शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

काळे धन झाले आता जनधन

By admin | Updated: May 27, 2017 02:49 IST

आतापर्यंत देशात काळे धन होते. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे ते काळे धन आता जनधन आणि डीजी धन झाले आहे, बेनामी संपत्ती कायदा २८ वर्षांपूर्वी झाला

गुवाहाटी : आतापर्यंत देशात काळे धन होते. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे ते काळे धन आता जनधन आणि डीजी धन झाले आहे, बेनामी संपत्ती कायदा २८ वर्षांपूर्वी झाला, पण आमच्याच सरकारने त्याची अमलबजावणी केली, असे सांगतानाच शेतकऱ्यांचे उत्पन्न २0२२ पर्यंत दुप्पट होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.मोदी सरकारला आज तीन वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त सरकारने या काळात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेताना पंतप्रधान म्हणाले की, मला प्रधान सेवक म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी देशाच्या जनतेचे आभार मानतो. देशाच्या भल्यासाठी आम्ही जी पावले उचलली त्या प्रत्येक निर्णयात देशातील १२५ कोटी जनतेने साथ दिली, याचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. मी माझे मन, शरीर, आत्मा आणि आयुष्य देशाला समर्पित केले आहे असे मोदी सांगून ते म्हणाले की, विकास कायमस्वरुपी करायचा असेल तर, पायाभूत सुविधा पहिली गरज आहे. देशाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या सरकारने पायाभूत सोयी-सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या तीन वर्षांत जी ठोस पावले उचलली गेली त्यामुळे लोकांचे जीवनमान बदलले गेले आहे, असा दावा पंतप्रधान टिष्ट्वटरवर केला. त्यांनी २०१४ आणि २०१७ या कालावधीतील वेगवेगळ्या क्षेत्रांतील फरक दर्शवणारी आकडेवारीही दिली आहे. मोदी यांनी कृषी, मोबाईल बँकिंग, दूरध्वनीची घनता (टेले डेन्सिटी), महिलांचे सक्षमीकरण, मेक इन इंडिया, पर्यटन, विद्युतीकरण, सौर ऊर्जा आणि एलईडी बल्बचे वितरण आदी क्षेत्रांशी संबंधित आलेखही दिले. गुंतवणुकीला प्रचंड प्रोत्साहन मेक इन इंडियाचा संदर्भ देत मोदी यांनी म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक उत्पादनामध्ये गुंतवणुकीला प्रचंड प्रोत्साहन मिळाले आहे. या उद्योगातील गुंतवणुकीने २०१३-२०१४ मध्ये ११,१९८ कोटींवरून थेट १,४३,००० कोटींपर्यंत मजल मारली आहे. ‘डिजिटल इंडिया फॉर डेव्हलपड् इंडिया’ या मथळ्याखालील ग्राफिक्स म्हणते की, २०१३-२०१४ मध्ये आॅप्टिकल फायबर ब्रॉडबँड नेटवर्क ३५८ किलोमीटर होते ते आज २.०५,४०४ किलोमीटर झाले आहे.काँगे्रसची टीका; तीन वर्षांत ‘फुशारक्या अन् अतिशयोक्ती’काँग्रेसने मात्र आर्थिक आणि सामाजिक अंगांनी देशाचे भवितव्य अंधकारमय आहे, असे भाकीत केले असून, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कारकीर्दीत देशाला संघर्ष बघावा लागेल, असा आरोप केला. सरकारच्या रोजगार धोरणाबद्दल श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मोदी सरकारवर थेट हल्ला केला. गेल्या तीन वर्षांत या सरकारबद्दल सांगायचे तर ते एवढेच की ‘फुशारक्या, आलंकारिक भाषा आणि अतिशयोक्ती. ’ देशाने यापूर्वी कधीही अशी विभागणी पाहिली नव्हती. देश भविष्यात संघर्षाच्या काठावर उभा असल्याचे दिसत आहे, असे कमलनाथ म्हणाले.