शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Buddha Purnima: निसर्ग संकटात आहे; त्याचा आदर करा हीच तर गौतम बुद्धांची शिकवण: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 14:57 IST

बुद्धपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

ठळक मुद्देगौतम बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे गरजेचे - पंतप्रधानभारताची अर्थव्यवस्था शाश्वत विकासाच्या मार्गावर - पंतप्रधान

नवी दिल्ली: वैशाख पौर्णिमेच्या दिवशी येणारी बुद्धपौर्णिमा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बुद्धपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनाचे मोठे आव्हान आपल्यासमोर असून, आपण त्याचा सामना करत आहोत. मात्र, आपण यावेळी मानवतेसमोर असणाऱ्या इतर आव्हानांकडे आपण दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे ते म्हणाले. (pm modi addressed via video conferencing on occasion of buddha purnima) 

जागतिक स्तरावर झालेल्या हवामान बदलाचे परिणाम आपण पाहात आहोत. हवामानात होणारे बदल, बदलती जीवनशैली पुढील पिढीसाठी धोकादायक आहे. हवामान पद्धतीत बदल होत असून धृवांवरील बर्फ वितळत आहे, नद्या, जंगलं संकटात आहेत. गौतम बुद्धांनी आपल्याला निसर्गाचा आदर करण्याची शिकवण दिली, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना नमूद केले. 

गौतम बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे गरजेचे

गौतम बुद्ध यांचे जीवन शांतता, एकता आणि सुसंवाद यांच्याशी जोडलेले होते. आजही आपल्यातील काही घटक समाजात तिरस्कार, दहशत आणि हिंसा परसरवत आहेत. मानवतेवर विश्वास असणाऱ्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी गौतम बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे, असे सांगत पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार मानले असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे.

अमित शहांविरोधात FIR का नोंदवला नाही? हायकोर्टाची विचारणा; पोलिसांना झापलं

भारताची अर्थव्यवस्था शाश्वत विकासाच्या मार्गावर

मला अभिमान वाटतो की, भारताची अर्थव्यवस्था शाश्वत विकासाच्या मार्गावर चालत आहे. करोनानंतरचे जग आत्तासारखे अजिबात नसेल. आगामी काळात कोरोनाआधी आणि करोनानंतर अशीच चर्चा असेल. पण गेल्या वर्षभरात अनेक महत्वाचे बदलही घडले आहेत. आपल्याकडे लस असून जीव वाचवण्यासाठी आणि कोरोनाचा पराभव करण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. कोरोना आल्यानंतर वर्षभरात लस येणे हा मानवी दृढनिश्चय दाखवते. भारताला आपल्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा