शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लग्नानंतर नवरीची पाठवणी; सासरी गेल्यानंतर १० तासांत मृत्यूची बातमी आली; कुटुंबावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 13:23 IST

लग्नानंतर सासरी गेलेल्या नववधूचा १० तासांनंतर मृत्यू; दोन्ही कुटुंबांवर शोककळा

जोधपूर: राजस्थानच्या जोधपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे लग्नघरावर शोककळा पसरली आहे. लग्नानंतर सासरी गेलेल्या नवविवाहितेची प्रकृती अचानक बिघडली. लग्नाच्या अवघ्या १० तासांत नववधूचा मृत्यू झाला. 

जोधपूरातल्या जोधा गावात एक वरात आली होती. वधूच्या कुटुंबानं लेकीची सासरी पाठवणी केली. मात्र सासरी पोहोचल्यानंतर काही तासांमध्येच नववधूची तब्येत बिघडली. कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

बालेसरच्या तेना गावात वास्तव्यास असणारे सुभाष मेघवाल मंगळवारी रात्री वरात घेऊन जोधा गावातल्या छगनाराम यांच्या घरी आले होते. सुभाष यांनी छगनाराम यांची कन्या रेखासोबत सात फेरे घेतले. सकाळी रेखाच्या कुटुंबीयांनी तिची पाठवणी केली. सासरी नवदाम्पत्याचं जोरदार स्वागत झालं. दोघांनी देवी देवतांची पूजा केली.

संध्याकाळी रेखाची प्रकृती अचानक बिघडली. रेखा बेशुद्ध पडली. तिला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी रेखाला मृत घोषित केलं. यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. उष्माघातामुळे रेखाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.