शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020: विचारधारांवरून भांडणाऱ्या नेत्यांना अन् समर्थकांना राष्ट्रपतींनी शिकवली 'देशभक्ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 12:37 IST

देशात मागील काही काळापासून विविध मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत आहेत

ठळक मुद्देदेशात सध्या दोन गट पडल्याचं दिसून येत आहेआपण देशाचे नागरिक आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजेभारताने नेहमीच सर्वधर्म समभावाचा पुरस्कार केला आहे.

नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना देशातील नागरिकांसाठी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कोणत्याही विचारसरणीचे नेते अथवा समर्थक होण्यापूर्वी आपण देशाचे नागरिक आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे, देशाची प्रतिष्ठा आपल्या पक्षाच्या निष्ठेपेक्षा अधिक असायला हवी असं आवाहन रामनाथ कोविंद यांनी अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. 

देशात मागील काही काळापासून विविध मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत आहेत. अशातच कलम ३७० हटवणे, जम्मू काश्मीर आणि लडाख विभाजन करणे, मुस्लीम महिलांच्या न्याय देण्यासाठी तिहेरी तलाक विधेयक आणणं, शेजारील राष्ट्रातील अल्पसंख्यांकांना भारताचं नागरिकत्व मिळावं यासाठी नागरिकत्व कायद्यात सुधारणा करणे असे महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. त्यामुळे देशात सध्या दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. सरकारचं समर्थन करणारे आणि सरकारचा विरोध करणारे अशा गटात देशाचा नागरीक विखुरला गेला आहे. 

सोशल मीडियापासून रस्त्यावरील आंदोलनापर्यत अनेक ठिकाणी लोकं व्यक्त होऊ लागली आहे. काही ठिकाणी हिंसक घटना घडत आहेत. मुस्लीम आणि हिंदू अशा भावनेने लोकं आपली मतं मांडत आहेत. त्यामुळे लोकशाहीवादी देशाची प्रतिष्ठा जपणं महत्वाचं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींना हा मोलाचा सल्ला देशातील नागरिकांना दिला आहे. 

अभिभाषणादरम्यान राष्ट्रपतींच्या 'त्या' विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट 

आपल्या अभिभाषणामध्ये राष्ट्रपती म्हणाले की, भारताने नेहमीच सर्वधर्म समभावाचा पुरस्कार केला आहे. फाळणीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत जे नागरिक पाकिस्तानमध्ये राहू शकत नाहीत. ते भारतात येऊ शकतात, असे राष्ट्रपिता माहात्मा गांधी यांनी सांगितले होते. अशा नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची संधी उपलब्झ करून देणे हे भारताचे कर्तव्य आहे. बापूजींच्या विचारांना पाठिंबा देताना अनेक राजकीय पक्षांनी हा विचार पुढे नेला याचा मला आनंद आहे. तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा करून त्यांच्या इच्छेचा मान राखला याचे मला समाधान आहे. 

निषेधाच्या नावाखाली हिंसाचार; राष्ट्रपतींनीच एका वाक्यात टोचले कान

टॅग्स :budget 2020बजेटRamnath Kovindरामनाथ कोविंदMuslimमुस्लीमHinduहिंदूcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत