शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वीरप्पन आणि नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले अधिकारी 'मिशन काश्मीर'वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 12:42 IST

 जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर आता राज्यातील दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना वेसण घालण्यासाठी देशातील सर्वात कणखर अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली -  जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर आता राज्यातील दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना वेसण घालण्यासाठी देशातील सर्वात कणखर अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून छत्तीसगडचे अतिरिक्त मुख्य सचिव बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांची राज्यपालांचे मुख्य सचिव आणि वीरप्पनचा खात्मा करणाऱ्या पथकाचे नेतृत्व करणारे माजी आयपीएस अधिकारी विजय कुमार यांची राज्यपालांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  सुब्रह्मण्यम यांची गणना देशातील आघाडीच्या अधिकाऱ्यामध्ये होते. नक्षलग्रस्त बस्तरसारख्या भागात शांतता प्रस्थापित कऱण्यासाठी त्यांनी केलेले कार्य वाखाणण्यासारखे होते. तर विजय कुमार यांनी कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन याला ऑक्टोबर 2004 साली कंठस्नान घालणाऱ्या पथकाचे नेतृत्व केले होते.  डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातही सुब्रह्मण्यम यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मनमोहन सिंह यांनी आपल्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान सुब्रह्मण्यम यांचा आपले स्वीय सचिव नियुक्त केले होते. तसेच मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची संयुक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. मोदी सरकारच्या काळातही सुब्रह्मण्यम यांच्याकडे संयुक्त सचिवपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचि छत्तीसगडमध्ये प्रतिनियुक्ती झाली होती. छत्तीसगडचे गृहसचिव म्हणून काम करताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय काम केले. त्यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळेच नक्षलग्रस्त बस्तर भागात 700 किमीचा रस्ता बनवणे शक्य झाले. तसेच 2017 साली या भागात 300 नक्षलवादी मारले गेले, तर 100 हून अधिक नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण केले. तर राज्यपालांचे सल्लागार म्हणनू नियुक्त करण्यात आलेले माजी आयपीएस अधिकारी विजय कुमार यांना जंगली परिसरात अभियान राबवण्याचा अनुभव आहे,. तामिळनाडू कॅडरच्या 1975च्या बॅचचे अधिकारी असलेल्या कुमार यांनी 1998 ते 2001 या काळात बीएसएफचे महानिरीक्षक म्हणून काश्मीर खोऱ्यात काम पाहिले आहे. त्यावेळी दहशतवाद विरोधी अभियानामध्ये बीएसएफ अधिक सक्रीय होते. 2010 साली छत्तीसगडमधील दांतेवाडा येथे नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 75 जवानांना वीरमरण आल्यानंतर कुमार यांना या दलाचे प्रमुख बनवण्यात आले होते. तसेच वीरप्पनला कंठस्नान घालणाऱ्या पथकाचेही त्यांनी नेतृत्व केले होते.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरnewsबातम्याManmohan Singhमनमोहन सिंगBSFसीमा सुरक्षा दल