शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मंडपात नवरदेवाला फोन, अचानक लग्नाला नकार देताच बेदम मारहाण, वधूशिवाय परतली वरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 16:06 IST

लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. जोरदार हाणामारी सुरू झाली, वराची शेरवानी आणि इतरांचेही कपडे फाडले.

नवरदेवाने मंडपात असं काही केलं त्यानंतर लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. जोरदार हाणामारी सुरू झाली, वराची शेरवानी आणि इतरांचेही कपडे फाडले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. हे संपूर्ण प्रकरण दौसा जिल्ह्यातील नांगल-मीणा गावाशी संबंधित आहे. 1 मे रोजी झुथाहेडा गावातील वीरेंद्र मीना याचं लग्न ठरलं होतं. लग्नाच्या दिवशी हा तरुण वरात घेऊन नववधू निशा मीनाच्या गावात पोहोचला होता. 

गावातील वधूचे घर अतिशय आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते, मंडप व स्टेजही लावण्यात आले होते. फिल्मी आणि राजस्थानी गाण्यांवर डान्स चालू होता. वरानेही शेरवानीमध्ये लग्नमंडपामध्ये प्रवेश केला. वधू-वर पक्षाचे लोक लग्नाचे जेवण जेवत होते. याच दरम्यान, वराला फोन आला आणि त्या फोननंतर वराने आपली पगडी फेकून दिली आणि लग्नास नकार दिला.

मुलाने लग्नास नकार देताच त्याला समजावण्यात आलं. पण तो तयार न झाल्याने थेट मारामारी झाली. लोकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. दोन्ही बाजूंनी दीर्घ चर्चा झाली. त्यानंतर वधू-वर पक्षाने हे लग्न न करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच वधूपक्षाने लग्नसमारंभासाठी खर्च केलेली रक्कमही वराने परत द्यावी याविषयी चर्चा झाली. मुलाकडील मंडळी नवरी न घेताच परतले. 

वधूपक्षाच्या लोकांनी लग्नासाठी दुसरा मुलगा शोधला आणि नवरीचं पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. वधू निशासोबत लग्न करण्यासाठी दुसरा वरही तयार झाला असून आता पुन्हा वधूच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे, असे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी हजर होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्न