शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

प्रेयसीला भेटण्यासाठी १७ किलोमीटरवरून सायकल चालवत यायचा प्रियकर, अखेर गावकऱ्यांनी पकडले आणि लग्न लावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 17:41 IST

Marriage News: बिहारमधील रामनगर ठाणे क्षेत्रातील एक अजब प्रेमकहाणी आणि त्यानंतर झालेल्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रेमकहाणीमधील नायक हा दररोज १७ किमी सायकल चालवून प्रेयसीला भेटण्यासाठी येत असे.

पाटणा - बिहारमधील रामनगर ठाणे क्षेत्रातील एक अजब प्रेमकहाणी आणि त्यानंतर झालेल्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रेमकहाणीमधील नायक हा दररोज १७ किमी सायकल चालवून प्रेयसीला भेटण्यासाठी येत असे. या लव्हस्टोरीमध्ये ट्विस्टही होता. घरच्यांकडून होणारा विरोधही होता. या प्रेमप्रकरणावरून पंचायतही बसली. मात्र एवढे करूनही जेव्हा हे दोघे वेगळे झाले नाहीत. तेव्हा अखेर गावकऱ्यांनी या दोघांचे लग्न लावून टाकले. ही घटना रामनगर ठाणे क्षेत्रातील सपही पंचायतीच्या सपही भावलगोल बाजार येथे घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या प्रेमकहाणीची सुरुवात ही तीन वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हा एका विवाह सोहळ्यामध्ये बबलू कुमार नावाचा तरुण मंजू कुमारी नावाच्या तरुणीच्या प्रेमात पडला. त्यावेळी या तरुणीचे वय १७ वर्षे तर तरुणाचे वय १८ वर्षे होते. सुरुवातीला दोघे मोबाईलवरून बोलू लागले. यादरम्यान, त्यांचे प्रेमसंबंध एवढे दृढ झाले की, त्यांनी एकमेकांसोबत जगण्यामरण्याची शपथ घेतली.

मोबाईलवरून बोलता बोलता हे दोघेही जवळ आले. तसेच गावाजवळ एकमेकांना भेटू लागले. दोघांच्याही घरांमधील अंतर १७ किमी आहे. या प्रेयसीला भेटण्यासाठी हा प्रियकर मग दररोज १७ किमी सायकल चालवून तिच्या घराजवळ येऊ लागला. ही बाब जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांना समजली तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. गावातील लोकांनी आणि मुलीच्या कुटुंबीयांनी  या तरुणाला एकदा पकडून समज देऊन सोडून दिले. मात्र त्यानंतरही हा प्रकार सुरूच राहिला.

मुलगी आणि मुलाचे कुटुंबीय या विवाहावरून आमने-सामने आले. दोन्हीकडून कोर्टकचेरीची मालिका सुरू झाली. पोलिसांत अर्ज दिले गेले. मात्र सदर मुलगा आणि मुलगी मात्र विवाह करण्यावर ठाम होते. त्यामुळे अनेकदा पंचायतही बोलावली गेली. या पंचायतीमध्येही दोघांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले. त्यानंतर गावातील लोकांनी दोन्ही कुटुंबांमध्ये हस्तक्षेप केला. तसेच दोन्ही कुटुंबांची समजूत काढल्यानंतर गुरुवारी रात्री या प्रेमी युगुलाचा खटोरी शिवमंदिरामध्ये विवाह लावून देण्यात आला.  

टॅग्स :marriageलग्नBiharबिहार