शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काळे धन झाले आता जनधन

By admin | Updated: May 27, 2017 02:49 IST

आतापर्यंत देशात काळे धन होते. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे ते काळे धन आता जनधन आणि डीजी धन झाले आहे, बेनामी संपत्ती कायदा २८ वर्षांपूर्वी झाला

गुवाहाटी : आतापर्यंत देशात काळे धन होते. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे ते काळे धन आता जनधन आणि डीजी धन झाले आहे, बेनामी संपत्ती कायदा २८ वर्षांपूर्वी झाला, पण आमच्याच सरकारने त्याची अमलबजावणी केली, असे सांगतानाच शेतकऱ्यांचे उत्पन्न २0२२ पर्यंत दुप्पट होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.मोदी सरकारला आज तीन वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त सरकारने या काळात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेताना पंतप्रधान म्हणाले की, मला प्रधान सेवक म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी देशाच्या जनतेचे आभार मानतो. देशाच्या भल्यासाठी आम्ही जी पावले उचलली त्या प्रत्येक निर्णयात देशातील १२५ कोटी जनतेने साथ दिली, याचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. मी माझे मन, शरीर, आत्मा आणि आयुष्य देशाला समर्पित केले आहे असे मोदी सांगून ते म्हणाले की, विकास कायमस्वरुपी करायचा असेल तर, पायाभूत सुविधा पहिली गरज आहे. देशाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या सरकारने पायाभूत सोयी-सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या तीन वर्षांत जी ठोस पावले उचलली गेली त्यामुळे लोकांचे जीवनमान बदलले गेले आहे, असा दावा पंतप्रधान टिष्ट्वटरवर केला. त्यांनी २०१४ आणि २०१७ या कालावधीतील वेगवेगळ्या क्षेत्रांतील फरक दर्शवणारी आकडेवारीही दिली आहे. मोदी यांनी कृषी, मोबाईल बँकिंग, दूरध्वनीची घनता (टेले डेन्सिटी), महिलांचे सक्षमीकरण, मेक इन इंडिया, पर्यटन, विद्युतीकरण, सौर ऊर्जा आणि एलईडी बल्बचे वितरण आदी क्षेत्रांशी संबंधित आलेखही दिले. गुंतवणुकीला प्रचंड प्रोत्साहन मेक इन इंडियाचा संदर्भ देत मोदी यांनी म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक उत्पादनामध्ये गुंतवणुकीला प्रचंड प्रोत्साहन मिळाले आहे. या उद्योगातील गुंतवणुकीने २०१३-२०१४ मध्ये ११,१९८ कोटींवरून थेट १,४३,००० कोटींपर्यंत मजल मारली आहे. ‘डिजिटल इंडिया फॉर डेव्हलपड् इंडिया’ या मथळ्याखालील ग्राफिक्स म्हणते की, २०१३-२०१४ मध्ये आॅप्टिकल फायबर ब्रॉडबँड नेटवर्क ३५८ किलोमीटर होते ते आज २.०५,४०४ किलोमीटर झाले आहे.काँगे्रसची टीका; तीन वर्षांत ‘फुशारक्या अन् अतिशयोक्ती’काँग्रेसने मात्र आर्थिक आणि सामाजिक अंगांनी देशाचे भवितव्य अंधकारमय आहे, असे भाकीत केले असून, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कारकीर्दीत देशाला संघर्ष बघावा लागेल, असा आरोप केला. सरकारच्या रोजगार धोरणाबद्दल श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मोदी सरकारवर थेट हल्ला केला. गेल्या तीन वर्षांत या सरकारबद्दल सांगायचे तर ते एवढेच की ‘फुशारक्या, आलंकारिक भाषा आणि अतिशयोक्ती. ’ देशाने यापूर्वी कधीही अशी विभागणी पाहिली नव्हती. देश भविष्यात संघर्षाच्या काठावर उभा असल्याचे दिसत आहे, असे कमलनाथ म्हणाले.