शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

संक्षिप्त

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

काश्मीरच्या नाल्यात

ना घरांना विटा, ना दुमजली इमारत
फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील प्रसिद्ध शहामियॉ बाबा यांच्या कुशीत वसलेले पीरबावडा व आडगाव (खुर्द) ही दोन गावे जगावेगळी म्हणून ओळखली जातात. येथील घरे विटांची नसून गावात दुमजली इमारत बांधणे चालत नाही. घराच्या भिंतींना चुना चालत नाही. लग्नसराईचा कारभार उरूस उत्सवानंतरच ठरवण्यात येतो.
पीरबावडा परिसरातील जुन्या जाणकार लोकांच्या मतानुसार सुमारे ५०० वर्षापूर्वी हजरत शहामियॉ बाबा आपल्या १३०० पिरांच्या पालख्या सोबत अखाती देशांमधून आले. ते १३०० पालख्यांचे सरदार (प्रमुख) होते. पीरबावडा येथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर हजरत शहामियॉ बाबा यांनी सर्व पालख्यांच्या प्रमुखांचा बटवडा (वाटण्या) केला. त्यांनी सर्व पीरांना (संत) जागा निश्चित करून चारही दिशांना त्यांना पाठवले व ते स्वत: पीरबावडा येथेच राहिले. अनेक वर्ष त्यांनी विविध चमत्कार दाखवून परिसरातील लोकांचे दु:ख दूर केले. अनेक गावातील लोक त्यांच्याकडे अडचणी मांडत असत. दररोज समस्या सोडवण्यासाठी दरबार भरत होता. ईश्वरी शक्तीचा वापर त्यांनी सकारात्मक कामासाठी केला. तेव्हापासून परिसरातील नागरिक त्यांना ग्रामदैवत मानू लागले. त्यानंतर पंचक्रोशीतील नागरिकांनी या ठिकाणी दर्गा बनवला. या दर्ग्यावर दरवर्षी उरूस भरतो.

शहामियॉ बाबा यांची ख्याती -
शहामियॉ बाबा यांनी केलेल्या उपदेशानुसार गावातील घरे बांधण्यासाठी विटांचा वापर केला जात नाही. दोन्ही गावात एकही दुमजली इमारत नाही. घरांच्या भिंतींना चुना लावला जात नाही. शेकडो वर्षांपासूनची परंपरा आजही कायम आहे. पूर्वी केवळ माती व माळवदाची (लाकडी) घरे होती. सध्या मात्र विटांऐवजी सिमेंटच्या गट्टूचा भिंतीसाठी वापर केला जात आहे. आजच्या विज्ञान युगातही दोन्ही गावातील नागरिकांची शहामियॉ बाबा यांच्यावर अमाप श्रद्धा असून दरवर्षी उरूस उत्सवात भाग घेतात. विशेष म्हणजे गाव सोडून इतर ठिकाणी नोकरीनिमित्त व कामानिमित्त स्थलांतरित झालेले, गावच्या सासरी गेलेल्या लेकी, नातेवाईक न चुकता शहामियॉ बाबा यांच्या दरबारात दर्शनासाठी येतात.