शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

शेतकरी आणि सरकार दोघेही भूमिकांवर ठाम; कोंडी कायम, मंगळवारी महत्त्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 06:55 IST

आंदाेलनाचे समर्थन करणाऱ्या सुमारे ४० जणांसह काही स्वयंसेवी संस्थांना एनआयएने समन्स बजावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदाेलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ‘एनआयए’ने पंजाबी अभिनेता दीप सिद्धू यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांना नाेटीस दिली आहे.

हरीश गुप्ता / नितीन अग्रवाल -नवी दिल्ली : दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदाेलनाला परदेशातून प्राप्त हाेणाऱ्या निधीची ‘एनआयए’मार्फत चाैकशी करण्यावरून वातावरण तापले आहे. तर, दुसरीकडे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांनी मवाळ भूमिका घेऊन १९ जानेवारीला हाेणाऱ्या चर्चेबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. केंद्र सरकारला प्रजासत्ताक दिनापूर्वी या आंदाेलनाचा तिढा साेडवायचा असल्याचे ताेमर यांच्या भूमिकेतून दिसत आहे.आंदाेलनाचे समर्थन करणाऱ्या सुमारे ४० जणांसह काही स्वयंसेवी संस्थांना एनआयएने समन्स बजावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदाेलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ‘एनआयए’ने पंजाबी अभिनेता दीप सिद्धू यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांना नाेटीस दिली आहे. हा प्रकार सूडाच्या भावनेतून केल्याची टीका शेतकरी नेत्यांनी केली आहे. आंदाेलनामध्ये मदत करणाऱ्यांना सरकार देशद्राेही ठरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आराेपही करण्यात आला आहे.केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांची १९ जानेवारीला चर्चा हाेणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत ताेमर यांनी आश्वस्त केले असून, कृषी कायद्यांबाबत मुद्देसूद चर्चा करावी, असे ताेमर यांनी शेतकरी नेत्यांना सांगितले आहे. शेतकरी कायदा रद्द करण्याच्या मागणीव्यतिरिक्त इतर पर्यायही मांडावेत, याचा ताेमर यांनी पुनरुच्चार केला. सर्वाेच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीचीही पूसा परिसरात पहिली बैठक हाेणार आहे.सोमवारी सर्वोच्च न्यायालय नवी कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या निदर्शनासंबंधीच्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून काही हस्तक्षेप केला जाण्याची तसेच ट्रॅक्टर रॅलीच्या मुद्यावरही विचार करण्याची शक्यता आहे, अशी सरकारला अपेक्षा आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीची सोमवारी, १९ जानेवरी पहिली बैठक होत आहे. राजपथावर ट्रॅक्टर रॅली काढून प्रजासत्ताक दिनाच्या प्रतिष्ठेतेला बट्टा लागेल, असे शेतकरी बांधवांनी काहीही करू नये, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही केले आहे.सुरक्षाव्यवस्थेत वाढ -- दहशतवादी दिल्लीमध्ये घातपात करू शकतात, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. - प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला १५ वर्षांहून लहान मुलांनी आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना परवानगी देण्यात आलेली नाही. नागरिकांनी ओळखपत्रे साेबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास चाैकशी करण्यात येईल, असे पाेलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी