शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

विरोधकांच्या एकतेवर ममता बॅनर्जींचा बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 14:18 IST

हिंसा करून डावे पक्ष प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी हिंसेची मदत घेण्यात येत आहे. असे आंदोलन दिल्लीत करू शकत नाहीत, म्हणून पश्चिम बंगालमध्ये करण्यात येत आहे. मात्र हिंसा झाल्यास पोलिस कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ममता यांनी दिला. 

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये सीएए आणि एनआरसीवरून काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राच्या दोन्ही कायद्यांविरुद्ध एकट्याने लढा देणार असल्याचे म्हटले आहे. तसेच 13 जानेवारी रोजी दिल्लीत विरोधकांकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. 

पश्चिम बंगाल विधानसभेत बोलताना ममता म्हणाल्या की, राज्यात काँग्रेस आणि सीपीएमकडून घाणेरडं राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकता कायदा  याविरुद्ध एकटीने लढा देण्याचे ठरवले आहे. बुधवारी भारत बंदवरून देखील ममता यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडले होते. 

ममता म्हणाल्या की, भारतबंदचा आपण विरोध करत आहोत. डावे पक्ष आता फक्त शोभेसाठी असल्याची टीका त्यांनी केली. बंगालमध्ये आंदोलनाच्या नावाखाली हिंसा होत असून याचा आपण विरोध करत असल्याचे ममता यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान हिंसा करून डावे पक्ष प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी हिंसेची मदत घेण्यात येत आहे. असे आंदोलन दिल्लीत करू शकत नाहीत, म्हणून पश्चिम बंगालमध्ये करण्यात येत आहे. मात्र हिंसा झाल्यास पोलिस कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ममता यांनी दिला.