध्ये १ हजार एमएलटी तांदूळ खरेदी केली जाईल. ज्यात १ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल.

केन-बतवा परियोजनेसाठी ४४ हजार ६०५ कोटींची तरतूद केली गेली. त्यामुळे ९ लाख हेक्टर अधिक जमिनीला  सिंचनाचं पाणी उपलब्ध होईल.

राज्य सरकारे आणि एमएसएमईंना सोबत घेऊन नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक पॅकेज सादर केले जाईल.

तेल-बियांच्या आयातीवरील निर्भरता कमी करण्यासाठी पावले उचलली जातील. यासोबतच तेल-बियांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी सर्वसमावेशक योजना राबविण्यात येणार आहे.

गंगा कॉरिडॉरच्या आसपासच्या भागात नैसर्गिक शेतीला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा देण्यासाठी पीपीपी मॉडेलमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे.

नैसर्गिक शून्य बजेट आणि सेंद्रिय शेती, आधुनिक शेती, मूल्यवर्धन आणि व्यवस्थापन यावर भर दिला जाईल.

अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. शेतकऱ्यांकडून विक्रमी खरेदी केली जाईल. शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्याचे काम केले जाईल.२०२२-२३ मध्ये ६० किमी लांबीचे रोपवे तयार केले जातील. भारतातील गरिबी हटवण्यासाठी प्रयत्न केले जातील. सरकारने एमएसपीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात २.३७ कोटी रुपये पाठवले आहेत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. शासनाकडून रासायनिक व कीटकनाशक मुक्त शेतीचा प्रसार करण्यावर भर दिला जाईल.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022