शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

वीरप्पन आणि नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले अधिकारी 'मिशन काश्मीर'वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 12:42 IST

 जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर आता राज्यातील दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना वेसण घालण्यासाठी देशातील सर्वात कणखर अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली -  जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर आता राज्यातील दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना वेसण घालण्यासाठी देशातील सर्वात कणखर अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून छत्तीसगडचे अतिरिक्त मुख्य सचिव बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांची राज्यपालांचे मुख्य सचिव आणि वीरप्पनचा खात्मा करणाऱ्या पथकाचे नेतृत्व करणारे माजी आयपीएस अधिकारी विजय कुमार यांची राज्यपालांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  सुब्रह्मण्यम यांची गणना देशातील आघाडीच्या अधिकाऱ्यामध्ये होते. नक्षलग्रस्त बस्तरसारख्या भागात शांतता प्रस्थापित कऱण्यासाठी त्यांनी केलेले कार्य वाखाणण्यासारखे होते. तर विजय कुमार यांनी कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन याला ऑक्टोबर 2004 साली कंठस्नान घालणाऱ्या पथकाचे नेतृत्व केले होते.  डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातही सुब्रह्मण्यम यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मनमोहन सिंह यांनी आपल्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान सुब्रह्मण्यम यांचा आपले स्वीय सचिव नियुक्त केले होते. तसेच मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची संयुक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. मोदी सरकारच्या काळातही सुब्रह्मण्यम यांच्याकडे संयुक्त सचिवपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचि छत्तीसगडमध्ये प्रतिनियुक्ती झाली होती. छत्तीसगडचे गृहसचिव म्हणून काम करताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय काम केले. त्यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळेच नक्षलग्रस्त बस्तर भागात 700 किमीचा रस्ता बनवणे शक्य झाले. तसेच 2017 साली या भागात 300 नक्षलवादी मारले गेले, तर 100 हून अधिक नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण केले. तर राज्यपालांचे सल्लागार म्हणनू नियुक्त करण्यात आलेले माजी आयपीएस अधिकारी विजय कुमार यांना जंगली परिसरात अभियान राबवण्याचा अनुभव आहे,. तामिळनाडू कॅडरच्या 1975च्या बॅचचे अधिकारी असलेल्या कुमार यांनी 1998 ते 2001 या काळात बीएसएफचे महानिरीक्षक म्हणून काश्मीर खोऱ्यात काम पाहिले आहे. त्यावेळी दहशतवाद विरोधी अभियानामध्ये बीएसएफ अधिक सक्रीय होते. 2010 साली छत्तीसगडमधील दांतेवाडा येथे नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 75 जवानांना वीरमरण आल्यानंतर कुमार यांना या दलाचे प्रमुख बनवण्यात आले होते. तसेच वीरप्पनला कंठस्नान घालणाऱ्या पथकाचेही त्यांनी नेतृत्व केले होते.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरnewsबातम्याManmohan Singhमनमोहन सिंगBSFसीमा सुरक्षा दल