शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

ब्रू निर्वासितांचे रेशन, मदत १५ जानेवारीपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 05:39 IST

त्रिपुरात सहा छावण्या; ३२ हजार जण जगतात हलाखीत

आगरतळा : उत्तर त्रिपुरातील कांचनपूर, पाणीसागर येथे सहा निर्वासित छावण्यांमध्ये अद्यापही राहत असलेल्या ३२ हजार निर्वासितांना सरकारकडून रेशनवर देण्यात येणारे अन्नधान्य व आर्थिक मदत येत्या १५ जानेवारीपासून बंद करण्यात येणार आहे. ब्रू जमातीच्या लोकांची मिझोराममध्ये गेल्या २५ आॅगस्टपासून आठ टप्प्यांमध्ये पाठवणी करण्यासंदर्भात त्यांच्या नेत्यांशी केंद्र सरकारने करार केला होता. त्यानंतर २५ सप्टेंबरपर्यंत फक्त १४२ लोकांचीच पाठवणी करण्यात आली. सरकारने देऊ केलेली मदत अपुरी असल्याचे सांगून निर्वासितांनी ती नाकारली होती.

सर्व ब्रू निर्वासितांना पुन्हा मिझोराममध्ये पाठविण्याचे प्रयत्न फोल ठरल्याने या निर्वासित छावण्यांना देण्यात येणारी मदत गेल्या १ आॅक्टोबरपासून केंद्रीय गृहखात्याने बंद केली होती; मात्र या निर्वासितांची उपासमार होऊ लागल्याने तीन आठवड्यांनंतर त्यांच्यासाठी अन्नधान्य व अन्य गोष्टींचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. या निर्वासित छावण्यांची मदत जानेवारीत बंद करण्यात येईल, असे गृहखात्याचे सहसचिव सत्येंद्र गर्ग यांनी त्रिपुरा सरकारला गेल्या वर्षी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. (वृत्तसंस्था)वांशिक दंगलींमुळे त्रस्तच्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी एक ते दोन दिवसांत हस्तक्षेप करावा व ब्रू निर्वासितांची मदत यापुढेही सुरू ठेवावी, अशी विनंती त्यांना मिझोराम ब्रू डिस्प्लेस्ड पीपल्स फोरम (एमबीडीपीएफ) करणार आहे. ही माहिती या संघटनेचे सचिव ब्रूनो मशा यांनी दिली.च्सन १९९७-९८ साली उसळलेल्या वांशिक दंगलींनंतर मिझोराममधील ब्रू जमातीचे ३७ हजार लोक मामित, कोलासिब, लुंगलेई येथून विस्थापित होऊन त्रिपुरामध्ये आले. तेथील कांचनपूर व पाणीसागर येथे सहा निर्वासित छावण्यांमध्ये राहू लागले होते. 

टॅग्स :Tripuraत्रिपुराMigrationस्थलांतरण