शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018; जन्मदिनी अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 13:59 IST

या अर्थमंत्र्यांचा वाढदिवस चार वर्षांतून एकदा येत असे, त्याचप्रमाणे सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प सादर करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

ठळक मुद्देआणीबाणीनंतर काँग्रेसला देशातील जनतेने नाकारल्यावर जनता सरकारचे नेते बनण्याचा मान मोरारजी देसाई यांना मिळाला मात्र त्यांची ही कारकिर्द मोठी नव्हती.

मुंबई- स्वातंत्र्यानंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी पार पाडली आहे. मात्र काही नेत्यांनी ही जबाबदारी अनेकवेळा पार पाडली आहे. भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना ही संधी 10 वेळा मिळाली आहे. त्यांच्यापाठोपाठ पी. चिदम्बरम यांना अर्थसंकल्प मांडण्याची संधी 8 वेळा मिळाली आहे. मोरारजी देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 रोजी गुजरातमध्ये झाला होता. त्यामुळे त्यांचा वाढदिवस केवळ लीप इयरमध्येच येत असे. मोरारजी देसाई यांनी 1960 आणि 1968 साली आपल्या वाढदिवशी म्हणजे 29 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला होता.

मोरारजी देसाई यांचा जन्म तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये असणाऱ्या बलसार जिल्ह्यात (सध्या गुजरात) झाला. स्वातंत्र्यलढ्यामध्येही देसाई यांनी सहभाग घेतला होता. 1952 साली ते मुंबई द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाले, तत्पुर्वी त्यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी होती. 1958 ते 1963 आणि 1967 ते 1969 अशा काळासाठी ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते. 1967 ते 69 या काळामध्ये त्यांच्याकडे उपपंतप्रधानपदाचीही जबाबदारी होती.

1962 साली भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झाले. या युद्धासाठी झालेला खर्च भरुन काढण्याची जबाबदारी देसाई यांच्यावर होती. 1960 ते 63 अशा अर्थसंकल्पामध्ये करांमध्ये वाढ करुन हा खर्च भरुन काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पब्लीक प्रॉव्हिडंट फंड योजनेचे ते जनक होते. देसाई यांनी एक्स्पेंडिचर करही रद्द केला.

1969 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. देसाई यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते अर्थमंत्री होणारे पहिले राजकीय नेते होते. तत्पुर्वी झालेले अर्थमंत्री पेशाने सनदी अधिकारी, अर्थशास्त्राचे प्राध्यापक किंवा उद्योजक होते.

24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979 या काळामध्ये मोरारजी देसाई भारताचे पंतप्रधानही झाले. आणीबाणीनंतर काँग्रेसला देशातील जनतेने नाकारल्यावर जनता सरकारचे नेते बनण्याचा मान त्यांना मिळाला मात्र त्यांची ही कारकिर्द मोठी नव्हती. पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा काळ ते पूर्ण करु शकले नाहीत. त्यांच्यानंतर चौधरी चरणसिंग पंतप्रधान झाले.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Indiaभारत