शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएफ अलर्ट, घुसखोरीचा मोठा कट उधळला; २४ हून अधिक बांगलादेशींना हाकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 21:36 IST

भारत-बांगलादेश सीमेवर बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला आहे. सैनिकांनी २४ हून अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मागे ढकलले आहे.

बांगलादेशात काही दिवसापूर्वी शेख हसीना यांचे सरकार सत्तेतून गेले. नवीन  मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले, तेव्हापासून भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचे प्रयत्न सतत सुरू आहेत. दरम्यान, भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना मोठे यश मिळाले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या विविध बटालियनच्या सतर्क सैनिकांनी बंगालच्या उत्तर २४ परगणा आणि नादिया जिल्ह्यांमधील भारत-बांगलादेश सीमेवर वेगवेगळ्या कारवाईत बेकायदेशीर घुसखोरीचे मोठे प्रयत्न उधळून लावले आणि एकूण २४ बांगलादेशी आणि दोन रोहिंग्यांना अटक केली.

'नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले; सरदार पटेल, डॉ. आंबेडकर पात्र होते'- मनोहर लाल खट्टर

या प्रकरणाबाबत बीएसएफने रविवारी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, हे सर्व घुसखोर वेगवेगळ्या सीमावर्ती भागातून बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. याशिवाय, जवानांनी सीमेवर तस्करीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले आणि बंदी घातलेल्या फेन्सेडिल कफ सिरपच्या ५६५ बाटल्या आणि तीन किलो गांजा, तसेच २,९०० क्विनाइन सल्फेट गोळ्या, ७०० इंजेक्शन आणि १,२०० आर्टिमेथर इंजेक्शनची मोठी खेप जप्त केली. याशिवाय ११ गुरेही तस्करीपासून वाचविण्यात आली.

बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी जवानांनी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून २० बांगलादेशी आणि दोन रोहिंग्या आणि नादिया सीमेवरून चार बांगलादेशींना बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना पकडले आणि परत हाकलून लावले. घुसखोर घरकाम आणि मजुरीच्या कामासाठी मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादला जात होते. बांगलादेशकडून घुसखोरीचे सतत प्रयत्न होत आहेत, पण सतर्क सैनिक त्यांचे मनसुबे हाणून पाडत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सैनिकांनी तीन गुरे तस्करीपासून वाचवली

इतर घटनांमध्ये, मालदा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या ११९ व्या बटालियनच्या महदीपूर, गोपालनगर, सबदलपूर आणि नवादा या सीमा चौक्यांच्या सैन्याने त्यांच्या संबंधित जबाबदारीच्या क्षेत्रातून वेगवेगळ्या कारवाईत ५६५ बाटल्या फेन्सेडिल जप्त केल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय, ८८ व्या बटालियनच्या पन्नापूर सीमा चौकीच्या सैनिकांनी आठ गुरे वाचवली आणि ११५ व्या बटालियनच्या सैनिकांनी तीन गुरे तस्करीपासून वाचवली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBSFसीमा सुरक्षा दलBangladeshबांगलादेश