शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

राजस्थानमध्ये 'मिराज'चा जन्म, भारतीय वायू सेनेच्या विजयाचे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 15:04 IST

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली.

नागौर - राजस्थानच्या नागौर येथे एका नवजातू शिशुचे नामकरण चक्क 'मिराज' असे करण्यात आले आहे. भारतीय वायू सेनेकडून पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भारतीय वायू सेनेकडून मिराज 2000 फायटर जेट विमानांचा वापर करण्यात आला होता. मंगळवार 25 फेब्रवारी रोजी वायू सेनेने हा हल्ला घडवून पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला. त्यामुळे या जन्मलेल्या मुलाचे नाव मिराज असे ठेवण्यात आले आहे. 

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानी विमानांनी केलेली घुसखोरी हाणून पाडण्यासाठी त्यांचा माग काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. मात्र, पाकिस्तानवरील हल्ल्यासाठी भारताने मिराज 2000 जेट फायटर या विमानाचा वापर केला होता. 

भारतीय सैन्याच्या या मिराज कामगिरीची आठवण म्हणून राजस्थानच्या नागौर येथील एका कुटुंबीयाने आपल्या मुलाचे नाव मिराज असे ठेवले आहे. त्यामुळे आता या मुलाचे नाव मिराज सिंग राठोड असे आहे. भारतीय सैन्याने मिराज विमानांच्या सहाय्याने केलेल्या यशस्वी एअर स्ट्राईकमुळे आम्ही मुलाचे मिराज नामकरण केल्याचं मुलाचे वडिल श्रावणसिंग राठोड यांनी म्हटलंय. तसेच आम्हाला आशा आहे की, तो भविष्यात नक्कीच सैन्यात भरती होईल, असेही ते म्हणाले. तसेच मिराजचे काका, श्रावणसिंग राठोड यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. मला सोमवारी सकाळी सकाळी दोन गुडन्यूज कानी पडल्या. एक म्हणजे भारतीय वायू सेनेने पाकिस्तानवर केलेला हल्ला आणि दुसरा म्हणजे आमच्या घरात आलेला नवीन पाहुणा. त्यामुळेच आम्ही भारतीय सैन्याच्या विजयाची आठवण म्हणून मुलाचे नाव मिराजसिंग राठोड असे ठेवल्याचं श्रावणसिंग यांनी सांगितलं. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दल