शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'या' बॉलीवूड डायरेक्टरने भाजप नेते मुरली मनोहर जोशींना म्हटले, देशद्रोही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 11:55 IST

अनुराग कश्यप यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मुरली मनोहर जोशींना देशद्रोही म्हणून टाकले. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना हटविण्याची मागणी केली. यानंतर बॉलिवूड डायरेक्टर अनुराग कश्यप चांगलेच भडकले असून त्यांनी जोशी यांना देशद्रोही संबोधले. अनुरागने या संदर्भात ट्विट केले असून ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवरून अनेक कलाकारांनी निषेध नोंदविला. त्यातच भाजप नेत्याने कुलगुरूंना हटविण्याची मागणी केली. त्यानंतर अनुराग कश्यप यांनी जोशी यांना देशद्रोही संबोधलं. तसेच जोशी यांना पाकिस्तानात पाठवून देण्याचा सल्लाही त्यांनी दिला. 

विद्यार्थ्यांची फी वाढीसंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारचा प्रस्ताव लागू करण्यासाठी कुलगुरू तयार नसणे ही हैराण करणारी गोष्ट असल्याचे सांगत जोशी यांनी कुलगुरूंचे हे कृत्य निंदणीय असून त्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली. 

यावर अनुराग कश्यप यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मुरली मनोहर जोशींना देशद्रोही म्हणून टाकले. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.