शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

चंद्रशेखर रावण यांच्या सहकार्याने काँग्रेस देणार बसपाला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 07:04 IST

नवी समीकरणे : प्रियंका गांधी : चंद्रशेखर यांच्यात चर्चा

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील दलित नेते चंद्रशेखर आझाद रावण यांच्याशी चर्चा केल्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठा संदेश गेला आहे. आपल्या आघाडीतून काँग्रेसला बाहेर ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेणाऱ्या बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यासाठी हा मोठा राजकीय संकेत मानला जात आहे.पश्चिम उत्तर प्रदेशात चंद्रशेखर आझाद रावण यांनी अलीकडच्या काळात दलितांमधील आपली हजेरी वाढविली आहे. तथापि, या चर्चेबाबत बसपामध्ये मोठा असंतोष असल्याची बाब समोर आली आहे. अर्थात, मायावती यांनी या चर्चेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. असे सांगितले जात आहे की, सपा-बसपा आघाडीतून काँग्रेसला बाहेर ठेवण्यात मायावती यांची महत्त्वाची भूमिका होती. यामुळे काँग्रेस नाराज आहे. त्यामुळेच त्यांनी चंद्रशेखर यांच्या निमित्ताने बसपाला राजकीय मात देण्याचा निश्चय केला.चंद्रशेखर आझाद रावण म्हणतात की, ते बहुजन समाजात जन्मले आहेत आणि त्यातच अखेरपर्यंत राहू. मायावतींकडून याच समाजाचे राजकारण केले जाते. आपले नेते म्हणून चंद्रशेखर आझाद रावण हे कांशीराम यांचे नाव घेतात. कांशीराम हे आपले आदर्श असल्याचे ते सांगतात. त्यामुळे बसपा अधिक अस्वस्थ होत आहे. त्यामुळेच चंद्रशेखर यांच्याबाबत मायावती यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, त्यांना पक्षात का घेतले जात नाही? त्याच्या प्रत्युत्तरात त्यांनी सांगितले की, काही लोक लाभ घेण्यासाठी पुढे येऊ इच्छितात. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी चंद्रशेखर आझाद रावण यांच्याशी चर्चा करून हे संकेतही दिले आहेत की, त्या आपल्या पक्षात तरुणांची आणि विशेषत: दलित तरुणांची फौज तयार करण्यात व्यस्त आहेत. उत्तर प्रदेशात ही उणीव चंद्रशेखर आझाद यांच्या रूपाने समाप्त होताना दिसत आहे. यामुळे काँग्रेसला उत्तर प्रदेशात दलित मते वाढविण्यास मदत तर होईलच; पण एक मजबूत जनाधार असणारा दलित वक्ताही मिळणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीSamajwadi Partyसमाजवादी पार्टी