शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

५०० विद्यार्थिनींमध्‍ये एकटाच असल्याचे पाहून परीक्षा केंद्रात बेशुद्ध पडला विद्यार्थी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 09:28 IST

bihar : हे प्रकरण बिहार शरीफ येथील एका परीक्षा केंद्राशी संबंधित आहे, जेव्हा परीक्षा देण्यासाठी आलेला एक विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये एकटा दिसल्याने बेशुद्ध पडला.

नालंदा : बिहारमधील नालंदा येथे माध्यमिक परीक्षेदरम्यान एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. परीक्षेसाठी आलेला विद्यार्थी जवळपास ५०० विद्यार्थिनींमध्ये एकटा असल्याचे पाहून बेशुद्ध पडला. हे प्रकरण बिहार शरीफ येथील एका परीक्षा केंद्राशी संबंधित आहे, जेव्हा परीक्षा देण्यासाठी आलेला एक विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये एकटा दिसल्याने बेशुद्ध पडला. यानंतर लगेच विद्यार्थ्याला उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहार शरीफच्या अल्लामा इक्बाल कॉलेजचा विद्यार्थी मनीष शंकर याचे ब्रिलियंट स्कूलमध्ये माध्यमिक परीक्षेचे केंद्र होते, असे सांगण्यात येते. सकाळी मनीष परीक्षा केंद्रावर गेला असता त्याला त्याच्या परीक्षा केंद्रावर फक्त विद्यार्थिनी असल्याचे दिसले. जवळपास 500 विद्यार्थिनींमध्ये स्वतःला एकटे असल्याचे पाहून तो अस्वस्थ होऊ लागला. त्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध झाला.

दरम्यान, मुलाची मावशी पुष्पा लता सिन्हा यांनी सांगितले की, केंद्रात जास्त मुली पाहून मनीष घाबरला, त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात न्यावे लागले. बिहारमध्ये बुधवारपासून माध्यमिक परीक्षा सुरू झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गृहजिल्ह्यातील नालंदा येथील परीक्षा केंद्राचे दार बंद झाल्यामुळे विद्यार्थिनी आपला जीव धोक्यात घालून परीक्षा केंद्रात प्रवेश करताना दिसून आले.

बिहार बोर्डाची माध्यमिक परीक्षाबिहार बोर्डची माध्यमिक परीक्षा कालपासून सुरू झाली आहे. १ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. यावर्षी या परीक्षेला ६,३६,४३२ मुली आणि ६,८१,७९५ मुले असे एकूण १३,१८,२२७ विद्यार्थी बसले आहेत. याचबरोबर, यावेळी परीक्षेत काही मोठे बदल करण्यात आले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. बिहार शालेय परीक्षा समिती आणि पोलीस प्रशासनाकडून पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

पाटण्यात 80 परीक्षा केंद्रे स्थापन करणारपाटणा जिल्ह्यात एकूण 80 परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. पाटणा येथे एकूण ४१,५९३ मुली आणि ३८,०४८ मुले बोर्डाची माध्यमिक परीक्षा देतील. यावेळी मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना सहज ओळखता यावे, यासाठी समितीकडून युनिक आयडी जारी करण्यात आल्याचे प्रथमच घडले आहे.

टॅग्स :Biharबिहारexamपरीक्षा