शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

Budget 2018 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 07:59 IST

स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मुंबई - स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मद्रासमध्ये पेशाने वकील आणि उद्योजक असणाऱ्या चेट्टी यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात विविध पदे भूषविली.  1920 ते 1922 या काळामध्ये चेट्टी मद्रास लेजिस्लेटिव्ह कौन्सीलमध्ये कार्यरत होते, त्यानंतर त्यांनी स्वराज पक्षामध्ये प्रवेश केला आणि 1924 साली केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे सदस्य म्हणून निवडून गेले.  ओटावा येथे 1932 साली झालेल्या इम्पेरियल अर्थपरिषदेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 1932 मध्ये ते केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे उपसभापती आणि नंतर सभापती झाले. त्यानंतर 1935मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

1935 ते 1941 अशा सहा वर्षांच्या काळामध्ये ते कोचीन संस्थाचे दिवाण होते. कोचीन बंदराचा विकास करण्यासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या होत्या. 1938 साली जीनिव्हामध्ये लिग ऑफ नेशन्ससाठी भारताचे प्रतिनिधी म्हणूनही चेट्टी गेले होते. त्यानंतर ते अल्पकाळासाठी भोपाळच्या नवाबाचे घटनात्मक विषयांचे सल्लागार झाले. 

स्वतंत्र भारताचे ते पहिले अर्थमंत्री म्हणून नेमले गेले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्यांना मिळाली. या अर्थसंकल्पात 171.15 कोटी रुपये महसूलाची नोंद आणि 25.59 कोटी रुपयांची वित्तीय तूट नोंदवली होती. अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द केवळ साडेसात महिन्यांची होती. त्यानंतर त्यांच्या जागी जॉन मथाई यांची नियुक्ती करण्यात आली. 5 मे 1953 रोजी षण्मुखम चेट्टी यांचे हृदयविकाराने निधन झाले.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८