शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

विरोधकांच्या एकतेवर ममता बॅनर्जींचा बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 14:18 IST

हिंसा करून डावे पक्ष प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी हिंसेची मदत घेण्यात येत आहे. असे आंदोलन दिल्लीत करू शकत नाहीत, म्हणून पश्चिम बंगालमध्ये करण्यात येत आहे. मात्र हिंसा झाल्यास पोलिस कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ममता यांनी दिला. 

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये सीएए आणि एनआरसीवरून काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राच्या दोन्ही कायद्यांविरुद्ध एकट्याने लढा देणार असल्याचे म्हटले आहे. तसेच 13 जानेवारी रोजी दिल्लीत विरोधकांकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला आपण उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. 

पश्चिम बंगाल विधानसभेत बोलताना ममता म्हणाल्या की, राज्यात काँग्रेस आणि सीपीएमकडून घाणेरडं राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकता कायदा  याविरुद्ध एकटीने लढा देण्याचे ठरवले आहे. बुधवारी भारत बंदवरून देखील ममता यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडले होते. 

ममता म्हणाल्या की, भारतबंदचा आपण विरोध करत आहोत. डावे पक्ष आता फक्त शोभेसाठी असल्याची टीका त्यांनी केली. बंगालमध्ये आंदोलनाच्या नावाखाली हिंसा होत असून याचा आपण विरोध करत असल्याचे ममता यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान हिंसा करून डावे पक्ष प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी हिंसेची मदत घेण्यात येत आहे. असे आंदोलन दिल्लीत करू शकत नाहीत, म्हणून पश्चिम बंगालमध्ये करण्यात येत आहे. मात्र हिंसा झाल्यास पोलिस कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ममता यांनी दिला.