शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

कर्नाटकमध्ये भाजपकडून चोरटी शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 05:33 IST

काँग्रेसचा आरोप; लोकसभेतून सभात्याग, राज्यसभाही तहकूब

नवी दिल्ली : चोरटे ज्या पद्धतीने शिकार करतात, त्या पद्धतीचे राजकारण भाजपकडून कर्नाटकमध्ये सुरू आहे, असा आरोप करीत काँग्रेसच्या खासदारांनी मंगळवारी लोकसभेतून सभात्याग केला. मात्र, या आरोपाचा भाजपने इन्कार केला आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेस व जनता दल (एस)च्या काही आमदारांनी राजीनामे देऊन कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. हे राजीनामे मंजूर झाल्यास ते सरकार कोसळू शकते. या घडामोडींचा मुद्दा काँग्रेसने लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परवानगी नाकारली. या विषयावर सोमवारी चर्चा झाली असून, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी त्याला उत्तरही दिले आहे, असे बिर्ला यांनी सांगितले.

यावर काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी म्हणाले की, कुमारस्वामी सरकारला भाजपाकडून लक्ष्य केले जात आहे. कर्नाटकमध्ये आज जे सुरू आहे ते उद्या मध्यप्रदेशमध्ये सुरू होईल. चोरट्या शिकारीचे हे राजकारण थांबले पाहिजे. त्यांना प्रत्युत्तर देताना राजनाथसिंह म्हणाले की, कर्नाटकमध्ये काँग्रेस व जनता दल (एस)मध्ये जे सुरू आहे, तो त्यांचा अंतर्गत मामला आहे. अशा मुद्यांवर आम्ही सभागृहाचे कामकाज विस्कळीत होऊ देणार नाही. त्यानंतर संतप्त काँग्रेस सदस्यांनी भाजपाविरोधात घोषणा दिल्या. काही वेळाने काँग्रेस व द्रमुकच्या सदस्यांनी सभात्याग केला.

कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींचा तीव्र निषेध करीत काँग्रेसने राज्यसभेत गदारोळ माजविल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सकाळी कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या सभापतींसमोरील हौद्यात जमा होऊन भाजपाविरोधात घोषणा दिल्या.त्यातच सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण केले जात असल्याच्या निषेधार्थ तेलुगू देसमच्या सदस्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. दुपारच्या सत्रात प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळीही हा गदारोळ आणखी वाढला होता.राहुल गांधी यांनी दिल्या घोषणा‘तानाशाही बंद करो’, ‘शिकार की राजनीती बंद करो बंद करो’, अशा घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारविरोधात लोकसभेत दिल्या.या घोषणा लिहिलेले फलक उंचावून व घोषणाबाजी करून काँग्रेसच्या खासदारांनी निषेध व्यक्त केला. कर्नाटकमध्ये भाजपाकडून लोकशाहीची हत्या करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीlok sabhaलोकसभा