शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

काळे धन झाले आता जनधन

By admin | Updated: May 27, 2017 02:49 IST

आतापर्यंत देशात काळे धन होते. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे ते काळे धन आता जनधन आणि डीजी धन झाले आहे, बेनामी संपत्ती कायदा २८ वर्षांपूर्वी झाला

गुवाहाटी : आतापर्यंत देशात काळे धन होते. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे ते काळे धन आता जनधन आणि डीजी धन झाले आहे, बेनामी संपत्ती कायदा २८ वर्षांपूर्वी झाला, पण आमच्याच सरकारने त्याची अमलबजावणी केली, असे सांगतानाच शेतकऱ्यांचे उत्पन्न २0२२ पर्यंत दुप्पट होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.मोदी सरकारला आज तीन वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त सरकारने या काळात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेताना पंतप्रधान म्हणाले की, मला प्रधान सेवक म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी देशाच्या जनतेचे आभार मानतो. देशाच्या भल्यासाठी आम्ही जी पावले उचलली त्या प्रत्येक निर्णयात देशातील १२५ कोटी जनतेने साथ दिली, याचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. मी माझे मन, शरीर, आत्मा आणि आयुष्य देशाला समर्पित केले आहे असे मोदी सांगून ते म्हणाले की, विकास कायमस्वरुपी करायचा असेल तर, पायाभूत सुविधा पहिली गरज आहे. देशाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या सरकारने पायाभूत सोयी-सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या तीन वर्षांत जी ठोस पावले उचलली गेली त्यामुळे लोकांचे जीवनमान बदलले गेले आहे, असा दावा पंतप्रधान टिष्ट्वटरवर केला. त्यांनी २०१४ आणि २०१७ या कालावधीतील वेगवेगळ्या क्षेत्रांतील फरक दर्शवणारी आकडेवारीही दिली आहे. मोदी यांनी कृषी, मोबाईल बँकिंग, दूरध्वनीची घनता (टेले डेन्सिटी), महिलांचे सक्षमीकरण, मेक इन इंडिया, पर्यटन, विद्युतीकरण, सौर ऊर्जा आणि एलईडी बल्बचे वितरण आदी क्षेत्रांशी संबंधित आलेखही दिले. गुंतवणुकीला प्रचंड प्रोत्साहन मेक इन इंडियाचा संदर्भ देत मोदी यांनी म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक उत्पादनामध्ये गुंतवणुकीला प्रचंड प्रोत्साहन मिळाले आहे. या उद्योगातील गुंतवणुकीने २०१३-२०१४ मध्ये ११,१९८ कोटींवरून थेट १,४३,००० कोटींपर्यंत मजल मारली आहे. ‘डिजिटल इंडिया फॉर डेव्हलपड् इंडिया’ या मथळ्याखालील ग्राफिक्स म्हणते की, २०१३-२०१४ मध्ये आॅप्टिकल फायबर ब्रॉडबँड नेटवर्क ३५८ किलोमीटर होते ते आज २.०५,४०४ किलोमीटर झाले आहे.काँगे्रसची टीका; तीन वर्षांत ‘फुशारक्या अन् अतिशयोक्ती’काँग्रेसने मात्र आर्थिक आणि सामाजिक अंगांनी देशाचे भवितव्य अंधकारमय आहे, असे भाकीत केले असून, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कारकीर्दीत देशाला संघर्ष बघावा लागेल, असा आरोप केला. सरकारच्या रोजगार धोरणाबद्दल श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मोदी सरकारवर थेट हल्ला केला. गेल्या तीन वर्षांत या सरकारबद्दल सांगायचे तर ते एवढेच की ‘फुशारक्या, आलंकारिक भाषा आणि अतिशयोक्ती. ’ देशाने यापूर्वी कधीही अशी विभागणी पाहिली नव्हती. देश भविष्यात संघर्षाच्या काठावर उभा असल्याचे दिसत आहे, असे कमलनाथ म्हणाले.