शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

'बोस, पटेलांकडील नेतृत्वामुळे चित्र वेगळे असते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 04:32 IST

भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांचे देशाला नेतृत्व अन् मार्गदर्शन लाभले असते, तर भारताचे भवितव्य निश्चितच बदलले असते.

नवी दिल्ली : भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांचे देशाला नेतृत्व अन् मार्गदर्शन लाभले असते, तर भारताचे भवितव्य निश्चितच बदलले असते. सुभाषबाबू, वल्लभभाई पटेल अन् डॉ.आंबेडकर यासारख्या अनेक महान सुपुत्रांच्या त्यागाला अन् बलिदानाला दुर्लक्षित करण्यात आले. श्रेयाचे सारे मोठेपण केवळ एका परिवाराला प्रदान करण्याचा प्रयत्न देशात वर्षानुवर्षे झाला हे दुर्दैवच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात आझाद हिंद सेनेच्या ७५ व्या वर्धापनदिनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून केले.भारताच्या राष्ट्रनिर्मितीत प्रत्येक व्यक्तीला आपली भूमिका वठवण्याची संधी हा नेताजी सुभाषबाबूंच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग होता, असे नमूद करीत पंतप्रधान पुढे म्हणाले की, केंब्रिज विद्यापीठात व्यतित केलेल्या कालखंडाची आठवण सांगताना नेताजी म्हणायचे, प्रत्येक भारतीयाच्या मनावर असे ठसवण्यात आले आहे की युरोप अन् ग्रेट ब्रिटनचे स्वरूप फार मोठे आहे, आपण त्याचे अनुकरण करायला हवे. म्हणूनच युरोप अन् इंग्लंडला एका वेगळया चष्म्यातून पाहण्याची आपल्याला सवय जडली आहे. सुभाषबाबूंच्या या विचारांना लक्षात घेऊन स्वतंत्र भारताची उभारणी झाली असती तर देशाचे चित्र नक्कीच वेगळे दिसले असते. सुभाषचंद्र बोस यांनी २१ आॅक्टोबर १९२३ साली ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात लढण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. स्वातंत्र्य संग्रामात या सेनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९४३ साली सिंगापूरमध्ये भारताच्या आझाद हिंद सरकारची प्रतीकात्मक स्थापना केली. जगातल्या ११ देशांच्या सरकारांनी आझाद हिंद सरकारला त्यावेळी मान्यता दिली. या सरकारने काही देशांमध्ये आपले दूतावासही सुरू केले. याखेरीज तत्कालीन ब्रम्हदेश (सध्याचे म्यानमार) च्या सीमेवर आझाद हिंद सेनेने इंग्रजांच्या विरोधात युद्धही लढले होते.या कार्यक्रमासाठी सुभाषबाबूंच्या परिवारातील काही सदस्य तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा उपस्थित होते. लाल किल्ला परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी