शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'कॅशलेस इंडिया' योजनेला या 5 पद्धतींनी चालना देऊ शकतात अरुण जेटली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 09:54 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्प 2018मध्ये जेटलींसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी 'कॅशलेस इंडिया' योजनेला आणखी चालना देण्याची जबाबदारी आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्प 2018मध्ये जेटलींसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी 'कॅशलेस इंडिया' योजनेला आणखी चालना देण्याची जबाबदारी आहे. 2016मध्ये नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर कॅशलेस अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात राबवायची असल्याचे अनेकदा सरकारकडून सांगण्यात आले आहे.  मोदी सरकारकडून आतापर्यंत 30 कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त कित्येक सोयीसुविधांना आधार कार्डसोबत जोडण्यात आले आहे आणि याद्वारे काळा पैसा अर्थव्यवस्थेत आणण्यासोबतच अर्थव्यवस्थाच कॅशलेस करण्यावर भर देण्यात आला आहे.  दरम्यान, कॅशलेस प्रणालीत लादण्यात येणा-या शुल्काच्या कारणामुळे लहान व मध्यम व्यावसायिक आणि शहरातील नागरिकांकडून या योजनेला योग्य असा प्रतिसाद मिळालेला नाही.  या पार्श्वभूमीवर, कॅशलेस प्रणालीला चालना देण्यासाठी त्याच्या व्यवहारांवर सरकारकडून लादण्यात येणारे शुल्क रद्द करण्यात येईल व कॅशलेस व्यवहारांवर लाभदेखील देण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

1. पीओएस यंत्रणांची संख्या वाढवणंफिझिकल पॉईंट ऑफ सेल (POS) मशीन अंतर्गत कॅशलेस व्यवहार केले जातात. इंटरनेटद्वारे होणा-या सर्व व्यवहारांची नोंदणी युनिफाईड पेमेन्ट इंटरफेस अंतर्गत केली जाते. सध्या देशात जवळपास 30 लाख  POS मशीन उपलब्ध आहेत, मात्र यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. 

2.कॅशलेस व्यवहार व्हावा अधिभारमुक्त रेल्वेचे तिकीट ऑनलाइन बुक करण्यासाठी लागणा-या अधिभाराला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात आला आहे. NPS, IRCTC आणि PSU सारख्या सरकारी संकेतस्थळांद्वारे लावण्यात येणारा अधिभार रद्द केल्यास कॅशेलस व्यवहारांना अधिक चालना मिळू शकेल.

3. स्वस्त UPI देशातील नागरिकांमध्ये स्मार्टफोन्स वापरण्याची संख्या वाढत आहे आणि इंटरनेट सुविधादेखील स्वस्त होत आहे. यामुळे POS च्या तुलनेत UPI स्वस्त केल्यानंदेखील कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. सध्या कुणालाही भीम अॅपचा रेफरन्स दिल्यास  त्यासाठी 10 रुपये मिळतात. नॅशनल पेमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं ही रक्कम 25 रुपये करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. 

4. ग्रामीण भागातही व्हावी जगजागृती ग्रामीण व शहरी भागांमध्ये कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येथे POS किंवा डिजिटल व्यवहारांवर लाभ देऊन देशातील नागरिकांना कॅशलेस अर्थव्यवस्थेत सहभागी करुन घेतलं जाऊ शकतं.

5. बँकिंग सेवांवरील GSTमध्ये घट करावी सध्या बँकिंग सेवांवरील जीएसटीचा दर 18 टक्के एवढा आहे. यावरील जीएसटीमध्ये घट करण्याची आवश्यकता आहे.  नुकतंच मर्चेंट डिस्काऊंट रेट (MDR)देखील कमी करण्यात आला आहे, मात्र यासोबतच ऑनलाइन व्यवहारांवर लाभ देण्याचीही गरज आहे. बँकांच्या सेवांवर लादण्यात येणा-या शुल्कातही कपात करावी. 

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Arun Jaitleyअरूण जेटलीNarendra Modiनरेंद्र मोदी