शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या घरावर बुल्डोझर

By admin | Published: August 11, 2016 12:24 PM

साचलेलं पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा करणा-या हजारो घरांवर कारवाई करण्यात येणार आहे ज्यामधील एक घर पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेले जवान लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांचं आहे

ऑनलाइन लोकमत - 
बंगळुरु, दि. 11 - साचलेलं पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा करणा-या हजारो घरांवर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या घरांमधील एक घर पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेले जवान लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांचं आहे. जानेवारीमध्ये पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले होते. पुढील 4 महिन्यांमध्ये 1,100 घरांवर कारवाई करण्यात येणार आहे ज्यामध्ये निरंजन कुमार यांचंदेखील घर आहे. शहीद जवानाच्या घरावर अशाप्रकारे कारवाई करण्यात येत असल्याने कुटुंबाने रोष व्यक्त केला आहे. 
 
देशासाठी आपले प्राण गमावणा-या जवानाची कदर केली गेली पाहिजे असं कुटुंबाचं म्हणणं आहे. 'हे पचवणं आमच्यासाठी खूप कठीण आहे, कारण आम्ही दहशतवादी हल्ल्यात आमचा भाऊ गमावला आहे. ही कारवाई थांबवावी अशी मी विनंती करतो. निरंजनने देशासाठी जीव गमावला आहे, असं झाल्यास ही लाजेची गोष्ट असेल', असं निरंजन यांचे बंधू शशांक यांनी सांगितलं आहे. 
 
मात्र ही कारवाई गरजेची असल्याचं अधिका-यांचं म्हणणं आहे. शहराला पुरापासून धोका आहे, आणि पाणी वाहून नेण्यासाठी ही घरं पाडणं गरजेचं आहे. गेल्या महिन्यात पाण्यातून साप, मासे रस्त्यावर आले होते असं अधिकारी सांगत आहेत. 
 
'आम्हाला सहानुभूती आहे, मात्र लोकांच्या भल्यासाठी हे करणं गरजेचं आहे', असं नागरी आयुक्त मंजुनाथ प्रसाद यांनी सांगितलं आहे. निरंजन कुमार यांचं कुटुंब केरळचे असून गेल्या अनेक वर्षापासून ते बंगळुरुत राहत आहेत. 
 
अशा प्रकारे शहीद जवानाच्या घरावर कारवाई करणे योग्य आहे का ? की त्यांना विशेष सवलत द्यावी ? तुमची प्रतिक्रिया कळवा