शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

बीएसएफ अलर्ट, घुसखोरीचा मोठा कट उधळला; २४ हून अधिक बांगलादेशींना हाकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 21:36 IST

भारत-बांगलादेश सीमेवर बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला आहे. सैनिकांनी २४ हून अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मागे ढकलले आहे.

बांगलादेशात काही दिवसापूर्वी शेख हसीना यांचे सरकार सत्तेतून गेले. नवीन  मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले, तेव्हापासून भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचे प्रयत्न सतत सुरू आहेत. दरम्यान, भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना मोठे यश मिळाले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या विविध बटालियनच्या सतर्क सैनिकांनी बंगालच्या उत्तर २४ परगणा आणि नादिया जिल्ह्यांमधील भारत-बांगलादेश सीमेवर वेगवेगळ्या कारवाईत बेकायदेशीर घुसखोरीचे मोठे प्रयत्न उधळून लावले आणि एकूण २४ बांगलादेशी आणि दोन रोहिंग्यांना अटक केली.

'नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले; सरदार पटेल, डॉ. आंबेडकर पात्र होते'- मनोहर लाल खट्टर

या प्रकरणाबाबत बीएसएफने रविवारी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, हे सर्व घुसखोर वेगवेगळ्या सीमावर्ती भागातून बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. याशिवाय, जवानांनी सीमेवर तस्करीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले आणि बंदी घातलेल्या फेन्सेडिल कफ सिरपच्या ५६५ बाटल्या आणि तीन किलो गांजा, तसेच २,९०० क्विनाइन सल्फेट गोळ्या, ७०० इंजेक्शन आणि १,२०० आर्टिमेथर इंजेक्शनची मोठी खेप जप्त केली. याशिवाय ११ गुरेही तस्करीपासून वाचविण्यात आली.

बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी जवानांनी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून २० बांगलादेशी आणि दोन रोहिंग्या आणि नादिया सीमेवरून चार बांगलादेशींना बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना पकडले आणि परत हाकलून लावले. घुसखोर घरकाम आणि मजुरीच्या कामासाठी मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादला जात होते. बांगलादेशकडून घुसखोरीचे सतत प्रयत्न होत आहेत, पण सतर्क सैनिक त्यांचे मनसुबे हाणून पाडत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सैनिकांनी तीन गुरे तस्करीपासून वाचवली

इतर घटनांमध्ये, मालदा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या ११९ व्या बटालियनच्या महदीपूर, गोपालनगर, सबदलपूर आणि नवादा या सीमा चौक्यांच्या सैन्याने त्यांच्या संबंधित जबाबदारीच्या क्षेत्रातून वेगवेगळ्या कारवाईत ५६५ बाटल्या फेन्सेडिल जप्त केल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय, ८८ व्या बटालियनच्या पन्नापूर सीमा चौकीच्या सैनिकांनी आठ गुरे वाचवली आणि ११५ व्या बटालियनच्या सैनिकांनी तीन गुरे तस्करीपासून वाचवली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBSFसीमा सुरक्षा दलBangladeshबांगलादेश