शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

ब्रू निर्वासितांचे रेशन, मदत १५ जानेवारीपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 05:39 IST

त्रिपुरात सहा छावण्या; ३२ हजार जण जगतात हलाखीत

आगरतळा : उत्तर त्रिपुरातील कांचनपूर, पाणीसागर येथे सहा निर्वासित छावण्यांमध्ये अद्यापही राहत असलेल्या ३२ हजार निर्वासितांना सरकारकडून रेशनवर देण्यात येणारे अन्नधान्य व आर्थिक मदत येत्या १५ जानेवारीपासून बंद करण्यात येणार आहे. ब्रू जमातीच्या लोकांची मिझोराममध्ये गेल्या २५ आॅगस्टपासून आठ टप्प्यांमध्ये पाठवणी करण्यासंदर्भात त्यांच्या नेत्यांशी केंद्र सरकारने करार केला होता. त्यानंतर २५ सप्टेंबरपर्यंत फक्त १४२ लोकांचीच पाठवणी करण्यात आली. सरकारने देऊ केलेली मदत अपुरी असल्याचे सांगून निर्वासितांनी ती नाकारली होती.

सर्व ब्रू निर्वासितांना पुन्हा मिझोराममध्ये पाठविण्याचे प्रयत्न फोल ठरल्याने या निर्वासित छावण्यांना देण्यात येणारी मदत गेल्या १ आॅक्टोबरपासून केंद्रीय गृहखात्याने बंद केली होती; मात्र या निर्वासितांची उपासमार होऊ लागल्याने तीन आठवड्यांनंतर त्यांच्यासाठी अन्नधान्य व अन्य गोष्टींचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. या निर्वासित छावण्यांची मदत जानेवारीत बंद करण्यात येईल, असे गृहखात्याचे सहसचिव सत्येंद्र गर्ग यांनी त्रिपुरा सरकारला गेल्या वर्षी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. (वृत्तसंस्था)वांशिक दंगलींमुळे त्रस्तच्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी एक ते दोन दिवसांत हस्तक्षेप करावा व ब्रू निर्वासितांची मदत यापुढेही सुरू ठेवावी, अशी विनंती त्यांना मिझोराम ब्रू डिस्प्लेस्ड पीपल्स फोरम (एमबीडीपीएफ) करणार आहे. ही माहिती या संघटनेचे सचिव ब्रूनो मशा यांनी दिली.च्सन १९९७-९८ साली उसळलेल्या वांशिक दंगलींनंतर मिझोराममधील ब्रू जमातीचे ३७ हजार लोक मामित, कोलासिब, लुंगलेई येथून विस्थापित होऊन त्रिपुरामध्ये आले. तेथील कांचनपूर व पाणीसागर येथे सहा निर्वासित छावण्यांमध्ये राहू लागले होते. 

टॅग्स :Tripuraत्रिपुराMigrationस्थलांतरण