शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

शेतकऱ्यांसाठी ‘काळा दिवस’ खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी; १४ मार्चला दिल्लीत महापंचायत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 11:43 IST

राज्याच्या हद्दीत प्रवेश करून शेतकऱ्यांच्या २५-३० ट्रॅक्टर-ट्रॉलींचे नुकसान केल्याप्रकरणी हरयाणा निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांवर पंजाब सरकारने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

चंडीगड : संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) गुरुवारी पंजाब-हरयाणा सीमेवर आंदोलक शेतकऱ्याच्या मृत्युबद्दल खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आणि सोमवारी ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा केली. आता रद्द केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात २०२०-२१ च्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या एसकेएमने शेतकरी मृत्युबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी ‘काळा दिवस’ पाळणार आहेत.

शेतकरी २६ फेब्रुवारीला महामार्गावर ट्रॅक्टर मोर्चा काढतील आणि १४ मार्च रोजी दिल्लीत महापंचायत आयोजित करतील, असे एसकेएम नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितले. खनौरी सीमेवरील शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्याच्या हद्दीत प्रवेश करून शेतकऱ्यांच्या २५-३० ट्रॅक्टर-ट्रॉलींचे नुकसान केल्याप्रकरणी हरयाणा निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांवर पंजाब सरकारने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

‘त्या’ शेतकऱ्याने बहिणीच्या लग्नासाठी घेतले होते कर्ज

२१ वर्षीय शुभकरण सिंग याने  शेतकऱ्यांच्या मोर्चात सामील होण्यासाठी घर सोडले. चकमकीत तो मारला गेला. त्याच्या कुटुंबीयांना सरकारने नुकसानभरपाई जाहीर करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शवविच्छेदन रोखून धरले आहे. शुभकरनच्या आईचे निधन झाले आहे आणि वडील मानसिक आजाराने त्रस्त आहेत. त्याला दोन बहिणी आहेत, एक विवाहित आहे आणि दुसरीचे शिक्षण सुरू आहे. शुभकरनने आपल्या बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेतले होते.

शेतकऱ्यांशी चर्चा करावी : काँग्रेस

केंद्राने आंदोलक शेतकऱ्यांशी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ताबडतोब चर्चा करावी, आंदोलनामुळे उद्भवलेली परिस्थिती चिंताजनक आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदरसिंग हुडा यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.

‘त्या’ पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश’

सोशल मीडिया व्यासपीठ ‘एक्स’ने गुरुवारी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित खाती आणि पोस्ट ब्लॉक करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशाशी असहमती व्यक्त केली आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाढवण्याचे आवाहन केले.

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने गृह मंत्रालयाच्या विनंतीवरून ‘एक्स’ला १७७ खाती तात्पुरती ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत जी शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित आहेत.

“भारत सरकारने कार्यकारी आदेश जारी केले आहेत.. ज्यात एक्सला विशिष्ट खाती आणि पोस्ट्सवर कारवाई करणे आवश्यक आहे. आदेशांचे पालन करून, आम्ही ही खाती आणि पोस्ट केवळ भारतातच रोखू; तथापि आम्ही या कृतीशी असहमत आहोत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाढवायला हवे,” असे ‘एक्स’ने म्हटले आहे. यावर देशात लोकशाहीची हत्या केली जात आहे, अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्ली