शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
2
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
3
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
4
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
5
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
6
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
8
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
9
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
10
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
11
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
12
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
13
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
14
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
15
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
16
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
17
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
18
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
19
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
20
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी

४२ वर्षापूर्वीचा काळा दिवस!...तेव्हा ट्रेनचे ९ डबे नदीत बुडाले होते; ८०० जणांचा झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 09:14 IST

या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचे मृतदेह कित्येक दिवस ट्रेनच्या बोगीमध्येच अडकले होते.

सहरसा - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. याठिकाणी बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली. या दुर्दैवी अपघातात आतापर्यंत २३७ लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. परंतु हा देशातील पहिला मोठा अपघात नव्हे तर भारतात याआधीही अनेक भीषण रेल्वे अपघात झाले आहेत. ४२ वर्षापूर्वी बिहार रेल्वे अपघात, ज्याला देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात मानले जाते. 

हा दिवस होता ६ जून १९८१..प्रवाशांनी खचाखच भरलेली ट्रेन मानसी-सहरसा रेल्वेमार्गावर घाट-धमारा स्टेशनजवळ बागामती नदीवर बनलेल्या पूलावर रुळावरून उलटून पडली. या ट्रेनमध्ये ९ डबे होते. ट्रेन रुळावरून घसरल्याने उफनती बागमती नदीत कोसळली. या दुर्घटनेत तब्बल ८०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून १९८१ ला मानसीपर्यंत ट्रेन नेहमीसारखी पुढे गेली. परंतु दुपारीच्या ३ च्यानंतर धमारा घाटाहून ट्रेन पुढे गेली. काही वेळाने वातावरण खराब झाले, मुसळधार पाऊस पडत होता. ट्रेन वेगाने जात होती. अचानक ड्रायव्हरने ब्रेक दाबला त्यामुळे पॅसेंजर ट्रेनचे ९ डबे बागामती नदीत पडले. 

अनेक प्रवाशांचे मृतदेह कित्येक दिवस ट्रेनच्या बोगीमध्येच अडकले होते. या अपघातातील मृतांची संख्या सरकारी आकडेवारीनुसार ३०० होती परंतु स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेत ८०० च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात म्हणून आठवले जाते. या दुर्घटनेबाबत अनेक गोष्टी त्यानंतर बाहेर आल्या. ट्रेन बागामती नदी ओलांडत असताना ट्रॅकवर अचानक गाय आणि म्हैशीचा झुंड आला त्यांना वाचवण्याच्या नादात ड्रायव्हरने ब्रेक दाबला. 

तर काहींच्या मते, मुसळधार पावसामुळे ट्रेनमधील सर्व प्रवाशांनी दारे, खिडक्या बंद केले होते. त्यामुळे वेगवान वारे वाहताना त्याचा दबाव ट्रेनच्या डब्यावर पडला आणि डबे नदीत पडले. परंतु ड्रायव्हरने ब्रेक का दाबला याचा खुलासा आजपर्यंत झाला नाही. हा देशातील पहिला मोठा रेल्वे अपघात होता तर जगातील दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात होता. जगातील सर्वात मोठा रेल्वे अपघात श्रीलंकेत २००४ मध्ये झाला. जेव्हा सुनामीमुळे ओसियन क्वीन एक्सप्रेसचा अपघात झाला. ज्यात १७०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला.  

टॅग्स :railwayरेल्वे