शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

Buddha Purnima: निसर्ग संकटात आहे; त्याचा आदर करा हीच तर गौतम बुद्धांची शिकवण: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 14:57 IST

बुद्धपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

ठळक मुद्देगौतम बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे गरजेचे - पंतप्रधानभारताची अर्थव्यवस्था शाश्वत विकासाच्या मार्गावर - पंतप्रधान

नवी दिल्ली: वैशाख पौर्णिमेच्या दिवशी येणारी बुद्धपौर्णिमा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बुद्धपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनाचे मोठे आव्हान आपल्यासमोर असून, आपण त्याचा सामना करत आहोत. मात्र, आपण यावेळी मानवतेसमोर असणाऱ्या इतर आव्हानांकडे आपण दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे ते म्हणाले. (pm modi addressed via video conferencing on occasion of buddha purnima) 

जागतिक स्तरावर झालेल्या हवामान बदलाचे परिणाम आपण पाहात आहोत. हवामानात होणारे बदल, बदलती जीवनशैली पुढील पिढीसाठी धोकादायक आहे. हवामान पद्धतीत बदल होत असून धृवांवरील बर्फ वितळत आहे, नद्या, जंगलं संकटात आहेत. गौतम बुद्धांनी आपल्याला निसर्गाचा आदर करण्याची शिकवण दिली, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 

गौतम बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे गरजेचे

गौतम बुद्ध यांचे जीवन शांतता, एकता आणि सुसंवाद यांच्याशी जोडलेले होते. आजही आपल्यातील काही घटक समाजात तिरस्कार, दहशत आणि हिंसा परसरवत आहेत. मानवतेवर विश्वास असणाऱ्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी गौतम बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार मानले असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे.

अमित शहांविरोधात FIR का नोंदवला नाही? हायकोर्टाची विचारणा; पोलिसांना झापलं

भारताची अर्थव्यवस्था शाश्वत विकासाच्या मार्गावर

मला अभिमान वाटतो की, भारताची अर्थव्यवस्था शाश्वत विकासाच्या मार्गावर चालत आहे. करोनानंतरचे जग आत्तासारखे अजिबात नसेल. आगामी काळात कोरोनाआधी आणि करोनानंतर अशीच चर्चा असेल. पण गेल्या वर्षभरात अनेक महत्वाचे बदलही घडले आहेत. आपल्याकडे लस असून जीव वाचवण्यासाठी आणि कोरोनाचा पराभव करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. कोरोना आल्यानंतर वर्षभरात लस येणे हा मानवी दृढनिश्चय दाखवते. भारताला आपल्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा