शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Breaking : देशातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढले, केंद्र सरकारकडून घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 18:23 IST

केंद्र सकारच्या राष्ट्रीय आपत्ती व व्यवस्थापन विभागाने यासंदर्भातील घोषणा पत्राद्वारे केली आहे

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन महाराष्ट्रात ृ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी याबद्दलचे आदेश काढले आहेत. लॉकडाऊन लागू असूनही राज्यातील रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मात्र तिसरा लॉकडाऊन संपत असताना राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला आहे. तर, देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९० हजारांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे, आता देशात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

केंद्र सकारच्या राष्ट्रीय आपत्ती व व्यवस्थापन विभागाने यासंदर्भातील घोषणा पत्राद्वारे केली आहे. देशातील सर्वच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत देशात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यांसदर्भातील शिथितलेबाबत मार्गदर्शन सूचना आणि नियमावली जाहीर करण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनपूर्वी देशातील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी, देशावासीयांसाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेजी घोषणा मोदींनी केली. देशाच्या जीडीपीच्या १० टक्के एवढ्या रकमचे जगातील सर्वात मोठं आर्थिक पॅकेज असल्याचंही मोदींनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. याच भाषणात, मोदींनी देशवासीयांना ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे संकेत दिले होते. विशेष म्हणजे या लॉकडाऊनसाठी राज्य सरकारला विशेष अधिकार दिल्याचं मोदींनी सांगतिलं. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारने ३१ मे पर्यंतचा लॉकडाऊन घोषित केला. महाराष्ट्रात कोरोनाबाधिताची संख्या ३० हजारांच्या पार गेली आहे. तर, राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्या १८ हजारांहून जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता, देशातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, आता केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानेही देशातील लॉकडाऊ ३१ मेपर्यंत वाढविल्याचे सांगितले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी