शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

Budget 2020: विचारधारांवरून भांडणाऱ्या नेत्यांना अन् समर्थकांना राष्ट्रपतींनी शिकवली 'देशभक्ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 12:37 IST

देशात मागील काही काळापासून विविध मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत आहेत

ठळक मुद्देदेशात सध्या दोन गट पडल्याचं दिसून येत आहेआपण देशाचे नागरिक आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजेभारताने नेहमीच सर्वधर्म समभावाचा पुरस्कार केला आहे.

नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना देशातील नागरिकांसाठी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कोणत्याही विचारसरणीचे नेते अथवा समर्थक होण्यापूर्वी आपण देशाचे नागरिक आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे, देशाची प्रतिष्ठा आपल्या पक्षाच्या निष्ठेपेक्षा अधिक असायला हवी असं आवाहन रामनाथ कोविंद यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. 

देशात मागील काही काळापासून विविध मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत आहेत. अशातच कलम ३७० हटवणे, जम्मू काश्मीर आणि लडाख विभाजन करणे, मुस्लीम महिलांच्या न्याय देण्यासाठी तिहेरी तलाक विधेयक आणणं, शेजारील राष्ट्रातील अल्पसंख्यांकांना भारताचं नागरिकत्व मिळावं यासाठी नागरिकत्व कायद्यात सुधारणा करणे असे महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. त्यामुळे देशात सध्या दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. सरकारचं समर्थन करणारे आणि सरकारचा विरोध करणारे अशा गटात देशाचा नागरीक विखुरला गेला आहे. 

सोशल मीडियापासून रस्त्यावरील आंदोलनापर्यत अनेक ठिकाणी लोकं व्यक्त होऊ लागली आहे. काही ठिकाणी हिंसक घटना घडत आहेत. मुस्लीम आणि हिंदू अशा भावनेने लोकं आपली मतं मांडत आहेत. त्यामुळे लोकशाहीवादी देशाची प्रतिष्ठा जपणं महत्वाचं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींना हा मोलाचा सल्ला देशातील नागरिकांना दिला आहे. 

अभिभाषणादरम्यान राष्ट्रपतींच्या 'त्या' विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट 

आपल्या अभिभाषणामध्ये राष्ट्रपती म्हणाले की, भारताने नेहमीच सर्वधर्म समभावाचा पुरस्कार केला आहे. फाळणीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत जे नागरिक पाकिस्तानमध्ये राहू शकत नाहीत. ते भारतात येऊ शकतात, असे राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांनी सांगितले होते. अशा नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची संधी उपलब्झ करून देणे हे भारताचे कर्तव्य आहे. बापूजींच्या विचारांना पाठिंबा देताना अनेक राजकीय पक्षांनी हा विचार पुढे नेला याचा मला आनंद आहे. तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा करून त्यांच्या इच्छेचा मान राखला याचे मला समाधान आहे. 

निषेधाच्या नावाखाली हिंसाचार; राष्ट्रपतींनीच एका वाक्यात टोचले कान

टॅग्स :budget 2020बजेटRamnath Kovindरामनाथ कोविंदMuslimमुस्लीमHinduहिंदूcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत