शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 07:59 IST

स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मुंबई - स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मद्रासमध्ये पेशाने वकील आणि उद्योजक असणाऱ्या चेट्टी यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात विविध पदे भूषविली.  1920 ते 1922 या काळामध्ये चेट्टी मद्रास लेजिस्लेटिव्ह कौन्सीलमध्ये कार्यरत होते, त्यानंतर त्यांनी स्वराज पक्षामध्ये प्रवेश केला आणि 1924 साली केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे सदस्य म्हणून निवडून गेले.  ओटावा येथे 1932 साली झालेल्या इम्पेरियल अर्थपरिषदेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 1932 मध्ये ते केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे उपसभापती आणि नंतर सभापती झाले. त्यानंतर 1935मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

1935 ते 1941 अशा सहा वर्षांच्या काळामध्ये ते कोचीन संस्थाचे दिवाण होते. कोचीन बंदराचा विकास करण्यासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या होत्या. 1938 साली जीनिव्हामध्ये लिग ऑफ नेशन्ससाठी भारताचे प्रतिनिधी म्हणूनही चेट्टी गेले होते. त्यानंतर ते अल्पकाळासाठी भोपाळच्या नवाबाचे घटनात्मक विषयांचे सल्लागार झाले. 

स्वतंत्र भारताचे ते पहिले अर्थमंत्री म्हणून नेमले गेले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्यांना मिळाली. या अर्थसंकल्पात 171.15 कोटी रुपये महसूलाची नोंद आणि 25.59 कोटी रुपयांची वित्तीय तूट नोंदवली होती. अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द केवळ साडेसात महिन्यांची होती. त्यानंतर त्यांच्या जागी जॉन मथाई यांची नियुक्ती करण्यात आली. 5 मे 1953 रोजी षण्मुखम चेट्टी यांचे हृदयविकाराने निधन झाले.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८