शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

बीएसएनएलला डावलून सरकारची जिओला साथ; संपाचा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 08:58 IST

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या कर्मचारी संघटनांनी दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक संकटासाठी रिलायन्स जिओला जबाबदार ठरवले आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या कर्मचारी संघटनांनी दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक संकटासाठी रिलायन्स जिओला जबाबदार ठरवले.संघटनांनी इतर कंपन्यांच्या तुलनेत सरकार रिलायन्स जिओला संरक्षण देत असल्याचा आरोप केला आहे.कर्मचारी संघटनांनी याविरोधात 3 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली.

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या कर्मचारी संघटनांनी दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक संकटासाठी रिलायन्स जिओला जबाबदार ठरवले आहे. संघटनांनी इतर कंपन्यांच्या तुलनेत सरकार रिलायन्स जिओला संरक्षण देत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच कर्मचारी संघटनांनी याविरोधात 3 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे.

सरकारने जिओबरोबर कोणी स्पर्धा करु नये म्हणून बीएसएनएलला 4 जी सेवेसाठी स्पेक्ट्रमचे वाटप केले नाही असा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे. मात्र संघटनांकडून करण्यात आलेल्या आरोपाबाबत रिलायनस जिओने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.'सध्या दूरसंचार क्षेत्र संकटात आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने बाजाराची परिस्थिती बिघडवून टाकली आहे. जिओचा बीएसएनएलसह आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना बाजारातून गायब करण्याचा खेळ आहे' असे बीएसएनएलच्या संघटनांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. 

ऑल इंडिया अँड असोसिएशन्स ऑफ बीएसएनएलने (एयूएबी) पैशाच्या ताकदीवर रिलायन्स जिओ गुंतवणुकीपेक्षा कमी दरात सेवा देत असल्याचा आरोप केला आहे. 'खासगी क्षेत्रातील अनेक दूरसंचार कंपन्या एअरसेल, टाटा टेलिसर्व्हिसेस, अनिल अंबानी यांची रिलायन्स टेलिकम्युनिकेशन्स आणि टेलिनॉर या कंपन्यांनी आधीच आपली मोबाइल सेवा बंद केली आहे. बाजारातील स्पर्धा संपुष्टात आल्यानंतर जिओ आपल्या दरात वाढ करेल' असे एयूएबीने म्हटले आहे. रिलायन्स जिओला मोदी सरकारकडून संरक्षण मिळत असल्याचं कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओStrikeसंप