शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४२ वर्षापूर्वीचा काळा दिवस!...तेव्हा ट्रेनचे ९ डबे नदीत बुडाले होते; ८०० जणांचा झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 09:14 IST

या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचे मृतदेह कित्येक दिवस ट्रेनच्या बोगीमध्येच अडकले होते.

सहरसा - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. याठिकाणी बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाली. या दुर्दैवी अपघातात आतापर्यंत २३७ लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. परंतु हा देशातील पहिला मोठा अपघात नव्हे तर भारतात याआधीही अनेक भीषण रेल्वे अपघात झाले आहेत. ४२ वर्षापूर्वी बिहार रेल्वे अपघात, ज्याला देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात मानले जाते. 

हा दिवस होता ६ जून १९८१..प्रवाशांनी खचाखच भरलेली ट्रेन मानसी-सहरसा रेल्वेमार्गावर घाट-धमारा स्टेशनजवळ बागामती नदीवर बनलेल्या पूलावर रुळावरून उलटून पडली. या ट्रेनमध्ये ९ डबे होते. ट्रेन रुळावरून घसरल्याने उफनती बागमती नदीत कोसळली. या दुर्घटनेत तब्बल ८०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून १९८१ ला मानसीपर्यंत ट्रेन नेहमीसारखी पुढे गेली. परंतु दुपारीच्या ३ च्यानंतर धमारा घाटाहून ट्रेन पुढे गेली. काही वेळाने वातावरण खराब झाले, मुसळधार पाऊस पडत होता. ट्रेन वेगाने जात होती. अचानक ड्रायव्हरने ब्रेक दाबला त्यामुळे पॅसेंजर ट्रेनचे ९ डबे बागामती नदीत पडले. 

अनेक प्रवाशांचे मृतदेह कित्येक दिवस ट्रेनच्या बोगीमध्येच अडकले होते. या अपघातातील मृतांची संख्या सरकारी आकडेवारीनुसार ३०० होती परंतु स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेत ८०० च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात म्हणून आठवले जाते. या दुर्घटनेबाबत अनेक गोष्टी त्यानंतर बाहेर आल्या. ट्रेन बागामती नदी ओलांडत असताना ट्रॅकवर अचानक गाय आणि म्हैशीचा झुंड आला त्यांना वाचवण्याच्या नादात ड्रायव्हरने ब्रेक दाबला. 

तर काहींच्या मते, मुसळधार पावसामुळे ट्रेनमधील सर्व प्रवाशांनी दारे, खिडक्या बंद केले होते. त्यामुळे वेगवान वारे वाहताना त्याचा दबाव ट्रेनच्या डब्यावर पडला आणि डबे नदीत पडले. परंतु ड्रायव्हरने ब्रेक का दाबला याचा खुलासा आजपर्यंत झाला नाही. हा देशातील पहिला मोठा रेल्वे अपघात होता तर जगातील दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात होता. जगातील सर्वात मोठा रेल्वे अपघात श्रीलंकेत २००४ मध्ये झाला. जेव्हा सुनामीमुळे ओसियन क्वीन एक्सप्रेसचा अपघात झाला. ज्यात १७०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला.  

टॅग्स :railwayरेल्वे