शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

‘जनधन’मध्ये काळे धन?

By admin | Updated: January 2, 2017 01:19 IST

चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्यानंतर, जनधन खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रकमा जमा करण्यात आल्या व गेल्या पंधरा दिवसांत

नवी दिल्ली : चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्यानंतर, जनधन खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रकमा जमा करण्यात आल्या व गेल्या पंधरा दिवसांत त्यातून ३,२८५ कोटी रुपये काढून घेण्यात आले. नोटाबंदीआधी ज्या खात्यांमध्ये ठणठणाट असायचा, त्याच खात्यांद्वारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे, काळ्या धनाचे पांढरे धन करून घेतले, गेले असा संशय आता व्यक्त होत आहे.या खात्यांमध्ये ७ डिसेंबरअखेर विक्रमी ७४,६१० कोटी रुपये जमा झाले होते व त्यानंतर त्यातून पैसे काढण्यात आले व २८ डिसेंबर रोजी या खात्यांत ७१,०३७ कोटी रुपये जमा होते, असे अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. जनधन खात्यांचा गैरवापर रोखण्यासाठी ३० नोव्हेंबरपासून या खात्यांतून दरमहा १० हजार रुपयेच काढता येतील, असे बंधन घालण्यात आले होते, तरीही गेल्या दोन आठवड्यांत त्यातून ३,२८५ कोटी रुपये काढून घेण्यात आले. जनधन खात्यांमध्ये जास्तीत जास्त ५० हजार रुपये भरण्याची मर्यादा होती. ९ नोव्हेंबर रोजी अशा सुमारे २५.५ कोटी खात्यांमध्ये ४५,६३७ कोटी रुपये होते. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर महिनाभराने जनधन खात्यांमध्ये पैसे जमा करण्याचा वेग वाढला.बाद नोटा भरण्यासाठी अनिवासींना सवलतनवी दिल्ली : चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बँकेत भरण्याची मुदत ३० डिसेंबर रोजी संपली असली तरी अनिवासी भारतीयांसाठी ती ३० जूनपर्यंत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यासंदर्भातील अध्यादेशाला मान्यता दिली. बाद झालेल्या नोटा बाळगणारे किंवा त्या व्यवहारात आणणाऱ्यांना कठोर दंडाची तरतुदही या ताज्या अध्यादेशात आहे. अनिवासी भारतीयांना ३० जूनपर्यंत जास्तीतजास्त २५ हजार रुपयेच बँकेत भरता येतील. हीच मर्यादा ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत विदेशात असलेल्या भारतीयांनाही लागू आहे. मात्र त्यांना ३१ मार्चपर्यंत जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या ठराविक कार्यालयांत जाऊनच बदलून घ्याव्या लागतील. बाद झालेल्या नोटा बँकांच्या शाखांमध्ये जमा करताना कोणते घोषणापत्र (डिक्लेरेशन) व निवेदने सादर करावी लागतील याचा तपशील रिझर्व्ह बँक स्वतंत्रपणे सांगणार आहे. कोणतेही घोषणापत्र खोटे आढळल्यास ५० हजार रुपये किंवा जेवढ्या नोटा जमा केल्या त्यांच्या दर्शनी मुल्याच्या पाच पट (जी रक्कम जास्त असेल) ती दंड भरावी लागेल, असे अर्थमंत्रालयाने निवेदनात स्पष्ट केले. एटीएममधून काढा ४,५०० रुपये रिझर्व बँकेने दिलेल्या निर्देशानंतर आता एटीएममधून रोज ४,५०० रुपये काढता येत आहेत. एटीएममधून ४,५०० रुपये देताना ते ५०० रुपयांच्या नोटांतील असावेत, असे बँकेने निवेदनात म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ २ हजारांच्या दोन नोटाच मिळत असल्याचे चित्र अनेक एटीएमवर दिसून आले. एका आठवड्यात २४ हजार रुपयेच काढण्याच्या आधीच्या आदेशात काहीही बदल झालेला नाही. नोटाबंदीनंतर ‘जनधन’मधील ठेवी दुप्पट नोटाबंदीनंतर जन धन खात्यातील ठेवीत मोठी वाढ झाली आहे. ४५ दिवसांत या ठेवी दुप्पट झाल्या असून, यात सद्या ८७ हजार कोटी रुपये आहेत. कर विभाग या ठेवींबाबत माहिती घेत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या खात्यांशिवाय कर विभागाकडे ४.८६ लाख अन्य खात्यांचीही माहिती आहे. यात ३० हजार ते ५० हजार रुपयांच्या जमा रकमेची आकडेवारी आहे. यात एकू ण दोन हजार कोटी रुपये जमा आहेत. १० नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत जनधन खात्यातून एकूण ४१,५२३ कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे, तर ९ नोव्हेंबरपर्यंत या खात्यात ४५,६३७ कोटी रुपये जमा होते. या खात्यातील रक्कम ८७,१०० कोटी रुपयांवर पोहचली आहे. जनधन खात्यातील एकूणच माहितीचा तपास करण्यात येणार आहे. जर असे आढळून आले की, या खात्यातील रक्कम दुसऱ्याच व्यक्तीची आहे, तर कारवाई करण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने सांंगितले. नोटाबंदीनंतर पहिल्या आठवड्यातच जनधन खात्यात २०,२२४ कोटी रुपये रक्कम जमा झाली आहे.