शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएफ अलर्ट, घुसखोरीचा मोठा कट उधळला; २४ हून अधिक बांगलादेशींना हाकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 21:36 IST

भारत-बांगलादेश सीमेवर बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला आहे. सैनिकांनी २४ हून अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मागे ढकलले आहे.

बांगलादेशात काही दिवसापूर्वी शेख हसीना यांचे सरकार सत्तेतून गेले. नवीन  मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले, तेव्हापासून भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचे प्रयत्न सतत सुरू आहेत. दरम्यान, भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना मोठे यश मिळाले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या विविध बटालियनच्या सतर्क सैनिकांनी बंगालच्या उत्तर २४ परगणा आणि नादिया जिल्ह्यांमधील भारत-बांगलादेश सीमेवर वेगवेगळ्या कारवाईत बेकायदेशीर घुसखोरीचे मोठे प्रयत्न उधळून लावले आणि एकूण २४ बांगलादेशी आणि दोन रोहिंग्यांना अटक केली.

'नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले; सरदार पटेल, डॉ. आंबेडकर पात्र होते'- मनोहर लाल खट्टर

या प्रकरणाबाबत बीएसएफने रविवारी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, हे सर्व घुसखोर वेगवेगळ्या सीमावर्ती भागातून बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. याशिवाय, जवानांनी सीमेवर तस्करीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले आणि बंदी घातलेल्या फेन्सेडिल कफ सिरपच्या ५६५ बाटल्या आणि तीन किलो गांजा, तसेच २,९०० क्विनाइन सल्फेट गोळ्या, ७०० इंजेक्शन आणि १,२०० आर्टिमेथर इंजेक्शनची मोठी खेप जप्त केली. याशिवाय ११ गुरेही तस्करीपासून वाचविण्यात आली.

बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी जवानांनी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून २० बांगलादेशी आणि दोन रोहिंग्या आणि नादिया सीमेवरून चार बांगलादेशींना बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना पकडले आणि परत हाकलून लावले. घुसखोर घरकाम आणि मजुरीच्या कामासाठी मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादला जात होते. बांगलादेशकडून घुसखोरीचे सतत प्रयत्न होत आहेत, पण सतर्क सैनिक त्यांचे मनसुबे हाणून पाडत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सैनिकांनी तीन गुरे तस्करीपासून वाचवली

इतर घटनांमध्ये, मालदा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या ११९ व्या बटालियनच्या महदीपूर, गोपालनगर, सबदलपूर आणि नवादा या सीमा चौक्यांच्या सैन्याने त्यांच्या संबंधित जबाबदारीच्या क्षेत्रातून वेगवेगळ्या कारवाईत ५६५ बाटल्या फेन्सेडिल जप्त केल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय, ८८ व्या बटालियनच्या पन्नापूर सीमा चौकीच्या सैनिकांनी आठ गुरे वाचवली आणि ११५ व्या बटालियनच्या सैनिकांनी तीन गुरे तस्करीपासून वाचवली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBSFसीमा सुरक्षा दलBangladeshबांगलादेश