शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

Budget 2020: विचारधारांवरून भांडणाऱ्या नेत्यांना अन् समर्थकांना राष्ट्रपतींनी शिकवली 'देशभक्ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 12:37 IST

देशात मागील काही काळापासून विविध मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत आहेत

ठळक मुद्देदेशात सध्या दोन गट पडल्याचं दिसून येत आहेआपण देशाचे नागरिक आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजेभारताने नेहमीच सर्वधर्म समभावाचा पुरस्कार केला आहे.

नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना देशातील नागरिकांसाठी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कोणत्याही विचारसरणीचे नेते अथवा समर्थक होण्यापूर्वी आपण देशाचे नागरिक आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे, देशाची प्रतिष्ठा आपल्या पक्षाच्या निष्ठेपेक्षा अधिक असायला हवी असं आवाहन रामनाथ कोविंद यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. 

देशात मागील काही काळापासून विविध मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत आहेत. अशातच कलम ३७० हटवणे, जम्मू काश्मीर आणि लडाख विभाजन करणे, मुस्लीम महिलांच्या न्याय देण्यासाठी तिहेरी तलाक विधेयक आणणं, शेजारील राष्ट्रातील अल्पसंख्यांकांना भारताचं नागरिकत्व मिळावं यासाठी नागरिकत्व कायद्यात सुधारणा करणे असे महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. त्यामुळे देशात सध्या दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. सरकारचं समर्थन करणारे आणि सरकारचा विरोध करणारे अशा गटात देशाचा नागरीक विखुरला गेला आहे. 

सोशल मीडियापासून रस्त्यावरील आंदोलनापर्यत अनेक ठिकाणी लोकं व्यक्त होऊ लागली आहे. काही ठिकाणी हिंसक घटना घडत आहेत. मुस्लीम आणि हिंदू अशा भावनेने लोकं आपली मतं मांडत आहेत. त्यामुळे लोकशाहीवादी देशाची प्रतिष्ठा जपणं महत्वाचं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींना हा मोलाचा सल्ला देशातील नागरिकांना दिला आहे. 

अभिभाषणादरम्यान राष्ट्रपतींच्या 'त्या' विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट 

आपल्या अभिभाषणामध्ये राष्ट्रपती म्हणाले की, भारताने नेहमीच सर्वधर्म समभावाचा पुरस्कार केला आहे. फाळणीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत जे नागरिक पाकिस्तानमध्ये राहू शकत नाहीत. ते भारतात येऊ शकतात, असे राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांनी सांगितले होते. अशा नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची संधी उपलब्झ करून देणे हे भारताचे कर्तव्य आहे. बापूजींच्या विचारांना पाठिंबा देताना अनेक राजकीय पक्षांनी हा विचार पुढे नेला याचा मला आनंद आहे. तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा करून त्यांच्या इच्छेचा मान राखला याचे मला समाधान आहे. 

निषेधाच्या नावाखाली हिंसाचार; राष्ट्रपतींनीच एका वाक्यात टोचले कान

टॅग्स :budget 2020बजेटRamnath Kovindरामनाथ कोविंदMuslimमुस्लीमHinduहिंदूcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत