शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

राजस्थानमध्ये 'मिराज'चा जन्म, भारतीय वायू सेनेच्या विजयाचे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 15:04 IST

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली.

नागौर - राजस्थानच्या नागौर येथे एका नवजातू शिशुचे नामकरण चक्क 'मिराज' असे करण्यात आले आहे. भारतीय वायू सेनेकडून पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भारतीय वायू सेनेकडून मिराज 2000 फायटर जेट विमानांचा वापर करण्यात आला होता. मंगळवार 25 फेब्रवारी रोजी वायू सेनेने हा हल्ला घडवून पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला. त्यामुळे या जन्मलेल्या मुलाचे नाव मिराज असे ठेवण्यात आले आहे. 

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानी विमानांनी केलेली घुसखोरी हाणून पाडण्यासाठी त्यांचा माग काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. मात्र, पाकिस्तानवरील हल्ल्यासाठी भारताने मिराज 2000 जेट फायटर या विमानाचा वापर केला होता. 

भारतीय सैन्याच्या या मिराज कामगिरीची आठवण म्हणून राजस्थानच्या नागौर येथील एका कुटुंबीयाने आपल्या मुलाचे नाव मिराज असे ठेवले आहे. त्यामुळे आता या मुलाचे नाव मिराज सिंग राठोड असे आहे. भारतीय सैन्याने मिराज विमानांच्या सहाय्याने केलेल्या यशस्वी एअर स्ट्राईकमुळे आम्ही मुलाचे मिराज नामकरण केल्याचं मुलाचे वडिल श्रावणसिंग राठोड यांनी म्हटलंय. तसेच आम्हाला आशा आहे की, तो भविष्यात नक्कीच सैन्यात भरती होईल, असेही ते म्हणाले. तसेच मिराजचे काका, श्रावणसिंग राठोड यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. मला सोमवारी सकाळी सकाळी दोन गुडन्यूज कानी पडल्या. एक म्हणजे भारतीय वायू सेनेने पाकिस्तानवर केलेला हल्ला आणि दुसरा म्हणजे आमच्या घरात आलेला नवीन पाहुणा. त्यामुळेच आम्ही भारतीय सैन्याच्या विजयाची आठवण म्हणून मुलाचे नाव मिराजसिंग राठोड असे ठेवल्याचं श्रावणसिंग यांनी सांगितलं. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दल