शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

शेतकरी आंदोलनामुळे सर्व बाजूंनी सीमा सील; अनेक स्तरांवर बॅरिकेड्स लावल्याने कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 10:35 IST

पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने गाझीपूर सीमा भागात वाहतूक कोंडी झाली होती.

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीला अक्षरश: किल्ल्याचे स्वरूप आले आहे. सर्व बाजूंनी सीमा सील केल्यामुळे दिल्ली-राष्ट्रीय राजधानी प्रदेशात मंगळवारी अनेक ठिकाणी वाहतूक गोगलगायीच्या गतीने सुरू होती. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या अडचणीत अडथळा आणण्यासाठी सिंघू आणि टिकरी सीमेवर अनेक स्तरांवर बॅरिकेड्स लावले आणि वाहतूक रोखल्याने वाहतूक कोंडी झाली. 

दिल्लीत मोठ्या सुरक्षा कवचाखाली दंगलविरोधी पथक तैनात करण्यात आले आणि अनेक प्रमुख रस्त्यांवर प्रवेशाचे नियमन करणारे धातूचे आणि काँक्रीट बॅरिकेड्स, लोखंडी खिळे लावण्यात आले आहेत. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने गाझीपूर सीमा भागात वाहतूक कोंडी झाली होती. नोएडा आणि दिल्लीला जोडणाऱ्या मुख्य मार्गाच्या अर्ध्या भागावर बॅरिकेड्स लावून एका वेळी फक्त दोन वाहनांना जाण्याची परवानगी होती. गाझीपूर सीमेवरील सर्व्हिस रोडवर हजारो पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दिल्ली मेट्रोने शेतकऱ्यांचा मोर्चा लक्षात घेऊन नऊ स्थानकांवर प्रवाशांचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे नियमन केले आणि काही दरवाजे बंद केले. मात्र तरीही शेतकरी मोठ्या प्रमाणात दिल्लीत दाखल झाले.

संसदेला विशेष सुरक्षाहरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या शेजारील राज्यांमधून राष्ट्रीय राजधानीकडे कूच करणारे आंदोलक शहरात घुसल्यास आणि संसदेत जाण्याचा प्रयत्न केल्यास सामोरे जाण्यासाठी सुरक्षा व्यवस्था ‘प्लॅन बी’ तयार आहे. संसदेच्या सर्व दरवाजांवर बॅरिकेड लावण्यात आले आहेत आणि इमारतीभोवती निमलष्करी दलासह अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधानांचे निवासस्थान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांच्या निवासस्थानीही विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 

काय आहेत मागण्या?बाजारातील अनिश्चिततेचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देणारा कायदा लागू करा.विद्युत कायदा २०२० रद्द करा. लखीमपूर खेरी येथे मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असलेल्यांवरील खटले मागे घ्या, मागील आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्या. भूसंपादन कायदा २०१३ पुनर्स्थापित करणे, जागतिक व्यापार संघटनेतून माघार घ्या.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन