शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Budget 2022: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत मोदी सरकार; एका बाणात अनेक पक्षी मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 08:27 IST

Budget 2022: कोरोना संकट काळात अर्थव्यवस्थेला हात देणाऱ्या कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करत असलेल्या सीतारामन यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आहे. कोरोना संकटाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं आव्हान सीतारामन यांच्यासमोर आहे. विविध मागण्यांसाठी वर्षभर शेतकरी आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाचा फटका पंजाब, उत्तर प्रदेशात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत.

कोरोना संकटातून बाहेर पडणाऱ्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. त्यातही ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेवर सरकारचं विशेष लक्ष आहे. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत. पीएम किसान सन्मान निधीत वाढ अपेक्षित आहे. पीएम किसान सन्मान निधी ६ हजाराहून अधिक केल्यास केवळ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल, असं कृषी क्षेत्राचे जाणकार सांगतात.

कोरोना संकटात जवळपास सर्वच क्षेत्रांना फटका बसला. मात्र कृषी क्षेत्रानं अर्थव्यवस्थेला हात दिला. कोरोना महामारीच्या काळात शेतीनं अर्थव्यवस्थेला तारलं. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधीसह विविध घोषणा अपेक्षित आहेत. किसान सन्मान निधी वाढवण्यात आल्यास शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल. सध्या महागाई वाढत असल्यानं त्या आघाडीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. महागाईमुळे शेतीसाठी वापरात येणाऱ्या खतांच्या, बियाणांच्या किमती वाढल्या आहेत. किसान सन्मान निधीत वाढ केल्यास शेतकऱ्यांना त्याचा आधार मिळेल.

...तर शेतीतून मिळणारं उत्पन्न वाढणारपीएम किसान सन्मान निधीत वाढ झाल्यास शेतकऱ्यांच्या हाती अधिकची रक्कम पडेल. त्याचा वापर ते उत्पन्न वाढवण्यासाठी करू शकतात, असं आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (रिसर्च) अनुज गुप्ता यांनी सांगितलं. सरकारनं नुकतीच खाद्य तेलाशी संबंधित योजना सुरू केली. यामुळे खाद्य तेलाची आयात कमी होऊ शकते. उत्पन्न वाढल्यास शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढेल. याचा फायदा अर्थव्यवस्थेला होईल.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022nirmala sitharamanनिर्मला सीतारामन