शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या एकतेवर ममता बॅनर्जींचा बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 14:18 IST

हिंसा करून डावे पक्ष प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी हिंसेची मदत घेण्यात येत आहे. असे आंदोलन दिल्लीत करू शकत नाहीत, म्हणून पश्चिम बंगालमध्ये करण्यात येत आहे. मात्र हिंसा झाल्यास पोलिस कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ममता यांनी दिला. 

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये सीएए आणि एनआरसीवरून काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राच्या दोन्ही कायद्यांविरुद्ध एकट्याने लढा देणार असल्याचे म्हटले आहे. तसेच 13 जानेवारी रोजी दिल्लीत विरोधकांकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. 

पश्चिम बंगाल विधानसभेत बोलताना ममता म्हणाल्या की, राज्यात काँग्रेस आणि सीपीएमकडून घाणेरडं राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकता कायदा  याविरुद्ध एकटीने लढा देण्याचे ठरवले आहे. बुधवारी भारत बंदवरून देखील ममता यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडले होते. 

ममता म्हणाल्या की, भारतबंदचा आपण विरोध करत आहोत. डावे पक्ष आता फक्त शोभेसाठी असल्याची टीका त्यांनी केली. बंगालमध्ये आंदोलनाच्या नावाखाली हिंसा होत असून याचा आपण विरोध करत असल्याचे ममता यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान हिंसा करून डावे पक्ष प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी हिंसेची मदत घेण्यात येत आहे. असे आंदोलन दिल्लीत करू शकत नाहीत, म्हणून पश्चिम बंगालमध्ये करण्यात येत आहे. मात्र हिंसा झाल्यास पोलिस कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ममता यांनी दिला.