शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Budget 2022: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत मोदी सरकार; एका बाणात अनेक पक्षी मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 08:27 IST

Budget 2022: कोरोना संकट काळात अर्थव्यवस्थेला हात देणाऱ्या कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करत असलेल्या सीतारामन यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आहे. कोरोना संकटाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं आव्हान सीतारामन यांच्यासमोर आहे. विविध मागण्यांसाठी वर्षभर शेतकरी आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाचा फटका पंजाब, उत्तर प्रदेशात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत.

कोरोना संकटातून बाहेर पडणाऱ्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. त्यातही ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेवर सरकारचं विशेष लक्ष आहे. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत. पीएम किसान सन्मान निधीत वाढ अपेक्षित आहे. पीएम किसान सन्मान निधी ६ हजाराहून अधिक केल्यास केवळ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल, असं कृषी क्षेत्राचे जाणकार सांगतात.

कोरोना संकटात जवळपास सर्वच क्षेत्रांना फटका बसला. मात्र कृषी क्षेत्रानं अर्थव्यवस्थेला हात दिला. कोरोना महामारीच्या काळात शेतीनं अर्थव्यवस्थेला तारलं. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधीसह विविध घोषणा अपेक्षित आहेत. किसान सन्मान निधी वाढवण्यात आल्यास शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. सध्या महागाई वाढत असल्यानं त्या आघाडीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. महागाईमुळे शेतीसाठी वापरात येणाऱ्या खतांच्या, बियाणांच्या किमती वाढल्या आहेत. किसान सन्मान निधीत वाढ केल्यास शेतकऱ्यांना त्याचा आधार मिळेल.

...तर शेतीतून मिळणारं उत्पन्न वाढणारपीएम किसान सन्मान निधीत वाढ झाल्यास शेतकऱ्यांच्या हाती अधिकची रक्कम पडेल. त्याचा वापर ते उत्पन्न वाढवण्यासाठी करू शकतात, असं आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (रिसर्च) अनुज गुप्ता यांनी सांगितलं. सरकारनं नुकतीच खाद्य तेलाशी संबंधित योजना सुरू केली. यामुळे खाद्य तेलाची आयात कमी होऊ शकते. उत्पन्न वाढल्यास शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढेल. याचा फायदा अर्थव्यवस्थेला होईल.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022nirmala sitharamanनिर्मला सीतारामन